शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यात पोलिसांंसाठी नवी ११५४ घरे

By admin | Updated: October 19, 2016 00:18 IST

दीपक केसरकर : राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा; २९ कोटी ४७ लाखांचा निधी

कोल्हापूर : जिल्ह्यात नवीन ११५४ पोलिस निवासस्थाने मंजूर करून त्यास २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. ही घरे येत्या तीन वर्षांत पूर्ण होऊन ती पोलिस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत दिली. पोलिसांना कामाच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावता यावे, यासाठी ब्रिटिश काळापासून पोलिस वसाहतींची संकल्पना राबविण्यात आली. शंभर वर्षांपूर्वीची छोटेखानी घरांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंबंधी आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. याप्रश्नी सर्व विभागांची बैठक घेण्याची मागणी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री केसरकर यांनी मंगळवारी त्यांच्या दालनामध्ये बैठक घेतली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात जुना बुधवार पेठ, कसबा बावडा, लक्ष्मीपुरी आणि लाईन बझार अशा एकूण चार पोलिस वसाहती असून, त्यांमध्ये ८८६ घरे आहेत. पोलिसांच्या संख्याबळापेक्षा ही घरे अत्यंत तोकडी आहेत. दीडशे घरे वापरासाठी धोकादायक असल्याने बंद आहेत. वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा वणवा आहे. खराब रस्ते, पडकी घरे, गळके छप्पर, अपुरा पाणीपुरवठा या समस्यांमुळे पोलिसांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री केसरकर यांनी जिल्ह्यासाठी नवीन जागेमध्ये ११५४ घरे मंजूर करून त्यासाठी २९ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर केला. बैठकीस वित्त विभागाच्या प्रधान सचिव गीता राजीवलोचन, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, उपसचिव रा. को. धनावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अवर सचिव दीपक पोकळे, ‘हुडको’चे नागेश्वर राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘हुडको’च्या माध्यमातून ८८६ घरांची पुनर्बांधणीशहरातील पोलिस वसाहतीमधील घरांच्या दुरुस्तीसाठी सुमारे दहा कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने चालू वर्षी हा निधी नामंजूर केला. ‘हुडको’कडून अर्थसाहाय्य घेऊन जुन्या ८८६ घरांच्या पुनर्बांधणीसंबंधी चर्चा झाली. त्यासाठी हाउसिंग अ‍ॅँड अर्बन डेव्हलपमेंट (हुडको) यांनी तयारी दर्शविली. गृहविभागाने त्याकरिता प्रस्ताव ‘हुडको’ला सादर करण्याबाबत सूचित केले.