शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
3
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
6
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
7
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
10
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
11
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
12
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
13
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
14
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
15
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
16
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
17
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
18
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
19
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचे जीवन म्हणजे कर्मयोग्याची उपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST

........... नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयुष्य गूढ घटनांनी भरलेलं वाटतं; पण तसं काही नाही. चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस, ...

...........

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयुष्य गूढ घटनांनी भरलेलं वाटतं; पण तसं काही नाही. चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, रासबिहारी बोस... अशी एकापाठोपाठ एक क्रांतिकारकांची रत्ने बंगालच्या भूमिकेमध्ये जन्माला आली. ओरिसातील कटक येथे नेताजींचा जन्म झाला. त्या ठिकाणी मी जाऊन आलो. तेथे ग्रामदेवता दुर्गादेवी आहे. कालीदेवता आहे. नेताजींचा कटक येथे जन्म झाला तरी कलकत्त्यामध्ये त्यांचे सारे आयुष्य गेले. कलकत्त्यामध्ये मी त्यांच्या घरी जाऊन आलो. ज्या कारमधून काबूलला जाण्यासाठी ते बाहेर पडले, ती हिलमन कार तिथे आजही दिसते. यानंतर मणिपूर, इंफाळला गेलो. ज्या ठिकाणी आझाद हिंद सेनेने आपला स्वातंत्र्याचा झेंडा लावलेला होता. अशा नेताजी सुभाषचंद्र यांची जडणघडण, संस्कार हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे होते.

अनेक वेळेला कोणताही सत्तारूढ पक्ष दोन महापुरुषांमध्ये भांडणे लावायचा प्रयत्न करतो, हे दुर्दैवी आहे. नेताजींच्या फाइल्स बाहेर काढण्याच्या घोषणा करून नेताजी आणि नेहरू यांच्यात कसे भांडण होते, नेताजी आणि महात्मा गांधींमध्ये कसे मतभेद होते, अशा गोष्टी मांडायचा प्रयत्न काहीजण करतात. नेताजी हिटलरला भेटले ही मोठी चूक होती, असे म्हणणारीही विद्वान माणसे आहेत. या विद्वानांचा तत्कालीन आंतरराष्ट्रीय जागतिक इतिहासाचा अभ्यास कमी पडतो, असे मला वाटते. वास्तविक नेताजी हिटलरला भेटले तसेच महात्मा गांधी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी फॅसिस्टवाद मानणाऱ्या मुसोलिनीलाही इटलीत भेटले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू यांचे रशियामध्ये मोठे स्वागत झाले होते. १९२७ च्या दरम्यान त्या वेळेला जगाची द्वारे मुक्त होती. या गतिमान जगामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास श्यामाप्रसाद मुखर्जी, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी घेतला होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही तो घेतला होता. अनेक लोक हे विसरतात की, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आझाद हिंद सेनेचे सेनाधिकारी आणि सैनिकांवर ब्रिटिशांनी खटले दाखल केले, त्या वेळी तीस वर्षांपूर्वी बॅरिस्टरचा झगा उतरविलेले जवाहरलाल नेहरू यांनी पुन्हा वकिलीची कागदपत्रे घेऊन आझाद हिंद सेनेची बाजू लढविली होती. नेताजींना महात्मा गांधी यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यावेळी स्वातंत्र्याच्या दिशेने सारेच काम करीत होते. त्यामुळे एकमेकांतील मार्गभिन्नतेचे भांडवल आज स्वातंत्र्यामध्ये जन्मलेल्या पिढीने करू नये.

दुसरी गोष्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या पत्नीकडे एक पत्र दिले आणि ते पत्र आपले बंधू शिरीष बोस यांना देण्यास सांगितले होते. एक अट होती, ‘माझ्या मृत्यूनंतर ते पाकीट उघडा.’ त्या पत्रामध्ये नेताजींनी एक कळकळीची विनंती केली होती की, माझा विवाह झालेला आहे आणि मला एक मुलगी आहे. या दोघांचा सांभाळ बोस कुटुंबीयांनी करावा.

स्वातंत्र्याचा क्षण जवळ आलेला होता. आझाद हिंद सेना दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली होती. आझाद हिंद सेनेचे सोनेरी स्वप्न भंग पावले होते. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर सारीच परिस्थिती बदलली होती. त्याच काळात दुर्दैवाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निधनाची बातमी आकाशवाणीने २३ ऑगस्ट १९४५ रोजी प्रसारित केली.

नेताजींचे सेनापती होते, त्यांमध्ये मेजर जनरल चतर्जी लोकनाथन, महाराष्ट्रातील मेजर जनरल जगन्नाथराव भोसले, मेजर जनरल एम. झेड. कियानी यांचा स्वतंत्र भारताने सत्कार केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन म्हणजे कर्मयोग्याची उपासना, ज्ञानयोग्याची साधना व भक्तियोग्याची निष्ठा यांचा सुंदर समन्वय होय.

..........

- डॉ. सुभाष देसाई, कोल्हापूर