शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील गलाई बांधव गोरखपुरात

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

गुरुवारी पोहोचणार स्वगृही : स्वतंत्र बसने प्रवास; आणखी दोन बसेस रवाना

विटा : भूकंपाने हादरून गेलेल्या नेपाळच्या काठमांडू शहरातून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील सुमारे २२ गलाई बांधव कुटुंबियांसह स्वतंत्र बसने भारतातील गोरखपूर येथे मंगळवारी दुपारी सुखरूप दाखल झाले. दरम्यान, काठमांडू शहरातील उर्वरित अन्य ८० ते ९० गलाई बांधव कुटुंबियांसह दुसऱ्या दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले आहेत. या प्रलयंकारी भूकंपाने हाहाकार उडाला असला तरी, मराठी गलाई बांधव सुखरूप असल्याचा निरोप गावाकडील नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी हे सर्व गलाई बांधव स्वगृही दाखल होणार आहेत.नेपाळ येथील काठमांडू शहरात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई बांधव वास्तव्यास आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाने काठमांडू शहर हादरून गेल्याचे समजताच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. दूरध्वनीवरून कोणताही संपर्क होत नसल्याने हे नातेवाईक हवालदिल झाले होते. सोमवारी आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडीचे पोपट चव्हाण यांच्यासह अन्य गलाई बांधवांनी आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या येथील नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी येथील पोपट चव्हाण, दीपक खंडागळे, सुहास फडतरे, करण चव्हाण, नारायण चव्हाण, आवळाईचे नवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे, आटपाडीचे गणेश पाटील, नंदकुमार मरगळ, हर्षवर्धन पवार, तांदळवाडीचे गणेश सावंत, तडवळेचे तात्यासाहेब गिड्डे आदी गलाई बांधवांसह २२ जण स्वतंत्र बसने सोमवारी काठमांडूहून गोरखपूर येथे दाखल झाले. मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुशीनगर एक्स्प्रेसने हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते स्वगृही दाखल होणार आहेत. (वार्ताहर)आणखी ८0 ते ९0 गलाई बांधव येणारदरम्यान, काठमांडू शहरातील खानापूर तालुक्यातील वाळूजचे दीपक बाबर, कृष्णत बागल, संजय बागल, पळशीचे सचिन जाधव, करंजेचे पोपट मदने, साळशिंगेचे संभाजी जाधव, अकलूजचे शंकर शेळके, निमसोड (खटाव) चे हणमंत चव्हाण, बाळासाहेब पवार, आवळाईचे दशरथ जाधव, मुकुंदराव साळुंखे यांच्यासह सुमारे ८० ते ९० गलाई बांधव दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले असून, भूकंपाने नेपाळमधील नारायण घाटच्या डोंगराच्या कडा कोसळल्याने प्रवासास व्यत्यय आला आहे. या कोसळलेल्या कडा बाजूला करून रस्ता खुला करण्याचे काम युध्दीपातळीवर सुरू असून, येत्या दोन तासात हे सर्व गलाई बांधव नेपाळ-भारत सीमेवर पोहोचतील, अशी माहिती पोपट चव्हाण यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.