शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

नेपाळमधील गलाई बांधव गोरखपुरात

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

गुरुवारी पोहोचणार स्वगृही : स्वतंत्र बसने प्रवास; आणखी दोन बसेस रवाना

विटा : भूकंपाने हादरून गेलेल्या नेपाळच्या काठमांडू शहरातून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील सुमारे २२ गलाई बांधव कुटुंबियांसह स्वतंत्र बसने भारतातील गोरखपूर येथे मंगळवारी दुपारी सुखरूप दाखल झाले. दरम्यान, काठमांडू शहरातील उर्वरित अन्य ८० ते ९० गलाई बांधव कुटुंबियांसह दुसऱ्या दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले आहेत. या प्रलयंकारी भूकंपाने हाहाकार उडाला असला तरी, मराठी गलाई बांधव सुखरूप असल्याचा निरोप गावाकडील नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी हे सर्व गलाई बांधव स्वगृही दाखल होणार आहेत.नेपाळ येथील काठमांडू शहरात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई बांधव वास्तव्यास आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाने काठमांडू शहर हादरून गेल्याचे समजताच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. दूरध्वनीवरून कोणताही संपर्क होत नसल्याने हे नातेवाईक हवालदिल झाले होते. सोमवारी आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडीचे पोपट चव्हाण यांच्यासह अन्य गलाई बांधवांनी आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या येथील नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी येथील पोपट चव्हाण, दीपक खंडागळे, सुहास फडतरे, करण चव्हाण, नारायण चव्हाण, आवळाईचे नवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे, आटपाडीचे गणेश पाटील, नंदकुमार मरगळ, हर्षवर्धन पवार, तांदळवाडीचे गणेश सावंत, तडवळेचे तात्यासाहेब गिड्डे आदी गलाई बांधवांसह २२ जण स्वतंत्र बसने सोमवारी काठमांडूहून गोरखपूर येथे दाखल झाले. मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुशीनगर एक्स्प्रेसने हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते स्वगृही दाखल होणार आहेत. (वार्ताहर)आणखी ८0 ते ९0 गलाई बांधव येणारदरम्यान, काठमांडू शहरातील खानापूर तालुक्यातील वाळूजचे दीपक बाबर, कृष्णत बागल, संजय बागल, पळशीचे सचिन जाधव, करंजेचे पोपट मदने, साळशिंगेचे संभाजी जाधव, अकलूजचे शंकर शेळके, निमसोड (खटाव) चे हणमंत चव्हाण, बाळासाहेब पवार, आवळाईचे दशरथ जाधव, मुकुंदराव साळुंखे यांच्यासह सुमारे ८० ते ९० गलाई बांधव दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले असून, भूकंपाने नेपाळमधील नारायण घाटच्या डोंगराच्या कडा कोसळल्याने प्रवासास व्यत्यय आला आहे. या कोसळलेल्या कडा बाजूला करून रस्ता खुला करण्याचे काम युध्दीपातळीवर सुरू असून, येत्या दोन तासात हे सर्व गलाई बांधव नेपाळ-भारत सीमेवर पोहोचतील, अशी माहिती पोपट चव्हाण यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.