शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील गलाई बांधव गोरखपुरात

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

गुरुवारी पोहोचणार स्वगृही : स्वतंत्र बसने प्रवास; आणखी दोन बसेस रवाना

विटा : भूकंपाने हादरून गेलेल्या नेपाळच्या काठमांडू शहरातून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी तालुक्यातील सुमारे २२ गलाई बांधव कुटुंबियांसह स्वतंत्र बसने भारतातील गोरखपूर येथे मंगळवारी दुपारी सुखरूप दाखल झाले. दरम्यान, काठमांडू शहरातील उर्वरित अन्य ८० ते ९० गलाई बांधव कुटुंबियांसह दुसऱ्या दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले आहेत. या प्रलयंकारी भूकंपाने हाहाकार उडाला असला तरी, मराठी गलाई बांधव सुखरूप असल्याचा निरोप गावाकडील नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी हे सर्व गलाई बांधव स्वगृही दाखल होणार आहेत.नेपाळ येथील काठमांडू शहरात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदी गलाई बांधव वास्तव्यास आहेत. शनिवारी झालेल्या भूकंपाने काठमांडू शहर हादरून गेल्याचे समजताच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. दूरध्वनीवरून कोणताही संपर्क होत नसल्याने हे नातेवाईक हवालदिल झाले होते. सोमवारी आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडीचे पोपट चव्हाण यांच्यासह अन्य गलाई बांधवांनी आपापल्या नातेवाईकांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या येथील नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी येथील पोपट चव्हाण, दीपक खंडागळे, सुहास फडतरे, करण चव्हाण, नारायण चव्हाण, आवळाईचे नवनाथ साळुंखे, अमोल साळुंखे, आटपाडीचे गणेश पाटील, नंदकुमार मरगळ, हर्षवर्धन पवार, तांदळवाडीचे गणेश सावंत, तडवळेचे तात्यासाहेब गिड्डे आदी गलाई बांधवांसह २२ जण स्वतंत्र बसने सोमवारी काठमांडूहून गोरखपूर येथे दाखल झाले. मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुशीनगर एक्स्प्रेसने हे सर्वजण मुंबईकडे रवाना झाले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते स्वगृही दाखल होणार आहेत. (वार्ताहर)आणखी ८0 ते ९0 गलाई बांधव येणारदरम्यान, काठमांडू शहरातील खानापूर तालुक्यातील वाळूजचे दीपक बाबर, कृष्णत बागल, संजय बागल, पळशीचे सचिन जाधव, करंजेचे पोपट मदने, साळशिंगेचे संभाजी जाधव, अकलूजचे शंकर शेळके, निमसोड (खटाव) चे हणमंत चव्हाण, बाळासाहेब पवार, आवळाईचे दशरथ जाधव, मुकुंदराव साळुंखे यांच्यासह सुमारे ८० ते ९० गलाई बांधव दोन स्वतंत्र बसने गोरखपूरकडे येण्यास रवाना झाले असून, भूकंपाने नेपाळमधील नारायण घाटच्या डोंगराच्या कडा कोसळल्याने प्रवासास व्यत्यय आला आहे. या कोसळलेल्या कडा बाजूला करून रस्ता खुला करण्याचे काम युध्दीपातळीवर सुरू असून, येत्या दोन तासात हे सर्व गलाई बांधव नेपाळ-भारत सीमेवर पोहोचतील, अशी माहिती पोपट चव्हाण यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना दिली.