शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 13, 2017 00:32 IST

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

संतोष बामणे । लोकमत न्यूज नेटवर्कउदगांव : शिरोळ तालुक्यातील उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टीबाबत शरद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त यांच्या अहवालात ३३ हजार ४८७ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असताना स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही? तसेच होत असलेले उत्खनन कसे निदर्शनास आले नाही? असा सवाल येथील नागरिकांतून उपस्थित होत आहे. बेकायदेशीर माती उत्खननप्रश्नी तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून मुंबई राज्य लोकायुक्त याबाबतचा अहवाल दिला होता. यावेळी ३३ हजार ४८७ ब्रास माती बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. तसेच लोकायुक्त यांनी माती उत्खनन केलेल्या ठिकाणी पंचनामा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.माती उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंडळ, एमएसईबी, पाटबंधारे विभाग, गावसभा, प्रदूषण मंडळ यांच्या परवानगी कुठे गेली त्यांनीही आजपर्यंत यावर कोणती भूमिका घेतली आहे ते दाखवावे, असा सवाल नागरिकांतून होत आहे. हे प्रकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, इचलकरंजी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनाही माहीत असल्याने स्थानिक प्रशासनावर कोणता अंकुश लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.