शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कागलमध्ये निषेध, शोकसभा

By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST

आबांना आदरांजली : पानसरेंवर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ पकडण्याची मागणी

कागल : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दल शोकसभा आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी निषेध सभा, अशा संयुक्त सभेचे आयोजन शुक्रवारी कागल शहरात करण्यात आले होते. शाहू नगरवाचनालयात झालेल्या या सभेसाठी शहरातील प्रमुख सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गाडे होते.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भैया माने यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे शामराव पाटील, मराठा महासंघाचे किरण मुळीक, शिवसेनेचे राहुल घोरपडे, किरण कुलकर्णी, प्रा. मोहन तोरगलकर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अतुल जोशी, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत गवळी, शाहू आघाडीचे सचिव मनोहर पाटील, पक्षप्रतोद रमेश माळी यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी आभार मानले. उपस्थित वक्त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी विचारांची शक्ती संपविण्याचे कटकारस्थान असल्याचे सांगून हल्लेखोरांना त्वरित पकडावे, अशी मागणी केली. या सभेला बाळ पाटील, रघुनाथ जकाते, कागल बॅँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, आशाकाकी जगदाळे, शिवराज्य मंचचे इंद्रजित घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते. ( प्रतिनिधी )ुविवेकपणा संपला़?प्रकाश गाडेकर आणि इतर काही वक्त्यांनी कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संदर्भ देत सांगितले की, हल्ला झाल्याच्या घटनेनंतर निषेधासाठी कागलमधून तत्काळ प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या. कारण ही शाहूंची जन्मभूमी आहे. मात्र, इतक्या उशिराने निषेध सभा आपण घेत आहोत, हे दुर्दैवी आहे. यामुळे कागलकरांमधील विवेकपणा संपला आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो.