शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

जलसंवर्धन काळाची गरज- डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:46 IST

शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा परिषदेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क, --कोल्हापूर : सध्याची स्थिती पाहता, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर होते. या परिषदेचा विषय ‘जलस्थापत्य : इंजिनिअरिंग अ‍ॅँड आर्किटेक्चर’ असा आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पाण्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. विद्यापीठ हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे. अध्यक्ष डॉ. देशकर म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो वाचविल्यास पाणीटंचाई जाणविणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात पडणारा पूर्ण पाऊस साठविल्यास त्यातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल. या कार्यक्रमास पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, सतीश माने, आदी उपस्थित होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.

कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातील भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सतीशराज जगदाळे, सतीश माने, पी. डी. राऊत, डी. टी. शिर्के, जयदीप बागी, अनिलराज जगदाळे उपस्थित होते.