शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धन काळाची गरज- डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:46 IST

शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा परिषदेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क, --कोल्हापूर : सध्याची स्थिती पाहता, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर होते. या परिषदेचा विषय ‘जलस्थापत्य : इंजिनिअरिंग अ‍ॅँड आर्किटेक्चर’ असा आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पाण्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. विद्यापीठ हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे. अध्यक्ष डॉ. देशकर म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो वाचविल्यास पाणीटंचाई जाणविणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात पडणारा पूर्ण पाऊस साठविल्यास त्यातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल. या कार्यक्रमास पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, सतीश माने, आदी उपस्थित होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.

कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातील भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सतीशराज जगदाळे, सतीश माने, पी. डी. राऊत, डी. टी. शिर्के, जयदीप बागी, अनिलराज जगदाळे उपस्थित होते.