शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास, कारवाईचा फार्स: दोषींना कामकाज सहभागास मनाई हवी

By समीर देशपांडे | Updated: February 6, 2025 20:06 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय व्हावेत

समीर देशपांडेकोल्हापूर : सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून संगनमताने बोगस कारभार करायचा. मिळतील तसे पैसे हाणायचे. मग तक्रारी होणार. त्याचे मोघमात अहवाल जाणार. मग सुनावणीच्या तारखांवर तारखा पडणार. मग विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्री आणि उच्च न्यायालय असा प्रवास होऊन निर्णय होणार. तोपर्यंत सरपंचांची मुदत संपलेली असते. ते घरात बसलेले असतात. चौकशी थांबलेली असते. तक्रारदाराचाही हुरूप संपलेला असतो. त्यामुळे ज्या क्षणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक दोषी आढळतो त्या क्षणापासून त्याला कामकाजात सहभागी होण्यास बंदी घालण्याची कायद्यात सुधारणा होण्याची गरज आहे.

आता एकीकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य दोषी असल्याचा अहवाल जरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवला तरीही जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांना कामकाजात सहभाग घेण्यापासून म्हणजेच बोगस कारभार करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग आपल्याला पाहिजे तसे ठराव करून घेण्यासाठी, ठराविकांना कंत्राट देण्यासाठी वाट्टेल ते करण्यास पुढे पाहत नाहीत. गावात विरोधक सक्षम असतील तर याला विरोध होताे. अन्यथा सरपंचाच्या सहीचेच अनेक दाखले पाहिजे असतात. कोणीही तक्रारींच्या भानगडीत पडत नाही आणि बोगस कारभार मागील पानावरून पुढे सुरू राहतो. त्यामुळे त्याक्षणी संबंधित दोषी लोकप्रतिनिधीला कामकाजात सहभागी होता येणार नाही, असा बदल करण्याची गरज आहे.ग्रामसेवकांच्या बाबतीत हेच आहे. आजही एका ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार करून दुसऱ्या ग्रामपंचायतीत तोच कित्ता गिरवणारे अनेक ग्रामसेवक राज्यभर आहेत. त्यांचीही चौकशी मोठ्या कालावधीसाठी सुरू राहते. तक्रारदाराला ‘मॅनेज’ करण्यापासून अनेक बाबी यात होतात आणि मूळ दोषी, मूळ दुखणे, झालेला अपहार तसाच राहतो. यातल्या एखाद्या दोषीचे निधन झाले तर मग विषयच संपला.

ग्रा. पं. कायद्यात सुधारणा हवीएकीकडे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असताना, जलजीवनच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असताना ग्रामपंचायतीकडे मात्र ज्याला अभियांत्रिकीचे, रस्ते बांधकामाचे, अर्थसाक्षरतेची संपूर्ण माहिती असू शकत नाही अशा ग्रामसेवक बंधू-भगिनींच्या खांद्यावर सर्व जबाबदारी टाकली जाते. आता ग्रामपंचायतीही तालुक्याच्या शहरासारख्या मोठ्या झाल्या आहेत. लोकसंख्या वाढली आहे, निधी वाढला, त्या तुलनेत मनुष्यबळ आणि तेही तांत्रिक वाढवण्याची गरज आहे. बदलत्या परिस्थितीत एकूणच ग्रामपंचायतीच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार