शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘मुद्रा’तील कर्जप्रकरणांची छाननी गरजेची---‘मुद्रा’चे वास्तव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:35 IST

समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेतून वितरित करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाची छाननी करणे आवश्यक असून, याबाबत अनेक तक्रारदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणार आहेत.‘लोकमत’ने गेले दोन दिवस या योजनेमधून अनेक प्रकरणे नवी जुनी करण्यात आल्याचा मुद्दा ...

ठळक मुद्देतक्रारदार एकवटले : पालकमंत्र्यांना घालणार साकडे; महादेव जाधव वाचनालयामार्फतही तक्रारी घेण्याचे काम-

समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेतून वितरित करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाची छाननी करणे आवश्यक असून, याबाबत अनेक तक्रारदार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणार आहेत.

‘लोकमत’ने गेले दोन दिवस या योजनेमधून अनेक प्रकरणे नवी जुनी करण्यात आल्याचा मुद्दा मांडला होता. अनेक ठिकाणी इच्छुकांना नीट माहिती दिली जात नाही, उद्धट उत्तरे दिली जातात, तारण आणि जामिनाची मागणी केली जाते, अशा अनेक तक्रारी होत्या. या योजनेच्या जाहिरातीप्रमाणे आपल्याला सुलभपणे कर्ज मिळेल अशी अनेकांची अपेक्षा असते. मात्र, सहा-सहा महिने फेऱ्या मारल्या तरीही कर्ज मिळत नसल्याचा अनुभव अनेकांनी मांडले.

एका डॉक्टर महिलेनेही आपण दवाखान्यासाठी दोन लाखांचे कर्ज मागितले असतानाही सहा महिने प्रयत्न केल्यानंतरही मिळाले नसल्याचा अनुभव सांगितला. पन्हाळा तालुक्यातील एका युवकाने ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार करूनही त्याची दाद घेतली नाही. उलट कर्जाचे तीन हप्ते थकल्यानंतर दुकानातील मालच बँकेने उचलून नेल्याची तक्रार केली आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडेही तक्रार केली आहे. अशा पद्धतीने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून अनेकांनी आपले ‘मुद्रा कर्जा’बाबतचे अनुभव मांडले.

टाकाळा येथील महादेव जाधव वाचनालयामार्फतही विजय जाधव आणि बाबा इंदुलकर यांनीही या योजनेअंतर्गत ज्यांना कर्ज मिळाले नाही अशांचे तक्रार अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरू केले आहे. हे सर्व अर्ज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार असून याबाबत जिल्हाधिकाºयांचीही भेट घेतली जाणार आहे. (समाप्त)कर्ज बुडाल्यास जबाबदार कोण?विना तारण, विना जामीन कर्ज देण्याचा आदेश शासनाने दिला. मात्र, एखाद्याचे कर्ज बुडाले तर ते भरून कोण देणार, असा प्रश्न एका बँकेच्या अधिकाºयाने उपस्थित केला. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ते म्हणाले, शासनाची ही योजना चांगली आहे. मात्र, विना जामीन आणि विना तारण कर्ज देताना ते वसूल झाले नाही तर ते कोण भरून देणार, याची स्पष्टता कुठेही शासन आदेशामध्ये नाही. ५० हजार पर्यंतच्या कर्जाला कुठलीही रक्कम भरून घेतली जात नाही. मात्र, त्यावरील रकमेचे कर्ज देताना ठरावीक रक्कम भरून घ्यावी, असे आदेशातच नमूद आहे. नवउद्योजकांना कर्ज द्यावे यासाठी बँकाही प्रयत्नशील असतात. मात्र, बँकेच्या कामकाजाचा भाग म्हणून काही कागदपत्रे आम्हाला घ्यावीच लागतात. 

नवउद्योजकांना कर्ज मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चांगली योजना सुरू केली. एका चांगल्या योजनेबाबतीत बँकांकडून अजूनही चांगले काम व्हावे अशी अपेक्षा असताना मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्याची दखल ‘लोकमत’ने घेतली आहे. आम्हीदेखील अशा तक्रारदारांच्या तक्रारी एकत्र करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकाºयांना भेटणार आहोत.- विजय जाधव, सरचिटणीस, भाजप, कोल्हापूर जिल्हा‘प्रधानमंत्री मुद्रा’ योजनेच्या माध्यमातून नवरोजगारांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली याबाबत नियमित आढावा घेतला जातो. अधिकाधिक कर्ज सुलभपणे उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.- राहुल माने,जिल्हा अग्रणी प्रबंधक