शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

भगवान महावीरांच्या तत्त्वांची गरज

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

उज्ज्वल निकम : दक्षिण भारत जैन सभेच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण

कोल्हापूर : इस्लामाबाद येथील भेटीत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मी निक्षून सांगितले होते की, दहशतवादाला आवरा, स्वत:ला सावरा; पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि हेच दुर्लक्ष पेशावरमधील घटनेने त्यांच्यावर उलटले. प्रबळ लोकशाही असलेल्या आपल्या देशाला अहिंसेची परंपरा आहे. दहशतवादाची सध्याची परिस्थिती पाहता भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज, रविवारी येथे केले. दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या अधिवेशनात विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरातील या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.उज्ज्वल निकम म्हणाले, अहिंसाप्रिय असल्याने आपण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सावरलो. भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी जैन बांधवांनी कार्यरत राहावे.श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जैन समाजातील परंपरा उल्लेखनीय आहे. अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले, कम्युनिस्ट असलो, तरी धर्मतत्त्वांचे पालन करणाऱ्यांना मानतो.कार्यक्रमात ‘करवीररत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचा विशेष सन्मान केला. सागर चौगुले, सुरेश रोटे, सुभाष चौगुले, डॉ. जे. एफ. पाटील, डी. सी. पाटील, नगरसेवक राजू लाटकर, अपर्णा आडके, किरण शिराळे, आदी उपस्थित होते. डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार बेळंके व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)यांचा झाला सन्मान...ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. साधना झाडबुके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जयकुमार उपाध्ये (नवी दिल्ली), मीना गरिबे (नाशिक), प्रा. धरणेंद्र कुरकुरी (कर्नाटक), डॉ. कुबेर मगदूम (इचलकरंजी), अजितकुमार भंडे (मालगाव), श्रीधर मेक्कळके (निपाणी), सुधा नेजे (भोज, कर्नाटक), वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.निकम म्हणाले...४ समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.४ समाजाच्या तत्त्वांचे पालन होते का, याबाबत अंतर्मुख व्हावे.४पैसा, श्रीमंती यांचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळून गरजूंना मदत करावी.४जैन समाजातील स्त्रियांना शिक्षणाकडे आकृष्ट करावे.४प्रत्येक ठिकाणी विशिष्ट संरक्षण, आरक्षणाचा न्यूनगंड बाजूला सारावा.