शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

कारभारात नियोजनबद्ध विकासाची गरज

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

इचलकरंजी नगरपालिका : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारभार सुधारणार का?

राजाराम पाटील -इचलकरंजी -येथील नगरपालिकेच्या कारभारात दोन्ही कॉँग्रेस व शहर विकास आघाडी, असे सर्वच सत्तेत असल्याने पालिकेच्या कामकाजाबाबत नियोजनबद्ध विकास साधण्याची व नागरी सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी स्वीकारावी. नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारभार सुधारण्यासाठी या सर्वांना आत्मकेंद्रित होण्याची हीच वेळ आहे.नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसचे बहुमत असले, तरी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेवर होती, तर शहर विकास आघाडी विरोधात होती. पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रीय कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ व ‘शविआ’चे १७ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले आणि त्यांच्या बंडास पाठिंबा दिल्याने ‘शविआ’ची भूमिका बदलली व ‘शविआ’सुद्धा सत्तेत आली.नगरपालिकेत सर्व सत्तेत आल्याने विरोधी पक्ष संपला आणि सत्तेवरील विरोधी पक्षाचा ‘अंकुश’ नाहीसा झाला. सर्वच नगरसेवक सत्तेत, त्यामुळे पालिकेमध्ये काही नगरसेवकांचा वावर वाढला. मर्जीनुसार कामे करून घेण्याचा सपाटा सुरू झाला आणि चार महिन्यांत बराचसा गोंधळ उडाला. या गोंधळात प्रशासनाचे फावले आणि हात धुऊन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि कारभाराचा बट्ट्याबोळ उडाला.अखेर ‘शविआ’ने हत्यार उपसून बांधकाम खात्याकडील कामकाजाच्या तक्रारी केल्या. नगरसेवक संतोष शेळके यांनी उपोषण केले. उपोषणाच्यानिमित्ताने पालिकेत आलेल्या आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेच्या प्रशासनास फैलावर घेतले. मुख्याधिकारी सुनील पवार यांना खडेबोल सुनावत मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे सूचित केले. आमदार हाळवणकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना हा अहवाल तयार करण्यास २१ मे रोजी सांगितले. त्याला दोन आठवडे उलटले, त्याचे काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.आगामी वर्षात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका पाहता नगरपालिकेचा कारभार सुधारून विकासकामे व नागरी सेवा देण्याचे काम नियोजनपूर्वक झाले आहे. त्यासाठी तिन्हीही (दोन्ही कॉँग्रेस व ‘शविआ’) घटक पक्षांच्या कारभाऱ्यांनी एकत्रित येऊन नगरपालिकेचे कामकाज सुधारण्याची गरज आहे. या वर्षभरात झालेल्या कामांच्या जोरावरच जनतेसमोर जाणे सोयीस्कर होणार असल्याने पक्षश्रेष्ठींनी आत्मकेंद्रित व्हावे आणि समन्वयाने विकासकामे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भुयारी गटारीच्या विशेष सभेचे काय?‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव व काही नगरसेवकांनी नवीन भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत तक्रार करीत मक्तेदाराची ठेव जप्त करावी, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली. या विषयावर विशेष सभा बोलविण्याचा प्रस्ताव २८ मे रोजी नगराध्यक्षांसमोर ठेवला. त्याचेही काय झाले, हाही प्रश्न गेले दहा दिवस ‘जैसे थे’ आहे.