शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

अशोक चौसाळकर : ‘मानवता की ओर’ अभियानाला प्रारंभ; पानसरे संघर्ष समितीचा पुढाकार

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी हे हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापन करण्यासाठी आयुष्यभर लढले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजातील प्र्रगतिशील घटकांनी सर्व झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. पानसरे समता संघर्ष समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानास बुधवारपासून प्रारंभ झाला. सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून, यादवनगर, राजारामपुरी, जनता बझार, मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर सकाळी सात वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’फेरी काढण्यात आली. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे तिघेही विचारवंत असत्याविरुद्ध लोकांना जागरूक करीत होते. हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापण्यासाठी प्रयत्न करीत होते. अजूनही त्यांचे हल्लेखोर सापडत नाहीत, ही खेदाची बाब आहे. गुन्हेगारांचा शोध सरकारने गांभीर्याने घेऊन दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी दूर व्हावी, भेदाविरुद्ध प्रबोधन, विवेकवादाचा प्रचार हा ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानाचा उद्देश आहे. उदय नारकर म्हणाले, जिल्ह्णात विविध ठिकाणी महाराष्ट्र अंनिस व समविचारी पक्ष, संस्था, संघटना आणि व्यक्तीतर्फे पानसरे समता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि.२० जुलै ते २० आॅगस्ट या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील विविध भागात सहा मॉर्निंग वॉक घेतले जातील. या फेरीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिलीप पवार, कृष्णात कोरे, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, तनुजा शिपूरकर, सतिश पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, अरुण पाटील, प्रकाश हिरेमठ, निशांत म्हेत्रे, प्रमोद शिंदे, अमोल कांबळे, गौतम कांबळे, सुजाता म्हेत्रे, मिनाज लाटकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लढेंगे तो जितेंगेबुधवारी सकाळी काढण्यात आलेल्या फेरीत ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया...’, ‘लाल सलाम...लाल सलाम... गोविंद पानसरे को लाल सलाम...’,‘लढेंगे तो जितेंगे...’अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘आम्ही प्रकाशबीजे..’, ‘तोड ही चाकोरी..’, ‘इसलिए राह संघर्ष की हम चुने..’ या चळवळींतील गाण्यांनी फेरीमध्ये चैतन्य आणले. ही फेरी मध्यवर्ती बसस्थानक चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा गायला.