शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

अशोक चौसाळकर : ‘मानवता की ओर’ अभियानाला प्रारंभ; पानसरे संघर्ष समितीचा पुढाकार

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी हे हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापन करण्यासाठी आयुष्यभर लढले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजातील प्र्रगतिशील घटकांनी सर्व झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. पानसरे समता संघर्ष समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानास बुधवारपासून प्रारंभ झाला. सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून, यादवनगर, राजारामपुरी, जनता बझार, मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर सकाळी सात वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’फेरी काढण्यात आली. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. चौसाळकर म्हणाले, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हे तिघेही विचारवंत असत्याविरुद्ध लोकांना जागरूक करीत होते. हिंसेच्या विरुद्ध मानवतावादी समाजरचना स्थापण्यासाठी प्रयत्न करीत होते. अजूनही त्यांचे हल्लेखोर सापडत नाहीत, ही खेदाची बाब आहे. गुन्हेगारांचा शोध सरकारने गांभीर्याने घेऊन दोषींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी दूर व्हावी, भेदाविरुद्ध प्रबोधन, विवेकवादाचा प्रचार हा ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानाचा उद्देश आहे. उदय नारकर म्हणाले, जिल्ह्णात विविध ठिकाणी महाराष्ट्र अंनिस व समविचारी पक्ष, संस्था, संघटना आणि व्यक्तीतर्फे पानसरे समता संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि.२० जुलै ते २० आॅगस्ट या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील विविध भागात सहा मॉर्निंग वॉक घेतले जातील. या फेरीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिलीप पवार, कृष्णात कोरे, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, तनुजा शिपूरकर, सतिश पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, अरुण पाटील, प्रकाश हिरेमठ, निशांत म्हेत्रे, प्रमोद शिंदे, अमोल कांबळे, गौतम कांबळे, सुजाता म्हेत्रे, मिनाज लाटकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लढेंगे तो जितेंगेबुधवारी सकाळी काढण्यात आलेल्या फेरीत ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया...’, ‘लाल सलाम...लाल सलाम... गोविंद पानसरे को लाल सलाम...’,‘लढेंगे तो जितेंगे...’अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘आम्ही प्रकाशबीजे..’, ‘तोड ही चाकोरी..’, ‘इसलिए राह संघर्ष की हम चुने..’ या चळवळींतील गाण्यांनी फेरीमध्ये चैतन्य आणले. ही फेरी मध्यवर्ती बसस्थानक चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळ आल्यावर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा गायला.