शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज : अभिजित कापसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:05 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये आपले नागरिकत्व काढून घेतले जाणार की काय, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अभिजित कापसे यांनी येथे केले.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज : अभिजित कापसेमहावीर महाविद्यालयात व्याख्यान

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये आपले नागरिकत्व काढून घेतले जाणार की काय, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. अभिजित कापसे यांनी येथे केले.येथील महावीर महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. रणजित गावडे, तर महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, संस्थेचे कार्यवाह महावीर देसाई प्रमुख उपस्थित होते. व्याख्यानाचा विषय ‘भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९’ असा होता.

अ‍ॅड. कापसे म्हणाले, धार्मिक अत्याचाराला कंटाळूनच पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून हिंदू, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन समाजाचे अल्पसंख्याक लोक भारतात आले. त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सन १९५५ मध्ये नागरिकत्व कायदा अंमलात आला. आतापर्यंत पाच वेळा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.

दि. १० जानेवारी २०२० पासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला. सध्या भारतात असणाऱ्या अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे; पण कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही.

या व्याख्यानास राष्ट्रीय छात्रसेनेचे लेफ्टनंट उमेश वांगदरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी स्वागत केले. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शैलजा मंडले, प्रा. प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. लेफ्टनंट डॉ. सुजाता पाटील यांनी आभार मानले.समाजमनाने ठरवायचे असतेमहापौर लाटकर म्हणाल्या, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात रोज सोशल मीडियावर माहिती येत असते. अनेकदा आपण ही माहिती न वाचता पुढे पाठवितो. त्यामुळे वाद निर्माण होतात. कायदा ‘तारक की मारक’ हे समाजमनाने ठरवायचे असते.

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर