शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:43 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर करण्याचा पर्याय आता गावागावांत स्वीकारण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण वाचले पाहिजे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने कृतिशील पाऊल उचलल्यास ते निश्चितच अनुकरणीय होणार आहे.हिंदू समाजामध्ये पार्थिव दहन करण्याची प्रथा आहे. यासाठी किमान १२ मण लाकडे अंत्यसंस्कारासाठी वापरली जातात. सध्या १५० ते १७५ रुपये मण दराने ही लाकडे आणली जातात. पावसाळ्यामध्ये वाळलेली लाकडे मिळतानाही अडचणी येतात. तसेच पावसामुळे स्मशानभूमीकडे ही लाकडे नेणे अडचणीचे ठरते.एवढे करूनही रॉकेलच्या दोन बाटल्या, चार-पाच किलो मीठही सोबत न्यावे लागते. अग्नी दिल्यानंतर घरची मंडळी गेल्यानंतर मग लाकडांवर रॉकेल शिंपडून तसेच नंतर मीठ मारून नीट दहन होईल, अशी व्यवस्था केली जाते. जर लाकडे अर्धवट ओली असतील तर आणखी निराळ्याच अडचणी निर्माण होतात. अनेकांना हे लाकडांचे १८०० ते २००० रुपयेही देणे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.सध्या कोल्हापूरमध्ये महापालिका टेंडर काढून शेणींची खरेदी करते. एक शेणी ५0 पैशांना पडते. अनेकदा तरुण मंडळे लाखो शेणी स्मशानभूमीला दान देत असतात. हीच पद्धत ग्रामीण भागामध्येही वापरता येईल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर एवढ्या शेणी उपलब्ध होतात, तर ग्रामीण भागामध्ये त्या सहज उपलब्ध होणार आहेत.सध्या ज्या पद्धतीने चिता रचण्यासाठी लाकडे लावली जातात, त्याच पद्धतीने हवा खेळती राहील अशा पद्धतीने शेणी लावल्या की पार्थिवाचे दहन होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अशी पद्धत अवलंबल्यामुळे एकीकडे लाकडेही कमी लागणार असून, त्यामुळे खर्चही कमी येणार आहे.काय आहेकोल्हापूर पॅटर्न...कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मृतदेहांसाठी मोफत दहन व्यवस्था गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे. नगरसेवकांचे पत्र आणल्यानंतर या ठिकाणी मोफत दहन केले जाते. एका पार्थिवासाठी सुरुवातीला खाली तीन मणाचे मोठे कंडे ठेवले जातात. त्यावर पार्थिव ठेवल्यानंतर ४०० ते ५०० शेणींनी ते झाकले जाते. खाली लवकर तापणाऱ्या विटा असल्याने २० रुपयांचा कापूर शेणींवर ठेवून पेटविला की केवळ पंधरा मिनिटांमध्ये चिता पेटायला लागते. शेणींमधून खेळणाºया वाºयामुळे अग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थितपणे दहन होते.रॉकेल नको की टायर नकोबहुतांश ठिकाणी अंत्यसंस्कारांवेळी रॉकेल आणि टायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लाकडे नीट वाळली नसतील तर चिता लवकर पेटत नाही. त्यासाठी मग गाड्यांचे टायर वापरले जातात. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर अंत्यसंस्कारांचे साहित्य देतानाच सोबत दोन-तीन सायकलींचे, गाडीचे टायरही दिले जातात. मात्र शेणींचा वापर केल्यास रॉकेल, टायर काहीही लागत नाही.लाकडांचा खर्च २०००,तर शेणींचा ७०० रुपयेअंत्यसंस्कारासाठी किमान १२ मण लाकडे लागतात. म्हणजे १८०० रुपये आणि ट्रॉलीचे भाडे असा २००० रुपये खर्च येतो; तर दुसरीकडे शेणी लावल्या तर तीन मण लाकडांचे ४५० रुपये आणि ५० पैशांना एक शेणी अशा ५०० शेणींचे २५० रुपये असे ७०० रुपयांमध्ये शेणी लावून अंत्यसंस्कार होऊ शकतात. या ठिकाणी विषय केवळ पैशांचा नसला तरी लाकडांच्या कमतरतेमुळे यापुढील काळात ही शेणींची पद्धत अवलंबणे आवश्यक ठरणार आहे.