शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:43 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर करण्याचा पर्याय आता गावागावांत स्वीकारण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण वाचले पाहिजे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने कृतिशील पाऊल उचलल्यास ते निश्चितच अनुकरणीय होणार आहे.हिंदू समाजामध्ये पार्थिव दहन करण्याची प्रथा आहे. यासाठी किमान १२ मण लाकडे अंत्यसंस्कारासाठी वापरली जातात. सध्या १५० ते १७५ रुपये मण दराने ही लाकडे आणली जातात. पावसाळ्यामध्ये वाळलेली लाकडे मिळतानाही अडचणी येतात. तसेच पावसामुळे स्मशानभूमीकडे ही लाकडे नेणे अडचणीचे ठरते.एवढे करूनही रॉकेलच्या दोन बाटल्या, चार-पाच किलो मीठही सोबत न्यावे लागते. अग्नी दिल्यानंतर घरची मंडळी गेल्यानंतर मग लाकडांवर रॉकेल शिंपडून तसेच नंतर मीठ मारून नीट दहन होईल, अशी व्यवस्था केली जाते. जर लाकडे अर्धवट ओली असतील तर आणखी निराळ्याच अडचणी निर्माण होतात. अनेकांना हे लाकडांचे १८०० ते २००० रुपयेही देणे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.सध्या कोल्हापूरमध्ये महापालिका टेंडर काढून शेणींची खरेदी करते. एक शेणी ५0 पैशांना पडते. अनेकदा तरुण मंडळे लाखो शेणी स्मशानभूमीला दान देत असतात. हीच पद्धत ग्रामीण भागामध्येही वापरता येईल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर एवढ्या शेणी उपलब्ध होतात, तर ग्रामीण भागामध्ये त्या सहज उपलब्ध होणार आहेत.सध्या ज्या पद्धतीने चिता रचण्यासाठी लाकडे लावली जातात, त्याच पद्धतीने हवा खेळती राहील अशा पद्धतीने शेणी लावल्या की पार्थिवाचे दहन होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अशी पद्धत अवलंबल्यामुळे एकीकडे लाकडेही कमी लागणार असून, त्यामुळे खर्चही कमी येणार आहे.काय आहेकोल्हापूर पॅटर्न...कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मृतदेहांसाठी मोफत दहन व्यवस्था गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे. नगरसेवकांचे पत्र आणल्यानंतर या ठिकाणी मोफत दहन केले जाते. एका पार्थिवासाठी सुरुवातीला खाली तीन मणाचे मोठे कंडे ठेवले जातात. त्यावर पार्थिव ठेवल्यानंतर ४०० ते ५०० शेणींनी ते झाकले जाते. खाली लवकर तापणाऱ्या विटा असल्याने २० रुपयांचा कापूर शेणींवर ठेवून पेटविला की केवळ पंधरा मिनिटांमध्ये चिता पेटायला लागते. शेणींमधून खेळणाºया वाºयामुळे अग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थितपणे दहन होते.रॉकेल नको की टायर नकोबहुतांश ठिकाणी अंत्यसंस्कारांवेळी रॉकेल आणि टायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लाकडे नीट वाळली नसतील तर चिता लवकर पेटत नाही. त्यासाठी मग गाड्यांचे टायर वापरले जातात. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर अंत्यसंस्कारांचे साहित्य देतानाच सोबत दोन-तीन सायकलींचे, गाडीचे टायरही दिले जातात. मात्र शेणींचा वापर केल्यास रॉकेल, टायर काहीही लागत नाही.लाकडांचा खर्च २०००,तर शेणींचा ७०० रुपयेअंत्यसंस्कारासाठी किमान १२ मण लाकडे लागतात. म्हणजे १८०० रुपये आणि ट्रॉलीचे भाडे असा २००० रुपये खर्च येतो; तर दुसरीकडे शेणी लावल्या तर तीन मण लाकडांचे ४५० रुपये आणि ५० पैशांना एक शेणी अशा ५०० शेणींचे २५० रुपये असे ७०० रुपयांमध्ये शेणी लावून अंत्यसंस्कार होऊ शकतात. या ठिकाणी विषय केवळ पैशांचा नसला तरी लाकडांच्या कमतरतेमुळे यापुढील काळात ही शेणींची पद्धत अवलंबणे आवश्यक ठरणार आहे.