शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अंत्यसंस्कारासाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:43 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ग्रामीण भागातील अंत्यसंस्कारावेळच्या अडचणींचा विचार करता, कोल्हापूर महापालिकेप्रमाणे लाकडांऐवजी शेणींचा वापर करण्याचा पर्याय आता गावागावांत स्वीकारण्याची गरज आहे. केवळ पर्यावरण वाचले पाहिजे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीने कृतिशील पाऊल उचलल्यास ते निश्चितच अनुकरणीय होणार आहे.हिंदू समाजामध्ये पार्थिव दहन करण्याची प्रथा आहे. यासाठी किमान १२ मण लाकडे अंत्यसंस्कारासाठी वापरली जातात. सध्या १५० ते १७५ रुपये मण दराने ही लाकडे आणली जातात. पावसाळ्यामध्ये वाळलेली लाकडे मिळतानाही अडचणी येतात. तसेच पावसामुळे स्मशानभूमीकडे ही लाकडे नेणे अडचणीचे ठरते.एवढे करूनही रॉकेलच्या दोन बाटल्या, चार-पाच किलो मीठही सोबत न्यावे लागते. अग्नी दिल्यानंतर घरची मंडळी गेल्यानंतर मग लाकडांवर रॉकेल शिंपडून तसेच नंतर मीठ मारून नीट दहन होईल, अशी व्यवस्था केली जाते. जर लाकडे अर्धवट ओली असतील तर आणखी निराळ्याच अडचणी निर्माण होतात. अनेकांना हे लाकडांचे १८०० ते २००० रुपयेही देणे परवडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.सध्या कोल्हापूरमध्ये महापालिका टेंडर काढून शेणींची खरेदी करते. एक शेणी ५0 पैशांना पडते. अनेकदा तरुण मंडळे लाखो शेणी स्मशानभूमीला दान देत असतात. हीच पद्धत ग्रामीण भागामध्येही वापरता येईल. कोल्हापूरसारख्या ठिकाणी जर एवढ्या शेणी उपलब्ध होतात, तर ग्रामीण भागामध्ये त्या सहज उपलब्ध होणार आहेत.सध्या ज्या पद्धतीने चिता रचण्यासाठी लाकडे लावली जातात, त्याच पद्धतीने हवा खेळती राहील अशा पद्धतीने शेणी लावल्या की पार्थिवाचे दहन होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अशी पद्धत अवलंबल्यामुळे एकीकडे लाकडेही कमी लागणार असून, त्यामुळे खर्चही कमी येणार आहे.काय आहेकोल्हापूर पॅटर्न...कोल्हापूर महापालिकेच्या वतीने मृतदेहांसाठी मोफत दहन व्यवस्था गेली अनेक वर्षे राबविण्यात येत आहे. नगरसेवकांचे पत्र आणल्यानंतर या ठिकाणी मोफत दहन केले जाते. एका पार्थिवासाठी सुरुवातीला खाली तीन मणाचे मोठे कंडे ठेवले जातात. त्यावर पार्थिव ठेवल्यानंतर ४०० ते ५०० शेणींनी ते झाकले जाते. खाली लवकर तापणाऱ्या विटा असल्याने २० रुपयांचा कापूर शेणींवर ठेवून पेटविला की केवळ पंधरा मिनिटांमध्ये चिता पेटायला लागते. शेणींमधून खेळणाºया वाºयामुळे अग्नी प्रज्वलित होऊन व्यवस्थितपणे दहन होते.रॉकेल नको की टायर नकोबहुतांश ठिकाणी अंत्यसंस्कारांवेळी रॉकेल आणि टायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लाकडे नीट वाळली नसतील तर चिता लवकर पेटत नाही. त्यासाठी मग गाड्यांचे टायर वापरले जातात. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी तर अंत्यसंस्कारांचे साहित्य देतानाच सोबत दोन-तीन सायकलींचे, गाडीचे टायरही दिले जातात. मात्र शेणींचा वापर केल्यास रॉकेल, टायर काहीही लागत नाही.लाकडांचा खर्च २०००,तर शेणींचा ७०० रुपयेअंत्यसंस्कारासाठी किमान १२ मण लाकडे लागतात. म्हणजे १८०० रुपये आणि ट्रॉलीचे भाडे असा २००० रुपये खर्च येतो; तर दुसरीकडे शेणी लावल्या तर तीन मण लाकडांचे ४५० रुपये आणि ५० पैशांना एक शेणी अशा ५०० शेणींचे २५० रुपये असे ७०० रुपयांमध्ये शेणी लावून अंत्यसंस्कार होऊ शकतात. या ठिकाणी विषय केवळ पैशांचा नसला तरी लाकडांच्या कमतरतेमुळे यापुढील काळात ही शेणींची पद्धत अवलंबणे आवश्यक ठरणार आहे.