शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

बालकामगारमुक्तीसाठी इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: December 6, 2015 01:32 IST

लक्ष्मीकांत देशमुख : ‘अवनि’ च्या ‘प्रकाशाची वीस वर्षे’ चे प्रकाशन

कोल्हापूर : बालकामगार कायदे सक्षम आहेत; पण त्याची अंमलबजावणी ताकदीने होत नसल्याने सध्या समाजातील विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. बालकामगारमुक्तभारत होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून, कायदा दुरुस्तीत उद्योगपती सरकारवर दबाव टाकतील का? याची चिंता वाटत असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ‘अवनि’चे पथदर्शी काम असून, सरकारचे काम ही संस्था करीत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी यावेळी काढले. ‘अवनि’च्या ‘प्रकाशाची वीस वर्षे’या स्मरणिकेचे प्रकाशन व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॅनडा सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी होते. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजाच्या बधिरतेमुळे बालकामगारांची संख्या वाढत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आजही जास्त विडी वळणाऱ्या महिलांना चांगली स्थळे येतात. गरिबी हे जरी बालमजुरीचे प्रमुख कारण असले, तरी भारतीयांच्या मानसिकतेमुळे हे प्रमाण वाढत आहे. घरात ज्या चैनीच्या वस्तू हाताळतो, त्यामागे बालकामगारांचे श्रम व रक्त सांडले, याचा विसर आपणाला पडतो. ‘जो शाळेत जात नाही तो बालकामगार’ या शांता सेन यांच्या मताशी आपण सहमत असून, केंद्राने ‘आरटीई’ कायदा आणला; पण त्याचा वापर होत नाही. शाहू महाराजांनी जे काम शंभर वर्षांपूर्वी केले ते आज होत नाही. याला मतपेटीचे राजकारण जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘अवनि’ संस्था उत्पादित करणारे नागरिक घडवित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. ‘अवनि’च्या कामाचे कौतुक करीत अनुराधा भोसले यांनी आपल्या कामाच्या बळावर संपूर्ण देशात नावलौकिक केल्याचे डॉ. जगन्नाथ वाणी यांनी सांगितले. अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविकात वीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, हणबरवाडी (ता. करवीर) येथे संस्थेच्या मुलीसाठी बालसंकुलाचे भूमिपूजन डॉ. वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेला मदत करणाऱ्यांचा ‘कृतज्ञता सत्कार’ करण्यात आला. स्कॉट तपोरा, प्रा. अरुण चव्हाण, अरुंधती महाडिक, डॉ. सूरज पवार, अरुण नरके, प्रफुल्ल शिरगावे, गणी आजरेकर, संजय पाटील, आदी उपस्थित होते.