शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

बालकामगारमुक्तीसाठी इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: December 6, 2015 01:32 IST

लक्ष्मीकांत देशमुख : ‘अवनि’ च्या ‘प्रकाशाची वीस वर्षे’ चे प्रकाशन

कोल्हापूर : बालकामगार कायदे सक्षम आहेत; पण त्याची अंमलबजावणी ताकदीने होत नसल्याने सध्या समाजातील विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. बालकामगारमुक्तभारत होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून, कायदा दुरुस्तीत उद्योगपती सरकारवर दबाव टाकतील का? याची चिंता वाटत असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ‘अवनि’चे पथदर्शी काम असून, सरकारचे काम ही संस्था करीत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी यावेळी काढले. ‘अवनि’च्या ‘प्रकाशाची वीस वर्षे’या स्मरणिकेचे प्रकाशन व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॅनडा सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी होते. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजाच्या बधिरतेमुळे बालकामगारांची संख्या वाढत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आजही जास्त विडी वळणाऱ्या महिलांना चांगली स्थळे येतात. गरिबी हे जरी बालमजुरीचे प्रमुख कारण असले, तरी भारतीयांच्या मानसिकतेमुळे हे प्रमाण वाढत आहे. घरात ज्या चैनीच्या वस्तू हाताळतो, त्यामागे बालकामगारांचे श्रम व रक्त सांडले, याचा विसर आपणाला पडतो. ‘जो शाळेत जात नाही तो बालकामगार’ या शांता सेन यांच्या मताशी आपण सहमत असून, केंद्राने ‘आरटीई’ कायदा आणला; पण त्याचा वापर होत नाही. शाहू महाराजांनी जे काम शंभर वर्षांपूर्वी केले ते आज होत नाही. याला मतपेटीचे राजकारण जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘अवनि’ संस्था उत्पादित करणारे नागरिक घडवित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. ‘अवनि’च्या कामाचे कौतुक करीत अनुराधा भोसले यांनी आपल्या कामाच्या बळावर संपूर्ण देशात नावलौकिक केल्याचे डॉ. जगन्नाथ वाणी यांनी सांगितले. अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविकात वीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, हणबरवाडी (ता. करवीर) येथे संस्थेच्या मुलीसाठी बालसंकुलाचे भूमिपूजन डॉ. वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेला मदत करणाऱ्यांचा ‘कृतज्ञता सत्कार’ करण्यात आला. स्कॉट तपोरा, प्रा. अरुण चव्हाण, अरुंधती महाडिक, डॉ. सूरज पवार, अरुण नरके, प्रफुल्ल शिरगावे, गणी आजरेकर, संजय पाटील, आदी उपस्थित होते.