शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाचनसंस्कृती वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे

By admin | Updated: April 23, 2016 01:43 IST

जागतिक पुस्तक दिन : गावोगावी ग्रंथालये विकसित करायला हवीत

संतोष तोडकर -- कोल्हापूर --जगप्रसिद्ध लेखक शेक्सपिअरचा जन्मदिन म्हणजे २३ एप्रिल हा दिवस ‘युनोस्को’ने सन १९९५ पासून जगभर ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा साजरा केला जावा, असे जाहीर केले. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणाऱ्या या चळवळीला यावर्षी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे तसेच वाचनसंस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागील पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरांतून ऐकायला मिळते. ती गोष्ट काही अंशी सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक, चित्रपट, नाटके, सोशल मीडिया, स्मार्टफोन आदी मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबलाटात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे. म्हणून या माध्यमाचा गरजेपुरता वापर कसा करावा हे जाणीवपूर्वक शिकावे लागेल. लहानपणापासूनच मुलांना वाचनाची गोडी लावायला हवी. चित्रमय भाषेकडून ग्रंथभाषेकडे त्यांना आकर्षित करायला हवे. वाचन समृद्ध असल्यास कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सर्जनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव, त्यास आवश्यक असणारे संवेदनशील मनास खतपाणी मिळते. खऱ्या अर्थाने मानवतेचे मूल्य अंगी बाणण्यास मदत होते.कमी होत असलेली वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्णात सहाशेहून अधिक ग्रंथालयांमध्ये लाखो पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेक दुर्मीळ ग्रंथ जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यांचा वापर करायला हवा. ‘ग्रंथ आपुल्या दारी’ यासारखे उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात यायला हवेत. खेडोपाडी आणि दुर्गम भागांत असलेल्या शाळा आणि तेथील विद्यार्थ्यांपर्यंत शाळेच्या अभ्यासाखेरीज अन्य विविध विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणात पोहोचली पाहिजेत. यातून वाचनसंस्कृती नक्कीच वाढीस लागेल. आजच्या काळात एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास, संवादहीन भवताल यातून निर्माण होणारी नैराश्यता यावर उपाय म्हणून वाचनाकडे वळणे महत्त्वाचे वाटते. चौफेर वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकास होण्यास तसेच ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यास मदत होते. प्रत्येकाने स्वत:चे वैयक्तिक ग्रंथालय विकसीत करावे.- युवराज कदम (संकल्पक- वाचन कट्टा ) सध्या पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यक्तिमत्त्व विकास, प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे, आरोग्यविषयक पुस्तक ांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. तरुणांमध्येही वाचनाचे प्रमाण वाढत आहे; परंतु साहित्य, कथा-कादंबऱ्यांपेक्षा करिअर, स्पर्धा परीक्षा या विषयावरील पुस्तकांची मागणी त्यांच्याकडून केली जाते.- अलोक जोशी, (अक्षर दालन)