शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राष्ट्रवादीची भूमिका लवकरच ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2015 00:43 IST

महापालिका : १७ रोजी काँग्रेसची बैठक शक्य

सांगली : काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेत निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. येत्या डिसेंबरअखेरीपर्यंत राष्ट्रवादीची भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच आ. पतंगराव कदम व विश्वजित कदमही नगरसेवकांना एकसंध करण्यासाठी बैठक घेणार आहेत. ही बैठक १७ डिसेंबर रोजी होणार असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी सांगितले. महापालिकेत मदन पाटील यांचा गट सर्वात मोठा आहे. आजअखेर याच गटाकडे पालिकेची सूत्रे राहिली आहेत. महापौर पदापासून ते अगदी सभापती पदापर्यंत सर्व पदे मदनभाऊ गटाकडे आहेत. पण त्यांच्या निधनाने पालिकेतील राजकारण बदलले आहे. गेल्या वर्षभरात मदनभाऊ व राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात सूर जुळले होते. जयंतरावांनीही मदनभाऊ गटाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीच्या निर्णयात आपला सहभाग असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मदनभाऊ गटानेही जयंतरावांशी राजकीय वैर विसरून एकत्र येण्याची मानसिक तयारी चालविली आहे. त्याला काहींचा विरोध आहे. या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरात पालिकेतील राजकारणाची दिशा ठरणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून काम करीत आहे. हीच भूमिका कायम ठेवून मदनभाऊ गटाला सहकार्य करण्यात येणार आहे. मध्यंतरी जयंतराव पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात बैठक होणार असल्याची चर्चा होती. पण आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादीकडून डिसेंबरअखेरपर्यंत भूमिका स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनी काँग्रेस नगरसेवकांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पतंगरावांनी हिवाळी अधिवेशनानंतर नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार १७ डिसेंबर रोजी महापौरांच्या फार्म हाऊसवर बैठक होण्याची शक्यता आहे. महापौर विवेक कांबळे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)कदमांनी कंबर कसली या घडामोडीतच आता पतंगराव कदम व विश्वजित कदम यांनीही उडी घेतली आहे. कदम पिता-पुत्रानी पालिकेवरील काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. पतंगरावांनीही वेळप्रसंगी जयंतरावांना सोबत घेण्याची तयारी चालविली आहे.