शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

राष्ट्रवादी नगरपालिका स्वबळावर लढणार : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:25 IST

निरीक्षकांच्याही नियुक्त्या : उमेदवारी मागणी अर्जांचे वाटप सुरू

कोल्हापूर : मित्रपक्ष सोबत आले तर ठीक; अन्यथा नऊ नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरपालिकेसाठी पक्षाच्या उमेदवारी मागणीच्या अर्जांचे वाटप सुरू झाले असून, बुधवारी एकाच दिवशी तब्बल ८०१ जणांनी अर्ज नेल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेच्या २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पन्हाळा वगळता सर्व जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १०९ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते. यावेळेला मित्रपक्ष सोबत राहावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. ते सोबत आले तर ठीक; अन्यथा स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पक्षाने केल्याची माहिती ए. वाय. पाटील यांनी दिली. कागल, मुरगूड, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नगरपालिकांसाठी इच्छुक असणाऱ्यांना प्रदेश राष्ट्रवादीकडून आलेले विहित नमुन्यातील अर्ज आज, गुरुवारपासून रविवार (दि. २३)पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत. अर्ज भरून पक्ष कार्यालयाकडे पाठविण्याची मुदत २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत आहे. ही निवडणूक प्रक्रिया प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील व जिल्हा निरीक्षक अनिलराव साळोखे यांच्या नियंत्रणाखाली राबविली जाणार असून, त्याशिवाय नगरपालिकानिहाय सहायक निरीक्षकांची नेमणूक केल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळोखे उपस्थित होते. विनय कोरेंसोबत आज चर्चा ! ‘जनसुराज्य’ पक्ष हा आमचा पारंपरिक मित्रपक्ष आहे. ते या निवडणुकीत आमच्याबरोबर राहतील, असे वाटते. याबाबत आज आमदार हसन मुश्रीफ हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.