शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वळंजूंसमोर नवख्यांचे ‘आव्हान’

By admin | Updated: October 22, 2015 00:53 IST

लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा : सहाजण रिंगणात; साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब

कोल्हापूर : शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासमोर नवख्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या प्रभागात सहा उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख पक्षासह अपक्षही रिंंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची विजयी होण्यासाठी कसोटी लागणार आहे. प्रभागात शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब होणार आहे. लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.प्रभागात राष्ट्रवादीकडून शादाब नजमल अत्तार, काँग्रेसकडून दत्ता दौलतराव कांबळे, शिवसेनेकडून नियाज असिफ खान, ताराराणी आघाडीकडून नंदकुमार आनंदराव वळंजू, तर अपक्ष म्हणून निहाल फिरोज खान, अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सचिन मारुती सोनटक्के निवडणूक रिंगणात आहेत. वळंजू सन १९९५ ते २००० मध्ये जुना राजवाडा प्रभागातून नगरसेवक होते. २००० ते २००५ अखेर शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागातून ते नगरसेवक होते. २००० साली त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली. वीस महिने ते महापौरपदावर होते. याशिवाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. नगरसेवक, महापौर, बाजार समितीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले असल्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी जिंकण्यासाठी सोपी आहे, असा त्यांचा दावा आहे. यावेळी ते ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत. अनेक निवडणूक लढविण्याचा आणि जिंकण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार महाडिक यांची रसद मिळणार आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेले कांबळे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. समाजकारण आणि राजकारण यामध्ये रस असल्यामुळे सन २००० मध्ये वाहकपदाचा राजीनामा देऊन पहिल्यांदाच महापालिका निवडणूक रिंंगणात उतरले; पण यश मिळाले नाही. सातत्याने समाजकारणात सक्रिय राहिले. प्रभागातील लोकांच्या अडचणी समजावून घेणे, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रभागात त्यांचा संपर्कही चांगला आहे. काँग्रेससोबत असणाऱ्या पारंपरिक मतदारांची संख्या प्रभागात आहे. वळंजू यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे यावेळी मला संधी आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीकडून शादाब अत्तार रिंगणात आहेत. पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही संपर्क चांगला आहे. प्रभागात मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. अत्तार हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे फायदा होणार आहे. महापौर वळंजू यांच्या विरोधात अत्तार यांना निवडून आणण्यासाठी अत्तार यांच्यासाठी पक्षानेही ताकद लावली आहे. शिवसेनेकडून नियाज खान रिंगणात आहेत. तेही मुस्लिम समाजाचेच आहेत. त्यामुळे अत्तार आणि नियाज यांच्यात समाजाची मते मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. प्रभागात शिवसेनेचीही ताकद आहे, त्याचाही फायदा नियाज यांना होणार आहे. अपक्ष म्हणून निहाल खानही लढत आहेत. मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या समाजाची मतांमध्ये विभागणी होणार आहे. रिंगणातील सर्वच उमेदवार मीच निवडून येणार, असा दावा करीत आहेत. बिग फाईटप्रभागात ४ हजार २०० मतदार आहेत. मुस्लिम ४५०, ढोर ३५०, मराठा ९००, डोंबारी ६५०, वीरशैव कक्कय्या ७५०, ब्राह्मण ६०० असे सर्वसाधारपणे मतदार आहेत. झोपडपट्टीत साडेसातशे मतदार आहेत. तेथे शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप करून गठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जाते.