शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

वळंजूंसमोर नवख्यांचे ‘आव्हान’

By admin | Updated: October 22, 2015 00:53 IST

लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा : सहाजण रिंगणात; साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब

कोल्हापूर : शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासमोर नवख्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. या प्रभागात सहा उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख पक्षासह अपक्षही रिंंगणात असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची विजयी होण्यासाठी कसोटी लागणार आहे. प्रभागात शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब होणार आहे. लढतीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.प्रभागात राष्ट्रवादीकडून शादाब नजमल अत्तार, काँग्रेसकडून दत्ता दौलतराव कांबळे, शिवसेनेकडून नियाज असिफ खान, ताराराणी आघाडीकडून नंदकुमार आनंदराव वळंजू, तर अपक्ष म्हणून निहाल फिरोज खान, अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सचिन मारुती सोनटक्के निवडणूक रिंगणात आहेत. वळंजू सन १९९५ ते २००० मध्ये जुना राजवाडा प्रभागातून नगरसेवक होते. २००० ते २००५ अखेर शास्त्रीनगर-जवाहरनगर प्रभागातून ते नगरसेवक होते. २००० साली त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी मिळाली. वीस महिने ते महापौरपदावर होते. याशिवाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. नगरसेवक, महापौर, बाजार समितीचे संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले असल्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी जिंकण्यासाठी सोपी आहे, असा त्यांचा दावा आहे. यावेळी ते ताराराणी आघाडीकडून निवडणूक लढवीत आहेत. अनेक निवडणूक लढविण्याचा आणि जिंकण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार महाडिक यांची रसद मिळणार आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसकडून रिंगणात असलेले कांबळे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. समाजकारण आणि राजकारण यामध्ये रस असल्यामुळे सन २००० मध्ये वाहकपदाचा राजीनामा देऊन पहिल्यांदाच महापालिका निवडणूक रिंंगणात उतरले; पण यश मिळाले नाही. सातत्याने समाजकारणात सक्रिय राहिले. प्रभागातील लोकांच्या अडचणी समजावून घेणे, मदतीला धावून जाणे असा त्यांचा स्वभाव आहे. प्रभागात त्यांचा संपर्कही चांगला आहे. काँग्रेससोबत असणाऱ्या पारंपरिक मतदारांची संख्या प्रभागात आहे. वळंजू यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे यावेळी मला संधी आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीकडून शादाब अत्तार रिंगणात आहेत. पक्षाच्या माध्यमातून त्यांचाही संपर्क चांगला आहे. प्रभागात मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. अत्तार हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे फायदा होणार आहे. महापौर वळंजू यांच्या विरोधात अत्तार यांना निवडून आणण्यासाठी अत्तार यांच्यासाठी पक्षानेही ताकद लावली आहे. शिवसेनेकडून नियाज खान रिंगणात आहेत. तेही मुस्लिम समाजाचेच आहेत. त्यामुळे अत्तार आणि नियाज यांच्यात समाजाची मते मिळवण्यासाठी रस्सीखेच होणार आहे. प्रभागात शिवसेनेचीही ताकद आहे, त्याचाही फायदा नियाज यांना होणार आहे. अपक्ष म्हणून निहाल खानही लढत आहेत. मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या समाजाची मतांमध्ये विभागणी होणार आहे. रिंगणातील सर्वच उमेदवार मीच निवडून येणार, असा दावा करीत आहेत. बिग फाईटप्रभागात ४ हजार २०० मतदार आहेत. मुस्लिम ४५०, ढोर ३५०, मराठा ९००, डोंबारी ६५०, वीरशैव कक्कय्या ७५०, ब्राह्मण ६०० असे सर्वसाधारपणे मतदार आहेत. झोपडपट्टीत साडेसातशे मतदार आहेत. तेथे शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप करून गठ्ठा मतदानासाठी ताकद लावली जाते.