शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नववीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणार

By admin | Updated: May 22, 2015 00:10 IST

आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात : यावर्षीपासूनच होणार अंमलबजावणी, प्रश्नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिका’ संबोधले जाणार

भरत शास्त्री- बाहुबली --शालेय जीवनात घोकमपट्टीऐवजी कृतिशील शिक्षणाबाबत शासन आग्रही आहे. मुलांचा मानसिक, बौद्धिक व भाषिक विकास झाला पाहिजे, या दृष्टीने आगामी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत शाळांना कळविले जाणार आहे.सध्याच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये घोकमपट्टी व पाठांतरावर आधारित प्रश्नावली आहेत. त्यामध्ये मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. स्वत:चे भाषिक कौशल्य दाखवण्याचे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे मुलांचा भाषा विषयाबद्दल भाषिक वैचारिक विकास होताना दिसत नाही. चाकोरीबद्ध प्रश्न व त्याची ठरलेली उत्तरे, असेच सध्याचे स्वरूप आहे. या सर्व पारंपरिक पद्धती बंद करून कृतियुक्त शिक्षणावर शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपांमध्ये बदल. सुधारित कृतिपत्रिकेमध्ये वाचन, लेखन, ज्ञान, उपयोजन, आकलन, अनुवाद, विश्लेषण, संश्लेषण, स्मरण व रसग्रह या कौशल्यांचा अंतर्भाव केला आहे. शिवाय कृतिपत्रिकेमध्ये विविध विभागांच्या माध्यमातून बुद्धीला चालना देणारे, स्वप्रतिसादात्मक बौद्धिक, मानसिक व भाषिक विकासात्मक, अशा कृतियुक्त प्रश्नांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे चार्ट व तक्त्यांचाही समावेश केला गेला आहे.सध्या प्रचलित दहावी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे स्वरूप असणार आहे. यामुळे घोकमपट्टी थांबेलच, शिवाय कॉपीला आळा बसेल, असा विश्वास राज्य शिक्षण मंडळाला आहे. या बदलाच्या अनुषंगाने सर्व भाषा विषयांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीबाबत मानसिकता बदलणे गरजेचे आहे.प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे काम जानेवारीपासून सुरू आहे. प्रातिनिधिक काही मुले व शिक्षकांचा सर्व्हे करूनच बदल करण्यात येत आहेत. भाषा विषयांमध्येदेखील कृतियुक्त व मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना मिळावी, हीच अपेक्षा आहे.- प्राची साठे, विशेष कार्यकारी अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, शिक्षणमंत्री कार्यालय, मुंबईनववीची प्रश्नपत्रिका बोर्ड पुरविणार ?प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील बदलांवर पुढील काही वर्षांत बोर्ड संपूर्ण राज्याला नववीची प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका) पुरविण्याची शक्यता आहे; परंतु पेपर तपासण्यापासून निकाल देण्यापर्यंतचे संपूर्ण काम ज्या-त्या शाळेचे पूर्वीप्रमाणेच असेल.ठळक वैशिष्ट्ये पाठ्यपुस्तक जुनेच असणारप्रश्नपत्रिका १० ते १२ पानांची होणारसन २०१५-१६ ला नववीमध्ये बदलसन २०१६-१७ पासून १० वी परीक्षेत बदल