शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नववीच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलणार

By admin | Updated: May 22, 2015 00:10 IST

आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात : यावर्षीपासूनच होणार अंमलबजावणी, प्रश्नपत्रिकेऐवजी ‘कृतिपत्रिका’ संबोधले जाणार

भरत शास्त्री- बाहुबली --शालेय जीवनात घोकमपट्टीऐवजी कृतिशील शिक्षणाबाबत शासन आग्रही आहे. मुलांचा मानसिक, बौद्धिक व भाषिक विकास झाला पाहिजे, या दृष्टीने आगामी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत शाळांना कळविले जाणार आहे.सध्याच्या भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये घोकमपट्टी व पाठांतरावर आधारित प्रश्नावली आहेत. त्यामध्ये मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. स्वत:चे भाषिक कौशल्य दाखवण्याचे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे मुलांचा भाषा विषयाबद्दल भाषिक वैचारिक विकास होताना दिसत नाही. चाकोरीबद्ध प्रश्न व त्याची ठरलेली उत्तरे, असेच सध्याचे स्वरूप आहे. या सर्व पारंपरिक पद्धती बंद करून कृतियुक्त शिक्षणावर शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे इयत्ता नववीच्या सर्व भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपांमध्ये बदल. सुधारित कृतिपत्रिकेमध्ये वाचन, लेखन, ज्ञान, उपयोजन, आकलन, अनुवाद, विश्लेषण, संश्लेषण, स्मरण व रसग्रह या कौशल्यांचा अंतर्भाव केला आहे. शिवाय कृतिपत्रिकेमध्ये विविध विभागांच्या माध्यमातून बुद्धीला चालना देणारे, स्वप्रतिसादात्मक बौद्धिक, मानसिक व भाषिक विकासात्मक, अशा कृतियुक्त प्रश्नांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे चार्ट व तक्त्यांचाही समावेश केला गेला आहे.सध्या प्रचलित दहावी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे स्वरूप असणार आहे. यामुळे घोकमपट्टी थांबेलच, शिवाय कॉपीला आळा बसेल, असा विश्वास राज्य शिक्षण मंडळाला आहे. या बदलाच्या अनुषंगाने सर्व भाषा विषयांच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीबाबत मानसिकता बदलणे गरजेचे आहे.प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचे काम जानेवारीपासून सुरू आहे. प्रातिनिधिक काही मुले व शिक्षकांचा सर्व्हे करूनच बदल करण्यात येत आहेत. भाषा विषयांमध्येदेखील कृतियुक्त व मुलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चालना मिळावी, हीच अपेक्षा आहे.- प्राची साठे, विशेष कार्यकारी अधिकारी, शालेय शिक्षण विभाग, शिक्षणमंत्री कार्यालय, मुंबईनववीची प्रश्नपत्रिका बोर्ड पुरविणार ?प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील बदलांवर पुढील काही वर्षांत बोर्ड संपूर्ण राज्याला नववीची प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका) पुरविण्याची शक्यता आहे; परंतु पेपर तपासण्यापासून निकाल देण्यापर्यंतचे संपूर्ण काम ज्या-त्या शाळेचे पूर्वीप्रमाणेच असेल.ठळक वैशिष्ट्ये पाठ्यपुस्तक जुनेच असणारप्रश्नपत्रिका १० ते १२ पानांची होणारसन २०१५-१६ ला नववीमध्ये बदलसन २०१६-१७ पासून १० वी परीक्षेत बदल