शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांना जणू काही जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.

त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाई रोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागल चौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जिवंतपणा आला. नागरिकांच्या झुंडी रस्त्यावरून जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.

दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांची रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका-चौकांत असणारे सिग्नलसुद्धा दीड महिन्यांनी प्रथमच सुरू झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळविताना पाेलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते.

सलून, पार्लरनी धूळ झटकली-

पंधरा एप्रिलपासून शहरातील सर्व सलून, पार्लर बंद होती. हातावर पोट असलेल्या सलून व पार्लर मालक व कारागिरांनी संकटात आर्थिक टंचाईचे चटके सोसले. आपले व्यवसाय कधी सुरू होणार याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारपासून पन्नास टक्के आसन क्षमतेवरच व्यवसाय करण्याची त्यांना परवानगी देण्यात आल्याने या व्यावसायिकांनी धूळ झटकत बऱ्याच दिवसांनी कामाचा श्रीगणेशा केला.

फेरीवाल्यांचा उत्साह -

लॉकडाऊनचे कडक निर्बंध केले होते, तेव्हा केवळ भाजी व फळ विक्रेते यांनाच सकाळी सात ते अकरा यावेळेत व्यवसाय करण्याची मुभा होती. आता ही वेळ चार वाजेपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. परंतु महाद्वार रोडवर सोमवारी तयार कपडे, चपला, छत्र्या, रेनकोट, चहा, खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले स्टॉल लावल्याचे दिसून आले.

त्यांनी घेतला मोकळा श्वास-

पहाटेच्या रम्य वातावरणात अनेक शहरवासीयांना फिरण्याची सवय आहे. चालण्याच्या व्यायामातून निरोगी राहण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे या प्रयत्नांवर बंधने आली होती. कोणी फिरायला बाहेर पडलाच तर पाचशे रुपयांचा दंड होत असे. परंतु, सोमवारी बंधने शिथिल झाल्यामुळे अनेकांनी फिरण्याची मौज लुटली.

दुकाने मात्र बंदच-

शहरातील कपडे, भांडी, सराफ दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चपलांची दुकाने, कटलरी दुकाने अद्यापही बंदच राहणार आहेत. हॉटेलचालकांना पार्सलची सुविधा देण्यास मुभा आहे. त्यामुळे हे व्यवसाय सोमवारीही बंद राहिले.

-चारनंतर पुन्हा बंद -

दुपारी चार वाजताच महापालिकेची पथके, पोलिसांची पथके यांनी शहराच्या विविध भागात फिरून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दिवसभर फुललेले रस्ते पुन्हा ओस झाले.