शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांना जणू काही जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.

त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाई रोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागल चौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जिवंतपणा आला. नागरिकांच्या झुंडी रस्त्यावरून जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.

दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांची रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका-चौकांत असणारे सिग्नलसुद्धा दीड महिन्यांनी प्रथमच सुरू झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळविताना पाेलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते.

सलून, पार्लरनी धूळ झटकली-

पंधरा एप्रिलपासून शहरातील सर्व सलून, पार्लर बंद होती. हातावर पोट असलेल्या सलून व पार्लर मालक व कारागिरांनी संकटात आर्थिक टंचाईचे चटके सोसले. आपले व्यवसाय कधी सुरू होणार याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारपासून पन्नास टक्के आसन क्षमतेवरच व्यवसाय करण्याची त्यांना परवानगी देण्यात आल्याने या व्यावसायिकांनी धूळ झटकत बऱ्याच दिवसांनी कामाचा श्रीगणेशा केला.

फेरीवाल्यांचा उत्साह -

लॉकडाऊनचे कडक निर्बंध केले होते, तेव्हा केवळ भाजी व फळ विक्रेते यांनाच सकाळी सात ते अकरा यावेळेत व्यवसाय करण्याची मुभा होती. आता ही वेळ चार वाजेपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. परंतु महाद्वार रोडवर सोमवारी तयार कपडे, चपला, छत्र्या, रेनकोट, चहा, खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले स्टॉल लावल्याचे दिसून आले.

त्यांनी घेतला मोकळा श्वास-

पहाटेच्या रम्य वातावरणात अनेक शहरवासीयांना फिरण्याची सवय आहे. चालण्याच्या व्यायामातून निरोगी राहण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे या प्रयत्नांवर बंधने आली होती. कोणी फिरायला बाहेर पडलाच तर पाचशे रुपयांचा दंड होत असे. परंतु, सोमवारी बंधने शिथिल झाल्यामुळे अनेकांनी फिरण्याची मौज लुटली.

दुकाने मात्र बंदच-

शहरातील कपडे, भांडी, सराफ दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चपलांची दुकाने, कटलरी दुकाने अद्यापही बंदच राहणार आहेत. हॉटेलचालकांना पार्सलची सुविधा देण्यास मुभा आहे. त्यामुळे हे व्यवसाय सोमवारीही बंद राहिले.

-चारनंतर पुन्हा बंद -

दुपारी चार वाजताच महापालिकेची पथके, पोलिसांची पथके यांनी शहराच्या विविध भागात फिरून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दिवसभर फुललेले रस्ते पुन्हा ओस झाले.