शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांना जणू काही जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.

त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाई रोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागल चौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जिवंतपणा आला. नागरिकांच्या झुंडी रस्त्यावरून जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.

दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांची रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका-चौकांत असणारे सिग्नलसुद्धा दीड महिन्यांनी प्रथमच सुरू झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळविताना पाेलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते.

सलून, पार्लरनी धूळ झटकली-

पंधरा एप्रिलपासून शहरातील सर्व सलून, पार्लर बंद होती. हातावर पोट असलेल्या सलून व पार्लर मालक व कारागिरांनी संकटात आर्थिक टंचाईचे चटके सोसले. आपले व्यवसाय कधी सुरू होणार याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारपासून पन्नास टक्के आसन क्षमतेवरच व्यवसाय करण्याची त्यांना परवानगी देण्यात आल्याने या व्यावसायिकांनी धूळ झटकत बऱ्याच दिवसांनी कामाचा श्रीगणेशा केला.

फेरीवाल्यांचा उत्साह -

लॉकडाऊनचे कडक निर्बंध केले होते, तेव्हा केवळ भाजी व फळ विक्रेते यांनाच सकाळी सात ते अकरा यावेळेत व्यवसाय करण्याची मुभा होती. आता ही वेळ चार वाजेपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. परंतु महाद्वार रोडवर सोमवारी तयार कपडे, चपला, छत्र्या, रेनकोट, चहा, खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले स्टॉल लावल्याचे दिसून आले.

त्यांनी घेतला मोकळा श्वास-

पहाटेच्या रम्य वातावरणात अनेक शहरवासीयांना फिरण्याची सवय आहे. चालण्याच्या व्यायामातून निरोगी राहण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे या प्रयत्नांवर बंधने आली होती. कोणी फिरायला बाहेर पडलाच तर पाचशे रुपयांचा दंड होत असे. परंतु, सोमवारी बंधने शिथिल झाल्यामुळे अनेकांनी फिरण्याची मौज लुटली.

दुकाने मात्र बंदच-

शहरातील कपडे, भांडी, सराफ दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चपलांची दुकाने, कटलरी दुकाने अद्यापही बंदच राहणार आहेत. हॉटेलचालकांना पार्सलची सुविधा देण्यास मुभा आहे. त्यामुळे हे व्यवसाय सोमवारीही बंद राहिले.

-चारनंतर पुन्हा बंद -

दुपारी चार वाजताच महापालिकेची पथके, पोलिसांची पथके यांनी शहराच्या विविध भागात फिरून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दिवसभर फुललेले रस्ते पुन्हा ओस झाले.