शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला नडले सोयीचे राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 00:21 IST

आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर

राजाराम लोंढे - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती पीछेहाट झाली. गेली पंधरा वर्षे जिल्ह्याला लाल दिवा अखंडपणे देणाऱ्या राष्ट्रवादीला सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले नाहीत. आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर ओढवली. नेत्यांच्या सोयीचे राजकारण केल्याने बालेकिल्ल्यातच पक्षाला मोठा फटका बसला. गेल्या पाच वर्षांत नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतरत्र लक्ष न दिल्याने पक्षाची वाताहात झाली. परिणामी लोकसभा निवडणुकीत ‘हातकणंगले’ची जागा काँग्रेसला सोडावी लागली. कोल्हापूरची जागा जिंकताना सर्वांच्या नाकात दम आला. त्यातून स्थानिक नेत्यांनी फारसा बोध घेतला नाही. दहा वर्षांची आघाडी कायम राहू शकते, या भ्रमात जिल्ह्यातील नेते होते; पण ऐनवेळी आघाडी तुटली आणि नेत्यांची भंबेरी उडाली. दहाही जागा लढविण्याची वल्गना करणारे उघड्यावर पडले. कसेबसे आठ जागांवर उमेदवार देता आले. तेही देताना पक्षापेक्षा स्वत:ची राजकीय सोय बघितल्याने तेथे पक्षाची अक्षरश: वाताहात झाली. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत पक्षाची ताकद फारशी नाही. या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी नेत्यांनी आपलेच मतदारसंघ अधिक सुरक्षित केले. ‘करवीर’मधून अनपेक्षितपणे माघार घेऊन जिल्हाध्यक्षांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला; पण तेच अडचणीत आले. ‘शिरोळ’मध्ये माने व यड्रावकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटला नाही. इचलकरंजीमध्येही तीच परिस्थिती राहिली. हातकणंगले व शाहूवाडीत मैत्रीला जागण्यासाठी कमकुवत उमेदवार दिले. कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली. ‘उत्तर’मध्ये पक्षाच्या महापौरांसह सुमारे २२ नगरसेवक येतात. यापैकी बहुतांशी नगरसेवक अन्य पक्षाच्या व्यासपीठावर उघड होते; पण नंतर पोवार यांनी तक्रार केल्यानंतर रॅलीत सहभागी झाले. पण, त्याचे मतात रूपांतर झाले नाही. पोवार यांना अवघी ९८८७ इतकी मते मिळाली. यावरून नेत्यांच्या राजकीय खेळ्या स्पष्ट होतात. याला स्थानिक नेत्यांचे सोयीचे राजकारणच कारणीभूत ठरले आहे.वजाबाकीचे राजकारणगेले पाच वर्षांत पक्षात नवीन आलेले व पक्ष सोडून गेलेल्यांची संख्या पाहिली, तर पक्षाची कामगिरी लक्षात येते. धनंजय महाडिक (एकटेच) राष्ट्रवादीत आले, पण पाच वर्षांत अनेक चांगली माणसे पक्षातून बाजूला गेली. काहीजण सध्या काठावर आहेत. त्यामुळे नेत्यांनी बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण सुरू केल्याने पक्षाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.