शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राष्ट्रवादीला नडले सोयीचे राजकारण

By admin | Updated: October 21, 2014 00:21 IST

आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर

राजाराम लोंढे - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती पीछेहाट झाली. गेली पंधरा वर्षे जिल्ह्याला लाल दिवा अखंडपणे देणाऱ्या राष्ट्रवादीला सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले नाहीत. आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर ओढवली. नेत्यांच्या सोयीचे राजकारण केल्याने बालेकिल्ल्यातच पक्षाला मोठा फटका बसला. गेल्या पाच वर्षांत नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतरत्र लक्ष न दिल्याने पक्षाची वाताहात झाली. परिणामी लोकसभा निवडणुकीत ‘हातकणंगले’ची जागा काँग्रेसला सोडावी लागली. कोल्हापूरची जागा जिंकताना सर्वांच्या नाकात दम आला. त्यातून स्थानिक नेत्यांनी फारसा बोध घेतला नाही. दहा वर्षांची आघाडी कायम राहू शकते, या भ्रमात जिल्ह्यातील नेते होते; पण ऐनवेळी आघाडी तुटली आणि नेत्यांची भंबेरी उडाली. दहाही जागा लढविण्याची वल्गना करणारे उघड्यावर पडले. कसेबसे आठ जागांवर उमेदवार देता आले. तेही देताना पक्षापेक्षा स्वत:ची राजकीय सोय बघितल्याने तेथे पक्षाची अक्षरश: वाताहात झाली. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत पक्षाची ताकद फारशी नाही. या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी नेत्यांनी आपलेच मतदारसंघ अधिक सुरक्षित केले. ‘करवीर’मधून अनपेक्षितपणे माघार घेऊन जिल्हाध्यक्षांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला; पण तेच अडचणीत आले. ‘शिरोळ’मध्ये माने व यड्रावकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटला नाही. इचलकरंजीमध्येही तीच परिस्थिती राहिली. हातकणंगले व शाहूवाडीत मैत्रीला जागण्यासाठी कमकुवत उमेदवार दिले. कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली. ‘उत्तर’मध्ये पक्षाच्या महापौरांसह सुमारे २२ नगरसेवक येतात. यापैकी बहुतांशी नगरसेवक अन्य पक्षाच्या व्यासपीठावर उघड होते; पण नंतर पोवार यांनी तक्रार केल्यानंतर रॅलीत सहभागी झाले. पण, त्याचे मतात रूपांतर झाले नाही. पोवार यांना अवघी ९८८७ इतकी मते मिळाली. यावरून नेत्यांच्या राजकीय खेळ्या स्पष्ट होतात. याला स्थानिक नेत्यांचे सोयीचे राजकारणच कारणीभूत ठरले आहे.वजाबाकीचे राजकारणगेले पाच वर्षांत पक्षात नवीन आलेले व पक्ष सोडून गेलेल्यांची संख्या पाहिली, तर पक्षाची कामगिरी लक्षात येते. धनंजय महाडिक (एकटेच) राष्ट्रवादीत आले, पण पाच वर्षांत अनेक चांगली माणसे पक्षातून बाजूला गेली. काहीजण सध्या काठावर आहेत. त्यामुळे नेत्यांनी बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण सुरू केल्याने पक्षाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.