शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांमागे राष्ट्रवादी नेत्यांचा हात

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

संजय पाटील : अधिकारी, पोलिसांवर कारवाईची मागणी करणार

सांगली : राजापूर येथे वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्याची घटना दुर्दैवी असून, राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठबळामुळेच माफियाराज मुजोर झाले आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, माफियांना साथ देणारे महसूल विभागातील अधिकारी आणि गुन्हे नोंदविताना आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही संबंधित वाळू माफियांच्या गुंडगिरीबद्दल वारंवार बोलत आहोत. तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधित अशा सर्व माफियांना अभय मिळाले. राष्ट्रवादीकडून मिळालेल्या संरक्षणाचा फायदा घेत या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या गोष्टी येथून पुढील काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत. तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आणलेले अधिकारी व पोलीस अजूनही तालुक्यात व जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून अजूनही संबंधित नेत्यांच्याच इशाऱ्यावर काम चालत आहे. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून प्रशासनाच्याच हिताची गोष्ट केली होती. तरीही त्यांना संरक्षण दिले गेले नाही. प्रशासकीय पातळीवरच अभय मिळत असल्याने या तस्करांचे धाडस वाढले आहे. राजापूर येथील घटना पूर्वनियोजितच होती. धडधडीत भरदिवसा असे प्रकार होत असतील, तर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस काय करीत आहेत?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. आता राज्यात आमचे सरकार असले तरी, पूर्वीच्याच सरकारमधील काही तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आपल्या मर्जीतले अधिकारी आणि पोलीस याठिकाणी बसविले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत यापुढे वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. ग्रामस्थांना संरक्षण देण्याचीही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही खा. संजय पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नुकसान भरपाईसाठी पाठपुरावाअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर पंचनामे होऊन जिल्ह्यातील द्राक्ष व डाळिंब बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे संजय पाटील म्हणाले.