शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

वाळू माफियांमागे राष्ट्रवादी नेत्यांचा हात

By admin | Updated: November 23, 2014 23:56 IST

संजय पाटील : अधिकारी, पोलिसांवर कारवाईची मागणी करणार

सांगली : राजापूर येथे वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्याची घटना दुर्दैवी असून, राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठबळामुळेच माफियाराज मुजोर झाले आहे, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, माफियांना साथ देणारे महसूल विभागातील अधिकारी आणि गुन्हे नोंदविताना आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही संबंधित वाळू माफियांच्या गुंडगिरीबद्दल वारंवार बोलत आहोत. तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधित अशा सर्व माफियांना अभय मिळाले. राष्ट्रवादीकडून मिळालेल्या संरक्षणाचा फायदा घेत या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. या गोष्टी येथून पुढील काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत. तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आणलेले अधिकारी व पोलीस अजूनही तालुक्यात व जिल्ह्यात ठाण मांडून आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून अजूनही संबंधित नेत्यांच्याच इशाऱ्यावर काम चालत आहे. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून प्रशासनाच्याच हिताची गोष्ट केली होती. तरीही त्यांना संरक्षण दिले गेले नाही. प्रशासकीय पातळीवरच अभय मिळत असल्याने या तस्करांचे धाडस वाढले आहे. राजापूर येथील घटना पूर्वनियोजितच होती. धडधडीत भरदिवसा असे प्रकार होत असतील, तर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस काय करीत आहेत?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. आता राज्यात आमचे सरकार असले तरी, पूर्वीच्याच सरकारमधील काही तत्कालीन राष्ट्रवादी नेत्यांनी आपल्या मर्जीतले अधिकारी आणि पोलीस याठिकाणी बसविले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत यापुढे वाळू माफियांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. ग्रामस्थांना संरक्षण देण्याचीही आमची जबाबदारी आहे. त्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही खा. संजय पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नुकसान भरपाईसाठी पाठपुरावाअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर पंचनामे होऊन जिल्ह्यातील द्राक्ष व डाळिंब बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे संजय पाटील म्हणाले.