शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’

By admin | Updated: August 29, 2015 00:08 IST

अरुण इंगवले यांचा घरचा आहेर : नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

कोल्हापूर : पक्षाची पदे घ्यायची आणि घरी बसण्याची प्रवृत्ती पक्षात वाढली असून, नेत्यांचे जिल्ह्याच्या पूर्व भागात लक्ष नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा ‘राधानगरी-कागल-चंदगड लिमिटेड’च पक्ष असल्याची खरमरीत टीका पक्षाचे खजानीस अरुण इंगवले यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शुक्रवारी पक्षाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाले, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निरीक्षक दिलीप पाटील होते. पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवीत इंगवले म्हणाले, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. राधानगरी, चंदगड, कागल, भुदरगड म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. नेत्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांकडे लक्ष द्या. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, दिल्लीतील सरकारला कळेना आणि राज्य सरकारला समजेना, अशी अवस्था झाल्याने येत्या वर्षभरात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारचे वाभाडे काढावे. पूर्र्वेकडे लक्ष नाही, असे म्हणू नका. जिल्हा बॅँकेचे दोन संचालक पूर्वेकडचे आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे, ती दूर केली जाईल. पक्षात राहून चुकीची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आजपर्यंत ताठ मानेने राजकारण केले, कारवाईही त्याच ताकदीने करू. दिलीप पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही आपली शक्तिस्थळे आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून, कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावत सरकारला सळो की पळो करून सोडावे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन करीत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत केलेल्या कामाबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवानंद माळी, आदींनी मनोगत व्यक्त केले. फेटा राष्ट्रवादीचा, रसद विरोधकांना!महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे, पक्षाचा सत्कार स्वीकारायचा आणि आपली सगळी रसद विरोधकांना पुरवून त्यांचा प्रचार सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घाला, असे अरुण इंगवले यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांसाठी बांध घालापंधरा वर्र्षे झाल्याने निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून थांबविल्याचा उल्लेख करीत इंगवले म्हणाले, काही मंडळी पक्षापासून दूर जात आहेत, त्यांना थांबवा, प्रसंगी त्यांच्यासाठी बांध घाला. केवळ सह्याजीराव निरीक्षक नव्हे!दिग्विजय खानविलकर यांच्या काळात सभासद नोंदणी नाही, काम शून्य, अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील पक्ष संपेल, असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे त्यावेळी दिला होता. जे व्हायचे तेच झाले. त्यामुळे मी केवळ सह्याजीराव (सह्या) करणारा निरीक्षक नाही, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा दिलीप पाटील यांनी दिला.