शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

राष्ट्रवादी ‘कागल-राधानगरी लिमिटेड पक्ष’

By admin | Updated: August 29, 2015 00:08 IST

अरुण इंगवले यांचा घरचा आहेर : नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

कोल्हापूर : पक्षाची पदे घ्यायची आणि घरी बसण्याची प्रवृत्ती पक्षात वाढली असून, नेत्यांचे जिल्ह्याच्या पूर्व भागात लक्ष नसल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा ‘राधानगरी-कागल-चंदगड लिमिटेड’च पक्ष असल्याची खरमरीत टीका पक्षाचे खजानीस अरुण इंगवले यांनी केली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप शुक्रवारी पक्षाच्या ताराबाई पार्क कार्यालयात झाले, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निरीक्षक दिलीप पाटील होते. पक्षांच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवीत इंगवले म्हणाले, गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याने पक्ष कमकुवत होत आहे. राधानगरी, चंदगड, कागल, भुदरगड म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. नेत्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांकडे लक्ष द्या. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, दिल्लीतील सरकारला कळेना आणि राज्य सरकारला समजेना, अशी अवस्था झाल्याने येत्या वर्षभरात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून सरकारचे वाभाडे काढावे. पूर्र्वेकडे लक्ष नाही, असे म्हणू नका. जिल्हा बॅँकेचे दोन संचालक पूर्वेकडचे आहेत. काही ठिकाणी नाराजी आहे, ती दूर केली जाईल. पक्षात राहून चुकीची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आजपर्यंत ताठ मानेने राजकारण केले, कारवाईही त्याच ताकदीने करू. दिलीप पाटील म्हणाले, सहकार चळवळ ही आपली शक्तिस्थळे आहेत, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असून, कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावत सरकारला सळो की पळो करून सोडावे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन करीत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत केलेल्या कामाबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रकाश पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवानंद माळी, आदींनी मनोगत व्यक्त केले. फेटा राष्ट्रवादीचा, रसद विरोधकांना!महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत, पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचे, पक्षाचा सत्कार स्वीकारायचा आणि आपली सगळी रसद विरोधकांना पुरवून त्यांचा प्रचार सुरू आहे. अशा प्रवृत्तीला पायबंद घाला, असे अरुण इंगवले यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांसाठी बांध घालापंधरा वर्र्षे झाल्याने निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून थांबविल्याचा उल्लेख करीत इंगवले म्हणाले, काही मंडळी पक्षापासून दूर जात आहेत, त्यांना थांबवा, प्रसंगी त्यांच्यासाठी बांध घाला. केवळ सह्याजीराव निरीक्षक नव्हे!दिग्विजय खानविलकर यांच्या काळात सभासद नोंदणी नाही, काम शून्य, अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यातील पक्ष संपेल, असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे त्यावेळी दिला होता. जे व्हायचे तेच झाले. त्यामुळे मी केवळ सह्याजीराव (सह्या) करणारा निरीक्षक नाही, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे, असा इशारा दिलीप पाटील यांनी दिला.