शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- कारण-राजकारण: व्यासपीठावर कोण-कोण होते बसले, पाठीत खंजीर कुणी खुपसला?; नंदाताईंच्या इशाऱ्याची जिल्ह्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:05 IST

‘गोकुळ’ ‘केडीसी’चा संदर्भ देत नंदाताईंनी अप्रत्यक्षरित्या जिल्ह्याच्या नेतृत्वालाही इशारा दिला

राम मगदूमगडहिंग्लज : विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत, आमच्या व्यासपीठावर राहून आमच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना कुठेही थारा मिळू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कानडेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यासपीठावर कोण-कोण होते? त्यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? ‘त्या’ कुणा-कुणाला जागा दाखवणार? याचीच चर्चा ‘गडहिंग्लज’सह जिल्हाभर रंगली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. बाभूळकर या दोघींनीही निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारीची माळ राजेश पाटील यांच्या गळ्यात पडली. परंतु, निवडणुकीनंतर आमदार पाटील व कुपेकर यांच्यात आलेला दुरावा कायम राहिला. किंबहुना, दोघांच्या पाडा-पाडीच्या राजकारणामुळेच शिवाजीराव पाटील यांना चाल मिळाली ही वस्तुस्थिती आहे. परंतु, दोघांनीही निकालाचा ‘बोध’न घेतल्यामुळेच ‘शक्तिपीठ’ चंदगडमध्ये येत आहे.

मनातील ‘खदखद’लोकसभा निवडणुकीपूर्वी चंदगड मतदारसंघात काढलेल्या संविधान बचाव दिंडीमुळे ‘मविआ’चे नेते कार्यकर्ते एकत्र आले. त्याचाच फायदा शाहू महाराजांना झाला. मात्र, लोकसभेच्या निमित्तानेच सक्रिय झालेल्या ‘नंदाताईं’ची उमेदवारी न रूचल्यामुळे आघाडीतील बहुतेकांनी अप्पी पाटील यांना उघडपणे साथ दिली. म्हणूनच आपल्याला एकाकी पाडल्याचे शल्य नंदाताईंना आहे. किंबहुना, त्यांनी मनातील खदखदच कानडेवाडीच्या बैठकीत बोलून दाखवली.

निकालावर ‘भाष्य’शक्तिपीठ महामार्गात ‘चंदगड’चा समावेश करण्याची मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केल्यामुळे त्यांचे विरोधक पुन्हा एकवटले आहेत. त्यात राजेश पाटील यांच्यासह नंदाताईंच्या विरोधात गेलेली मंडळीच पुढे आहेत. त्यांच्यासोबत कसे जायचे? हाच प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळेच त्यांनी ‘ईव्हीएम’च्या तपासणीनंतर निवडणुकीच्या निकालावर ‘भाष्य’ केले आहे.नेतृत्वालाच ‘इशारा’विधानसभा निवडणुकीत नंदाताईंची उमेदवारी दाखल करून गेल्यानंतर खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील दोघेही ‘चंदगड’कडे फिरकले नाहीत. त्यामुळे अप्पींसोबत गेलेले नेते-कार्यकर्ते माघारी फिरले नाहीत. काहींनी व्यासपीठावर बसून तर काहींनी पडद्यामागे राहून करायचे तेच केले. म्हणूनच, ‘गोकुळ’ ‘केडीसी’चा संदर्भ देत नंदाताईंनी अप्रत्यक्षरित्या जिल्ह्याच्या नेतृत्वालाही इशारा दिला आहे.