शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बारा वर्षांपासून जीव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:39 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली

ठळक मुद्देपण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सतीश पाटील -कोल्हापूर-शिरोली -  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली गावातून गेल्यामुळे पूर्व आणि पश्चिम असे गावाचे विभाजन झाले आहे. महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला यादववाडी, शिवाजीनगर, व्यंकटेशनगर,चौगुले मळा, मेननकाॅलनी आदी सुमारे दहा हजारहुन अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. तर पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सन २००२ पूर्वी महामार्ग दुपदरी होता. २००३ ला चौपदरीकरणाला मंजूरी मिळाल्याने चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे रस्याची रूंदी आणि उंची वाढली. हे चौपदरीकरणाचे काम करत असताना शाळेला जाण्यासाठी मुलांना भुयारीमार्गाचे नियोजनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले नाही. शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार करून शाळेच्या मुलांना महामार्गावरील वाहतूकीपासुन धोका आहे . यावेळी सदर ठिकाणी भुयारीमार्ग अथवा पादचारी लोखंडी उड्डाणपूल उभा करावे अशी मागणी केली होती. पण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. सहापदरीकरणावेळी करू  असे त्यावेळी महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. पण सहापदरीकरणाच्या कामांचा ही अंदाजपत्रक तयार झाला असुन त्यात देखील शिरोली येथे भुयारीमार्गाचा उल्लेख नाही. आज पर्यंत कोणी  दखलच घेतली नाही. 

सन २००६ मध्ये पुणे बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. आणि महामार्ग वाहतूकीस खूला झाला.  आज महामार्ग पूर्ण होवून बारा वर्षे झाली पण ही मुलं गेली बारा वर्षे शिक्षणासाठी  जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडत आहेत. या शिरोलीवरून जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, शिक्षण अधिकारी प्रवास करतात पण त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नसेल का.अजुन किती दिवस हे विद्यार्थी जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडून प्रवास करणार.1)महामार्गावरील वाहने भरधाव वेगाने धावतात. सेवामार्ग, महामार्ग आणि पुन्हा सेवामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका वाढलेला असतो. लांब असलेली वाहने बघता बघता जवळ येतात. रस्ता पूर्ण मोकळा झाला की मगच प्रवास करावा लागतो.

2)शिरोली मधील १०४४ विद्यार्थी शिक्षणासाठी जिव धोक्यात घालुन दररोज  महामार्ग ओलांडतात. विद्यार्थ्याच्यासाठी भुयारीमार्ग मंजुर करून  घेणे गरजेचे आहे.पण याकडे कोणत्या ही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. लोकप्रतिनीधीनी याठिकाणी भुयारीमार्ग होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStudentविद्यार्थी