शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांपासून जीव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:39 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली

ठळक मुद्देपण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सतीश पाटील -कोल्हापूर-शिरोली -  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली गावातून गेल्यामुळे पूर्व आणि पश्चिम असे गावाचे विभाजन झाले आहे. महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला यादववाडी, शिवाजीनगर, व्यंकटेशनगर,चौगुले मळा, मेननकाॅलनी आदी सुमारे दहा हजारहुन अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. तर पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सन २००२ पूर्वी महामार्ग दुपदरी होता. २००३ ला चौपदरीकरणाला मंजूरी मिळाल्याने चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे रस्याची रूंदी आणि उंची वाढली. हे चौपदरीकरणाचे काम करत असताना शाळेला जाण्यासाठी मुलांना भुयारीमार्गाचे नियोजनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले नाही. शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार करून शाळेच्या मुलांना महामार्गावरील वाहतूकीपासुन धोका आहे . यावेळी सदर ठिकाणी भुयारीमार्ग अथवा पादचारी लोखंडी उड्डाणपूल उभा करावे अशी मागणी केली होती. पण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. सहापदरीकरणावेळी करू  असे त्यावेळी महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. पण सहापदरीकरणाच्या कामांचा ही अंदाजपत्रक तयार झाला असुन त्यात देखील शिरोली येथे भुयारीमार्गाचा उल्लेख नाही. आज पर्यंत कोणी  दखलच घेतली नाही. 

सन २००६ मध्ये पुणे बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. आणि महामार्ग वाहतूकीस खूला झाला.  आज महामार्ग पूर्ण होवून बारा वर्षे झाली पण ही मुलं गेली बारा वर्षे शिक्षणासाठी  जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडत आहेत. या शिरोलीवरून जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, शिक्षण अधिकारी प्रवास करतात पण त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नसेल का.अजुन किती दिवस हे विद्यार्थी जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडून प्रवास करणार.1)महामार्गावरील वाहने भरधाव वेगाने धावतात. सेवामार्ग, महामार्ग आणि पुन्हा सेवामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका वाढलेला असतो. लांब असलेली वाहने बघता बघता जवळ येतात. रस्ता पूर्ण मोकळा झाला की मगच प्रवास करावा लागतो.

2)शिरोली मधील १०४४ विद्यार्थी शिक्षणासाठी जिव धोक्यात घालुन दररोज  महामार्ग ओलांडतात. विद्यार्थ्याच्यासाठी भुयारीमार्ग मंजुर करून  घेणे गरजेचे आहे.पण याकडे कोणत्या ही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. लोकप्रतिनीधीनी याठिकाणी भुयारीमार्ग होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStudentविद्यार्थी