शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांपासून जीव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:39 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली

ठळक मुद्देपण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सतीश पाटील -कोल्हापूर-शिरोली -  प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली मधील १०४४ विद्यार्थी गेल्या बारा वर्षांपासून जिव धोक्यात घालुन शिक्षणासाठी  दररोज आलोंडतात राष्ट्रीय महामार्ग.पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चार हा शिरोली गावातून गेल्यामुळे पूर्व आणि पश्चिम असे गावाचे विभाजन झाले आहे. महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूला यादववाडी, शिवाजीनगर, व्यंकटेशनगर,चौगुले मळा, मेननकाॅलनी आदी सुमारे दहा हजारहुन अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. तर पश्चिम बाजूला प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १७ शाळा आहेत.  

सन २००२ पूर्वी महामार्ग दुपदरी होता. २००३ ला चौपदरीकरणाला मंजूरी मिळाल्याने चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे रस्याची रूंदी आणि उंची वाढली. हे चौपदरीकरणाचे काम करत असताना शाळेला जाण्यासाठी मुलांना भुयारीमार्गाचे नियोजनच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले नाही. शिरोली ग्रामपंचायतीच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार करून शाळेच्या मुलांना महामार्गावरील वाहतूकीपासुन धोका आहे . यावेळी सदर ठिकाणी भुयारीमार्ग अथवा पादचारी लोखंडी उड्डाणपूल उभा करावे अशी मागणी केली होती. पण आता चौपदरीकरणाच्या कामात बदल होवू शकत नाही. सहापदरीकरणावेळी करू  असे त्यावेळी महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. पण सहापदरीकरणाच्या कामांचा ही अंदाजपत्रक तयार झाला असुन त्यात देखील शिरोली येथे भुयारीमार्गाचा उल्लेख नाही. आज पर्यंत कोणी  दखलच घेतली नाही. 

सन २००६ मध्ये पुणे बंगळूर महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले. आणि महामार्ग वाहतूकीस खूला झाला.  आज महामार्ग पूर्ण होवून बारा वर्षे झाली पण ही मुलं गेली बारा वर्षे शिक्षणासाठी  जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडत आहेत. या शिरोलीवरून जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, शिक्षण अधिकारी प्रवास करतात पण त्यांच्या निदर्शनास ही बाब आली नसेल का.अजुन किती दिवस हे विद्यार्थी जिव धोक्यात घालुन  महामार्ग ओलांडून प्रवास करणार.1)महामार्गावरील वाहने भरधाव वेगाने धावतात. सेवामार्ग, महामार्ग आणि पुन्हा सेवामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठोका वाढलेला असतो. लांब असलेली वाहने बघता बघता जवळ येतात. रस्ता पूर्ण मोकळा झाला की मगच प्रवास करावा लागतो.

2)शिरोली मधील १०४४ विद्यार्थी शिक्षणासाठी जिव धोक्यात घालुन दररोज  महामार्ग ओलांडतात. विद्यार्थ्याच्यासाठी भुयारीमार्ग मंजुर करून  घेणे गरजेचे आहे.पण याकडे कोणत्या ही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. लोकप्रतिनीधीनी याठिकाणी भुयारीमार्ग होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStudentविद्यार्थी