शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नारायण राणे यांचा निर्णय दसºयाला : चंद्रकांतदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 18:19 IST

निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठळक मुद्देशिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाहीदोन्ही भूमिका लोकशाहीत घेता येणार नाहीत : चंद्रकांतदादाचा टोला शहा यांची राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट मेडीकल कॉलेज संदर्भात भाजपाला जे काही सांगायचे आहे ते शहा यांनी राणे यांना सांगितलेगैरसमजातील असतील ते चर्चेतून दूर होतील

कोल्हापूर, दि. २७ : निर्णय घेण्यात अचूक असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दसºया दिवशी निर्णय घेतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.महसूल मंत्री पाटील म्हणाले, भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत घेतलेली भेट ही त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडीकल कॉलेज संदर्भात होती. साहजिकच दोन राजकीय व्यक्ती एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होणारच. त्यानुसार झालेल्या राजकीय चर्चेतून एकंदरीत राजकीय बेरीज व वजाबाकीवर भाजप व त्यांच्याकडून असा दोन्ही बाजूंनी विचार झाला.दोन्ही बाजूंकडून चर्चा झाली असली तरी भाजपाला जे काही सांगायचे आहे ते अमित शहा यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री राणे यांना यावेळी सांगण्यात आले. यानंतर पुढील जो काही राजकीय निर्णय घ्यायचा आहे. तो त्यांच्यावरच सोपविला आहे. राणे हे निर्णय घेण्यात अचूक असून ते दसºया दिवशी योग्य निर्णय घेतील.ते पुढे म्हणाले, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. त्यांची मानसिकता बाहेर पडण्याची दिसत नाही, असे आम्हाला वाटत नाही. रक्काची माणसे सुध्दा एकमेकांशी भांडतात परंतु त्यांचे भांडण हे रस्त्यावर येत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या मंत्री व आमदारांसाठी नेहमीच उपलब्ध आहेत. त्यांचे काय विषय असतील ते त्यांनी घेऊन मुख्यमत्र्यांकडे जावे. जे विषय गैरसमजातील असतील ते चर्चेतून दूर होतील व काही तर्कसुसंगत असतील ते मुख्यमंत्री मान्य करुन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील.परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शेतकºयांचा विचार करतात. त्यानुसार त्यांनी कर्जमाफी होईल त्यावेळी शेतकºयांना १० हजार रुपये द्यावेत असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केले. हे बॅँकींग नियमावलीच्या विरोधात होते. परंतु ही सुचना तर्कसुसंगत असल्याने मुख्यमंत्री स्वत: याबाबत रिझर्व्ह बॅँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना दोनवेळा भेटले व याबाबत राज्य सरकार बॅँक गॅरंटी घेईल असे सांगितले.