शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन थाट जपणारे नानासाहेब बांदिवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:58 IST

नितीन भगवान देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक पन्हाळ्याच्या मातीतील मनोहर दत्तात्रय बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब शंभरीत ...

नितीन भगवानदेशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक पन्हाळ्याच्या मातीतील मनोहर दत्तात्रय बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब शंभरीत प्रवेश करीत आहेत.दोन माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या नानासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतरचा पोलीस प्रशासनाचाही प्रदीर्घ काळ अनुभव घेतला आहे. नानासाहेब तेव्हाही कडक कपडे आणि सुटाबुटात वावरत होते आणि आजही ते तेवढ्याच रुबाबात वावरतात. बदलत्या परिस्थितीनुसार वयाच्या शंभरीत प्रवेश करीत असतानाही ते नवतरुणाच्याच उत्साहात लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर करतात. दृष्टी थोडीशी मंदावली असली तरी ताठपणे चालण्याचा सराव अजूनही कायम आहे.कोल्हापूर स्टेट असताना १९४३ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. संस्थानकाळातील आणि स्वातंत्र्यानंतरही पोलीस खात्यात काम केलेले नानासाहेब हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत. पदवी मिळाल्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक केली होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी ते गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्याचा सन्मान त्यांना लाभला होता. तेव्हा राष्ट्रीय ध्वजाला त्यांनी सर्वप्रथम सलामी दिली. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गडहिंग्लजच्या सर्वच नागरिकांशी त्यांनी प्रत्यक्ष हस्तांदोलन करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. गेल्या २० वर्र्षांपासून ते पन्हाळा येथील सज्जा कोठी येथे होणाºया ध्वजारोहणाच्या सर्व समारंभांना आवर्जून हजेरी लावतात. गतवर्षीपासून ते दिल्लीत वास्तव्य करतात. तेथील ध्वजारोहण समारंभही त्यांच्याच हस्ते झाला.त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी शिवभूमी पन्हाळगडावर झाला. त्यांचे शालेय शिक्षण पन्हाळा आणि सातारा येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात झाले. या शिक्षणाबरोबर त्यांनी कायद्याचीही पदवी घेतली. १०० वर्षांच्या काळात त्यांनी १९४३ पासून म्हणजेच संस्थानकाळापासून स्वातंत्र्यानंतर ३४ वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावली. १९७७ मध्ये ते पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले.पोलीस खात्यात काम करीत असताना वाळवा तालुक्यातील रेठरे (जि. सांगली) येथील विशेष गुन्ह्याचा उलगडा त्यांनी केला होता. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर ते रेठरे साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून १२ वर्षे काम पाहत होते. त्यानंतर दोन वर्षे ते पन्हाळा बालग्रामचे अध्यक्ष होते.त्यांना सहा अपत्ये आहेत. पाच मुली आणि एक मुलगा उच्चशिक्षित असून ते परदेशी वास्तव्यासआहेत. २००५ मध्ये त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतल्यानंतर नाना आयुष्याच्या प्रवासात एकाकी झाले. मात्र, खिलाडूवृत्तीने ते या कठीण प्रसंगातून बाहेर पडून वेगवेगळ्या विषयांत रस घेतात.पन्हाळगडावर राहत असतानाही केखले गावातील शिवजयंती त्यांच्याशिवाय साजरी होत नाही. एकदा ते तेथील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले, तेव्हापासून आजतागायत ते केखले गावातील शिवजयंती साजरी करतात. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्लीत मुलीकडे असते. या वास्तव्यात त्यांनी वाचनाचीही आवड जोपासली आहे. ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा अंक त्यांनी आवर्जून सुरू केला आहे.पोलीस खात्यात काम करीत असताना नानासाहेबांना देशाच्या दोन पंतप्रधानांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. ‘हा माझा बहुमान होता,’ असे ते आजही सांगतात. रत्नागिरीत सेवेत असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि नाशिक येथे सेवेत असताना लालबहादूर शास्त्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ते होते. या दोघांच्याही हस्ते त्यांना विशेष प्राविण्याचे प्रशस्तिपत्र मिळाले आहे. प्रवासाची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमंती केली आहे. शिवाय परदेश पर्यटनही केले आहे.नाना बांदिवडेकर यांचा गेल्या वर्षी ‘सर्वांतज्येष्ठ पोलीस अधिकारी’ म्हणून पन्हाळा पोलिसांनी सत्कारही केला आहे. याशिवाय ‘पन्हाळा भूषण’, ‘सीनिअर सिटीझन’ असे पुरस्कारही त्यांनी मिळविलेले आहेत.पन्हाळ्याविषयी ‘माझा गाव’ असे अभिमानाने सांगताना नानासाहेब म्हणतात की, पन्हाळ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असून, पूर्वीचा निसर्गाने बहरलेला पन्हाळा हरवला आहे. तो जपा, इतकेच माझे म्हणणे आहे. शंभरीत प्रवेश करताना आपल्या आरोग्याचे रहस्य त्यांनी थोड्याच शब्दांत सांगितले, ‘कमी खा... भरपूर पाणी प्या... आणि जास्त चाला...!’