शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

बंडाळी रोखण्यासाठी शेवटपर्यंत नावे गुलदस्त्यात राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी विरोधी आघाडीकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने नेत्यांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाळी होणार, ते टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेल गुलदस्त्यात ठेवण्याची व्यूहरचना विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्री पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांचीही रविवारी बैठक झाली.

खासदार संजय मंडलिक हे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ‘गोकुळ’च्या चर्चेत सहभागी नव्हते. ते शनिवारी रात्री कोल्हापुरात आल्यानंतर घडामोडींनी वेग घेतला. रविवारी दुपारी मंत्री पाटील, खासदार मंडलिक व आमदार आबिटकर यांची बैठक झाली. यामध्ये एकूण पॅनेलची रचना, कोणाला किती जागा द्याव्या लागतील, यासह इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. विरोधी आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजांची संख्याही वाढणार आहे. ती थोपविताना नेत्यांची दमछाक होणार आहे. ते टाळून विरोधाची धार कमी करायची झाल्यास पॅनेल शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवावे, असा मतप्रवाह पुढे आला आहे. माघारीच्या शेवटच्या क्षणी पॅनेल जाहीर केल्याने इच्छुक इतरांच्या हाताला लागणार नाहीत, त्यामुळे बंडाळी शमविण्यात यश येईल, अशी अटकळ विरोधी आघाडीच्या नेत्यांची आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी मंत्री सतेज पाटील, चंद्रदीप नरके व विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यातील जागा वाटपाबाबत बैठक झाली. येथे विश्वास पाटील व नरके यांनी दोन जागांवर आग्रह धरल्याचे समजते. करवीरला पाच जागा मिळणार असून, त्यामध्ये विश्वास पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. चौथी जागा ‘शेकाप’ला मिळू शकते. पाचवी जागा मंत्री पाटील ‘दक्षिण’मध्ये टाकू शकतात.

यड्रावकर, माने यांच्याशी आज चर्चा

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्याशी आज, सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ चर्चा करणार आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू

एकीकडे विरोधकांच्या बैठकांवर बैठका सुरू असताना सत्तारूढ गटाचे संचालक मात्र ठरावधारकांच्या गाठीभेटीत व्यस्त आहेत. थेट मतदारांना भेटून पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती ते देत आहेत.