शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

अडीच वर्षे झाली तरीही जात नाही वस्त्या, रस्त्यांची ‘जात’; कोल्हापूर जिल्ह्यात एकाही नावात बदल नाही

By समीर देशपांडे | Updated: July 11, 2023 12:08 IST

राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक

समीर देशपांडेकोल्हापूर: पुरोगामी महाराष्ट्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय २०२० साली घेण्यात आला. त्यानुसार शासन आदेश निघाला. परंतु गेल्या अडीच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही अशा नाव बदलण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिलेली नाही. राज्यभरही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता असून पूर्तताच होणार नसेल तर शासन आदेश काढतेच कशाला अशी विचारणा होत आहे.राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक आहे. पूर्वीच्या काळी ज्या गल्लीत ज्या समाजाचे ग्रामस्थ राहतात तेच नाव गल्लीला दिले जायचे. परंतु सामाजिक सलोखा वाढावा यासाठी अशी नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला. ११ डिसेंबर २०२० रोजी याचा शासन आदेशही काढण्यात आला. यानंतर नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अशी होती नाव बदलण्याची पद्धत

  • एखाद्या वस्तीचे, रस्त्याचे जातिवाचक नाव बदलावयाचे असल्यास ग्रामसभेने तसा ठराव करून तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
  • गटविकास अधिकारी यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावा. त्यांनी तो तपासून विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा.
  • शासन स्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करून मंत्री महोदयांच्या मान्यतेने त्यावर कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थितीतालुका - प्रस्ताव सादरकरवीर १९२कागल १६५शाहूवाडी १३७पन्हाळा १२०हातकणंगले ९९आजरा ९२भुदरगड ४०चंदगड ३६गडहिंग्लज ३०गगनबावडा २८राधानगरी २५शिरोळ १०पुन्हा मुंडे आलेत बघुया

२०२० साली हा शासन आदेश काढताना धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री होते. आता ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांनाच सामाजिक न्याय खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास ते आपल्या काळच्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.

लवकर अंमलबजावणी कराशासनाने काढलेल्या या आदेशानुसार प्रशासनाने याची लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ही प्रक्रिया किमान नवीन मंत्र्यांनी तातडीने राबवावी. - किरण कांबळे, माजी नगरसेवक, आजरा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर