शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षे झाली तरीही जात नाही वस्त्या, रस्त्यांची ‘जात’; कोल्हापूर जिल्ह्यात एकाही नावात बदल नाही

By समीर देशपांडे | Updated: July 11, 2023 12:08 IST

राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक

समीर देशपांडेकोल्हापूर: पुरोगामी महाराष्ट्रातील जातिवाचक गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय २०२० साली घेण्यात आला. त्यानुसार शासन आदेश निघाला. परंतु गेल्या अडीच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही अशा नाव बदलण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिलेली नाही. राज्यभरही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता असून पूर्तताच होणार नसेल तर शासन आदेश काढतेच कशाला अशी विचारणा होत आहे.राज्यातील अनेक शहरांमधील आणि गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची नावे ही जातिवाचक आहे. पूर्वीच्या काळी ज्या गल्लीत ज्या समाजाचे ग्रामस्थ राहतात तेच नाव गल्लीला दिले जायचे. परंतु सामाजिक सलोखा वाढावा यासाठी अशी नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला. ११ डिसेंबर २०२० रोजी याचा शासन आदेशही काढण्यात आला. यानंतर नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अशी होती नाव बदलण्याची पद्धत

  • एखाद्या वस्तीचे, रस्त्याचे जातिवाचक नाव बदलावयाचे असल्यास ग्रामसभेने तसा ठराव करून तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
  • गटविकास अधिकारी यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवावा. त्यांनी तो तपासून विभागीय आयुक्तांच्या मार्फत शासनाकडे मान्यतेसाठी पाठवावा.
  • शासन स्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करून मंत्री महोदयांच्या मान्यतेने त्यावर कार्यवाही केली जाईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थितीतालुका - प्रस्ताव सादरकरवीर १९२कागल १६५शाहूवाडी १३७पन्हाळा १२०हातकणंगले ९९आजरा ९२भुदरगड ४०चंदगड ३६गडहिंग्लज ३०गगनबावडा २८राधानगरी २५शिरोळ १०पुन्हा मुंडे आलेत बघुया

२०२० साली हा शासन आदेश काढताना धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री होते. आता ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांनाच सामाजिक न्याय खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास ते आपल्या काळच्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.

लवकर अंमलबजावणी कराशासनाने काढलेल्या या आदेशानुसार प्रशासनाने याची लवकर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ही प्रक्रिया किमान नवीन मंत्र्यांनी तातडीने राबवावी. - किरण कांबळे, माजी नगरसेवक, आजरा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर