शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी नावे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश ...

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मंत्रालय, मुंबई येथे दि. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये केली.

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी मध्यम प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन १९६५ ते ६६ च्या दरम्यान करण्यात आली. त्यावेळी राधानगरी तालुक्यातील तुळशी खोरा हा प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही पाण्यापासून वंचित होता; यामुळे धामोड येथे तुळशी प्रकल्पाचे काम सुरू झाले. याकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ४० वर्षांपूर्वी देवस्थानच्या जमिनी ११ महिन्यांच्या करार पद्धतीने कसण्याकरिता वाटप केल्या होत्या; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींवर कर्जे काढणे, त्यांची खरेदी अथवा विक्री करणे यांसह अन्य खासगी कामाकरिता वापरता येत नव्हत्या. यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सदरील जमिनी बदलून अथवा नावे करण्याबाबतची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली होती. याबाबत वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या; परंतु तोडगा निघत नसल्याने प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन सदरील बाब मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, तुळशी प्रकल्पग्रस्तांना तत्कालीन वेळी जमिनी वाटप करतेवेळी सदरील जमिनी या देवस्थान असल्याबाबत शहनिशा न करता वाटप करण्यात आल्या असाव्यात. यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा कोणताही दोष नाही; परंतु आज याबाबत जर धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असल्यास सदरील जमीन वर्ग-२ वरून वर्ग -१ कराव्या लागतील; याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास पाठवून द्यावा. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तुळशी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.