शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी नावे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश ...

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मंत्रालय, मुंबई येथे दि. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये केली.

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी मध्यम प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन १९६५ ते ६६ च्या दरम्यान करण्यात आली. त्यावेळी राधानगरी तालुक्यातील तुळशी खोरा हा प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही पाण्यापासून वंचित होता; यामुळे धामोड येथे तुळशी प्रकल्पाचे काम सुरू झाले. याकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ४० वर्षांपूर्वी देवस्थानच्या जमिनी ११ महिन्यांच्या करार पद्धतीने कसण्याकरिता वाटप केल्या होत्या; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींवर कर्जे काढणे, त्यांची खरेदी अथवा विक्री करणे यांसह अन्य खासगी कामाकरिता वापरता येत नव्हत्या. यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सदरील जमिनी बदलून अथवा नावे करण्याबाबतची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली होती. याबाबत वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या; परंतु तोडगा निघत नसल्याने प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन सदरील बाब मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, तुळशी प्रकल्पग्रस्तांना तत्कालीन वेळी जमिनी वाटप करतेवेळी सदरील जमिनी या देवस्थान असल्याबाबत शहनिशा न करता वाटप करण्यात आल्या असाव्यात. यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा कोणताही दोष नाही; परंतु आज याबाबत जर धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असल्यास सदरील जमीन वर्ग-२ वरून वर्ग -१ कराव्या लागतील; याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास पाठवून द्यावा. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तुळशी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.