शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘शिवपुतळा’ परिसरात खेळखंडोबा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:41 IST

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसुशोभीकरणाच्या नावाखाली ‘शिवपुतळा’ परिसरात खेळखंडोबा नकोबगीच्याचा मूळ ढाचा कायम ठेवावा; पावित्र्य जपावे

संतोष मिठारीकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सुमारे दोन एकर परिसरात शिवपुतळा आणि बगीचा साकारण्यात आला आहे. माजी कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार आणि माजी कुलसचिव उषा इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली या बगीचा परिसराचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून विटा तयार करून या बगीचा, त्याचा वर्तुळाकार संरक्षक कठडा, आदींचे काम केले.

त्यानंतर सन १९७४ मध्ये या बगीचाच्या मध्यभागी शिवपुतळा बसविण्यात आला. त्यामुळे परिसराबाबत संबंधित घटकांचे भावनिक बंध आहेत. या बगीचा परिसराला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पुतळ्याकडे जाणारे चार बाजूंचे फुटपाथ खराब झाले आहेत.

पुतळा धुण्यासाठी त्या ठिकाणी वाहन जाण्याकरिता या फुटपाथची रुंदी वाढविणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, या परिसराचा मूळ ढाचा मोडून त्यात बदल करणे म्हणजे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्रम, आस्था आणि भावनेशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे या परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवणे, पावित्र्य जपणे हे लक्षात घेऊन सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.

नागरी कृती समितीचा विरोधसुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला आहे. शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली आहे.

तीन वर्षांपूर्वी नाकारला प्रस्तावया परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव विद्यापीठाच्या बांधकाम समितीसमोर तीन वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी बगीचा परिसरातील नव्या रचनेतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी हा प्रस्ताव समितीने नाकारला होता. गेल्या आठ महिन्यांपूर्वी हेरिटेज समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.

सुशोभीकरणात याचा विचार व्हावा...

  1.  या पुतळा परिसरातील बगीच्याचा मूळ ढाचा कायम ठेवावा.
  2. फूटपाथवर प्रवेशाची त्रिकोणी रचना, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करणे टाळावे.
  3. रात्रीच्या वेळी शिवपुतळा स्पष्टपणे दिसेल अशी प्रकाशव्यवस्था येथे करावी.
  4.  पुतळा परिसरातील बगीचा बारा महिने हिरवागार राहण्याची व्यवस्था करावी.

विद्यापीठातील शिवपुतळा आणि बगीचा परिसराला मोठा इतिहास आहे. पुतळा उभारणी, बगीचा तयार करण्यामध्ये शेतकरी, विद्यापीठातील कर्मचारी, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी योगदान दिले आहे. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली या घटकांचे योगदान, इतिहास पुसण्याचे काम होऊ नये. त्याची मोडतोड करण्यात येऊ नये. वास्तविकपणे पाहता या परिसरात सुशोभीकरणाची गरज नाही.- संभाजीराव जगदाळे, माजी कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ 

या बगीचा परिसराच्या रेलिंगसाठी सध्या वापरलेला दगड चांगला नाही. शिवाय रेलिंगची रचना मुगलशाही पद्धतीची वाटते; त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. ही रचना आणि दगड बदलावा. रेलिंगची रचना मराठेशाही किल्ल्यांवरील संरक्षण कठड्याला असते, तशी करावी; त्यासाठी जोतिबा डोंगरावरील दगड वापरावा. बगीचा परिसराच्या मूळ ढाच्याची मोडतोड करण्यात येऊ नये.-अशोक पोवार,सदस्य, समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समिती

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर