शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘शिवपुतळा’ परिसरात खेळखंडोबा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:41 IST

शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.

ठळक मुद्देसुशोभीकरणाच्या नावाखाली ‘शिवपुतळा’ परिसरात खेळखंडोबा नकोबगीच्याचा मूळ ढाचा कायम ठेवावा; पावित्र्य जपावे

संतोष मिठारीकोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सुमारे दोन एकर परिसरात शिवपुतळा आणि बगीचा साकारण्यात आला आहे. माजी कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार आणि माजी कुलसचिव उषा इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली या बगीचा परिसराचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून विटा तयार करून या बगीचा, त्याचा वर्तुळाकार संरक्षक कठडा, आदींचे काम केले.

त्यानंतर सन १९७४ मध्ये या बगीचाच्या मध्यभागी शिवपुतळा बसविण्यात आला. त्यामुळे परिसराबाबत संबंधित घटकांचे भावनिक बंध आहेत. या बगीचा परिसराला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पुतळ्याकडे जाणारे चार बाजूंचे फुटपाथ खराब झाले आहेत.

पुतळा धुण्यासाठी त्या ठिकाणी वाहन जाण्याकरिता या फुटपाथची रुंदी वाढविणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, या परिसराचा मूळ ढाचा मोडून त्यात बदल करणे म्हणजे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्रम, आस्था आणि भावनेशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे या परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवणे, पावित्र्य जपणे हे लक्षात घेऊन सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.

नागरी कृती समितीचा विरोधसुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला आहे. शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली आहे.

तीन वर्षांपूर्वी नाकारला प्रस्तावया परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव विद्यापीठाच्या बांधकाम समितीसमोर तीन वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी बगीचा परिसरातील नव्या रचनेतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी हा प्रस्ताव समितीने नाकारला होता. गेल्या आठ महिन्यांपूर्वी हेरिटेज समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.

सुशोभीकरणात याचा विचार व्हावा...

  1.  या पुतळा परिसरातील बगीच्याचा मूळ ढाचा कायम ठेवावा.
  2. फूटपाथवर प्रवेशाची त्रिकोणी रचना, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करणे टाळावे.
  3. रात्रीच्या वेळी शिवपुतळा स्पष्टपणे दिसेल अशी प्रकाशव्यवस्था येथे करावी.
  4.  पुतळा परिसरातील बगीचा बारा महिने हिरवागार राहण्याची व्यवस्था करावी.

विद्यापीठातील शिवपुतळा आणि बगीचा परिसराला मोठा इतिहास आहे. पुतळा उभारणी, बगीचा तयार करण्यामध्ये शेतकरी, विद्यापीठातील कर्मचारी, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी योगदान दिले आहे. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली या घटकांचे योगदान, इतिहास पुसण्याचे काम होऊ नये. त्याची मोडतोड करण्यात येऊ नये. वास्तविकपणे पाहता या परिसरात सुशोभीकरणाची गरज नाही.- संभाजीराव जगदाळे, माजी कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ 

या बगीचा परिसराच्या रेलिंगसाठी सध्या वापरलेला दगड चांगला नाही. शिवाय रेलिंगची रचना मुगलशाही पद्धतीची वाटते; त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. ही रचना आणि दगड बदलावा. रेलिंगची रचना मराठेशाही किल्ल्यांवरील संरक्षण कठड्याला असते, तशी करावी; त्यासाठी जोतिबा डोंगरावरील दगड वापरावा. बगीचा परिसराच्या मूळ ढाच्याची मोडतोड करण्यात येऊ नये.-अशोक पोवार,सदस्य, समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समिती

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर