शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नाले ओढ्यांची रुंदी, खोली वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात नाले, ओढ्यांची संख्या मोठी असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नोव्हेंबरपासून त्यांची रुंदी, खोली वाढवणे ...

कोल्हापूर : जिल्ह्यात नाले, ओढ्यांची संख्या मोठी असून, त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नोव्हेंबरपासून त्यांची रुंदी, खोली वाढवणे व त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तहसीलदारांना ऑक्टोबरअखेरपर्यत या नाले-ओढ्यांची विस्तृत माहिती गोळा करून ठेवायला सांगितल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘लोकसहभागातून पाणंद रस्त्यांची माेहीम ज्याप्रमाणे यशस्वी करण्यात आली, त्याचप्रमाणे नाले-ओढ्यांची खोली, रुंदी वाढवून त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाईल. पंचनामे पूर्ण होऊन एकदा सर्वांना मदतीचे धनादेश मिळायला सुरुवात झाली, की ही मोहीम सुरू होईल. पुनर्वसनाबाबत नागरिकांची वेगवेगळी मतं आहेत, ती विचारात घेऊन कार्यवाही केली जाईल. आधी ५० टक्के नागरिकांचे, उर्वरित लोकांचे पुढच्यावर्षी असे पुनर्वसन केले जाईल; पण याची सुरुवात होणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाली असून, त्यांनी दोन टप्प्यात पैसे देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागेल. रस्त्याचा प्रस्ताव, मान्यता, निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला डिसेंबर महिना उजाडेल. शहरातील ३४ वॉर्ड पूरबाधित होते, तेथील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य असेल.

----

पुनर्वसनाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक

पूरबाधित गावं, नागरिकांचे दुसऱ्या जागेत पुनर्वसन याला प्राधान्य असणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात शुक्रवार किंवा शनिवारी त्या-त्या तालुक्यांचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची बैठक होईल. यात तहसीलदार व अधिकारी पुनर्वसनाच्या जागेचा प्रस्ताव, ते शक्य नसेल तर अन्य पर्याय मांडतील. रमाई, शबरी, पंतप्रधान आवास अशा घरकुल योजना तसेच दीनदयाळ उपाध्याय, दादासाहेब गायकवाड योजनेतून जमीन खरेदी अशा विविध योजनांमधून पूरग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकेल का, याची माहिती दिली जाणार आहे.

----

मोर्चे, आंदोलनांची घाई नको..

शिरोळसह काही तालुक्यामधील पूरबाधितांनी माेर्चे, आंदोलने सुरू केली आहेत, यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पंचनामे पूर्ण होऊ दे, त्यानुसार मदत दिली जाईल, हे जाहीर केले आहे. आता सानुग्रह अनुदानाचा शासन आदेश निघाला आहे. काही दिवसात शेतीच्या मदतीचा निघेल. आम्ही सगळ्यांनी बांधावर जावून पूरस्थिती पाहिली आहे, लोकांच्या अपेक्षा माहीत आहेत. सरकार म्हणून आम्ही सकारात्मकच आहोत, पण निर्णय होईपर्यंत नागरिकांची वाट बघावी. निर्णय नाही पटला तर चर्चा करून बदल करता येईल. तोपर्यंत मोर्चे, आंदोलनाची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

--

आठवड्यात १० हजार खात्यावर जमा

जिल्ह्यात कृषी वगळता अन्य नुकसानाचे पंचनामे जवळपास संपत आले आहेत. मंगळवारपर्यंत सर्वच पंचनामे संपवण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. सानुग्रह अनुदानासाठी १७ कोटींचा निधी मिळाला असून, आणखी १७ कोटी काढण्याची सरकारने परवानगी दिली आहे, पुढील आठ दिवसांत पूरबाधितांच्या खात्यावर प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान मिळायला सुरुवात होईल.