शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

नागपूर-रत्नागिरी महामार्ग पूरबाधित क्षेत्रातून नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा शिये (ता. करवीर) येथील पूरबाधित क्षेत्रातून जात आहे. येथे भराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा शिये (ता. करवीर) येथील पूरबाधित क्षेत्रातून जात आहे. येथे भराव टाकून रस्ता झाल्यास पुराचा फटका करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहराला बसणार आहे. यासाठी सध्याच्या राज्य मार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गावकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. शिंदे म्हणाले, महामार्गाचा नकाशा राजकीय हस्तक्षेपामुळे दोन वेळा बदलण्यात आला. राजकीय मंडळींचा चार-आठ घरे वाचविण्यासाठी शिये परिसरातील शेतकऱ्यांची ९० एकर जमिनी गिळंकृत करण्याचा डाव आहे. या रस्त्याच्या रेखांकनास आम्ही विरोध केला. मात्र पोलीस बळाचा वापर करून तो मोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेतच, त्याशिवाय रेखांकित भागात दहा फूट पुराचे पाणी होते. त्यामुळे महामार्ग करताना येथे मोठ्या प्रमाणात मुरूम टाकला जाणार असल्याने पाण्याच्या तुंबीने करवीर तालुक्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहर पाण्याखाली जाणार आहे. हा महामार्ग सांगलीतून इस्लामपूर, शिराळा, मलकापूर असा करावा अथवा हातकणंगले, वाठार, वारणा, बोरपाडळे हा मार्गही योग्य आहे. या मार्गासाठी कोणाचीही हरकत नसताना शियेतूनच महामार्ग काढण्याचा अट्टहास कोणाचा, या रस्त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेतल्या होत्या. मात्र, त्याची दखलही घेतली नाही. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत असून तरीही रस्ता सुुरू केला तर मुरमाच्या ट्रकखाली आडवे होऊ, असा इशारा ॲड. शिंदे यांनी दिला. यावेळी राजेश नाईक, परशराम शिंदे, कृष्णात खुटाळे, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, निखिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.