शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:38 IST

राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील मानेकोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मंगळवारी नूतन खासदार धैर्यशील माने यांचा फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार माने यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना राजकीय वाटचालही विशद केली. ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे.

नकारात्मक वातावरण असतानाही, आर्थिक बळ नसतानाही, शंका-कुशंकांच्या वातावरणातही बहुजनांच्या जिवावर संसदेत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली. राजकारण पाच वर्षांनंतर करणार. आता समाजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शाहूंच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पुढील दोन वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील खासदारांनी सुरू केलेली कोणतीही कामे बंद करणार नाही, आकसाने कधी वागणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालतच माझी वाटचाल सुरू राहील. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील, विजय पोवार उपस्थित होते.‘संसदरत्न’ दिलं तरी नको!‘संसदरत्न’ पुरस्काराविषयी छेडले असता खासदार माने यांनी ‘संसदरत्न दिलं तरी नको रे बाबा...’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा पुरस्कार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेत धावण्याची माझी इच्छा नाही; याउलट लोकांना न्याय देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर