शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:38 IST

राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील मानेकोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मंगळवारी नूतन खासदार धैर्यशील माने यांचा फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार माने यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना राजकीय वाटचालही विशद केली. ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे.

नकारात्मक वातावरण असतानाही, आर्थिक बळ नसतानाही, शंका-कुशंकांच्या वातावरणातही बहुजनांच्या जिवावर संसदेत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली. राजकारण पाच वर्षांनंतर करणार. आता समाजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शाहूंच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पुढील दोन वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील खासदारांनी सुरू केलेली कोणतीही कामे बंद करणार नाही, आकसाने कधी वागणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालतच माझी वाटचाल सुरू राहील. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील, विजय पोवार उपस्थित होते.‘संसदरत्न’ दिलं तरी नको!‘संसदरत्न’ पुरस्काराविषयी छेडले असता खासदार माने यांनी ‘संसदरत्न दिलं तरी नको रे बाबा...’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा पुरस्कार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेत धावण्याची माझी इच्छा नाही; याउलट लोकांना न्याय देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर