शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:38 IST

राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील मानेकोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मंगळवारी नूतन खासदार धैर्यशील माने यांचा फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार माने यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना राजकीय वाटचालही विशद केली. ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे.

नकारात्मक वातावरण असतानाही, आर्थिक बळ नसतानाही, शंका-कुशंकांच्या वातावरणातही बहुजनांच्या जिवावर संसदेत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली. राजकारण पाच वर्षांनंतर करणार. आता समाजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शाहूंच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पुढील दोन वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील खासदारांनी सुरू केलेली कोणतीही कामे बंद करणार नाही, आकसाने कधी वागणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालतच माझी वाटचाल सुरू राहील. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील, विजय पोवार उपस्थित होते.‘संसदरत्न’ दिलं तरी नको!‘संसदरत्न’ पुरस्काराविषयी छेडले असता खासदार माने यांनी ‘संसदरत्न दिलं तरी नको रे बाबा...’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा पुरस्कार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेत धावण्याची माझी इच्छा नाही; याउलट लोकांना न्याय देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर