शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणे’विषयी माझी भूमिका समन्वयाची: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:38 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी ...

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी दोष का दिला जात आहे? तसेच इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी ‘टफ्स्’चे ३५० कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. यंत्रमाग केंद्रातील भाजपच्या सहा खासदारांनी काय केले, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी उपस्थित केला.सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये वारणा नळ योजनेला विरोध केला म्हणून भाजपकडून खासदार शेट्टींना ‘टार्गेट’ केले जात आहे, तर शेट्टींनी वस्त्रोद्योगासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी मंगळवारी इचलकरंजी शहर व परिसरातील काही प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी भाजपच्या या फसव्या प्रचाराबाबत ते बोलत होते.ते म्हणाले, वारणा नळ योजना कॉँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झाली. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे वारणा नदीकाठावर जॅकवेलची जागाही निश्चित झाली होती; पण पंचगंगा-कृष्णाबरोबर वारणा नदी प्रदूषित होणार म्हणून आपण कोल्हापूरप्रमाणे काळम्मावाडी धरणाचे पाणी आणू, असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळम्मावाडीचा पुरस्कार केला. त्याचा एक कोटी ८० लाख रुपयांचा डीपीआर नगरपालिकेने करून घेतला; पण पुढे त्याचा पाठपुरावा केला नाही.दोन-अडीच वर्षांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झालेल्या बैठकीत ७४५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी योजना शासनाने राबविली, तरी या योजनेचे वीज बिल व व्यवस्थापन खर्च नगरपालिकेला सोसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आमदार हाळवणकर व नगरपालिकेने दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा योजना करण्याचे निश्चित केले. मात्र, २०१५-१६ मध्ये पाऊस कमी झाला. वारणाकाठावर शेती सिंचनासाठी दोन-अडीच महिने बंदी आली. दुष्काळी झळा जाणवू लागल्याने दानोळीसह नदीकाठावरील अन्य गावांनीही वारणा नळ योजनेला विरोध केला. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा योजनेचे आॅनलाईन उद्घाटनही केले होते. अशा घडामोडींमध्ये आमदार हाळवणकर यांना खासदार शेट्टींची आठवण झाली नाही; पण दानोळी येथून विरोध चालू होताच त्याचे खापर मात्र माझ्यावर फोडले गेले.पण, वारणा योजनेस विरोध करणारे महादेवराव धनवडे आणि आमदार उल्हास पाटील हे शिवसेनेचे होते. भाजपचे सहयोगी सदस्य असूनसुद्धा त्यांचा विरोध कमी करण्यात आमदार हाळवणकरांनी काय केले? त्यांना आलेल्या अपयशासाठी मलाच दोषी ठरविले जात आहे. असे असले तरी आपण वारणा नदीकाठावरील शेतकरी व इचलकरंजीची जनता यांच्यात समन्वय साधून वारणा नळ योजना पूर्ण करू, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.वस्त्रोद्योगाबाबत शेट्टी म्हणाले, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, बृहाणपूर, सुरत, भिलवाडा अशा सहा ठिकाणचे खासदार भाजपचेच आहेत. त्या खासदारांनी वस्त्रोद्योगासाठी काही केले नाही. उलट ‘टफ्स्’अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची ३५० कोटींची रक्कम इचलकरंजी परिसरातील उद्योजकांना मिळवून दिली. वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी असलेले ३० टक्के अनुदान भाजप सरकारने दहा टक्क्यांवर आणले. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे उद्योजकांचे गाºहाणे मांडावयास गेले तरी त्यांना वस्त्रोद्योगातील काही समजत नाही आणि समजावून घेऊन काही करायची त्यांची इच्छा नाही.सुलभ रोजगार देणाºया या उद्योगाकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या कर्जावरील व्याजदर अनुदानाचे आश्वासन पूर्ण केले नाही. यंत्रमाग क्षेत्रासाठी एक रुपया वीज अनुदान दिले, तर दुसºया घटकाचे विजेचे दर वाढवून त्यातून आलेली रक्कम अनुदान म्हणून पहिल्या घटकाला दिली. असे विचित्र धोरण सरकारचे आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. यासह आणखीन काही प्रश्नांवर खासदार शेट्टी यांनी भूमिका मांडली.आपणच शहाणे असल्याचा भाजप मंत्र्यांचा आविर्भावपूर्वीच्या कॉँग्रेस सरकारच्या काळात मंत्र्यांकडून लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात होत्या. काही मुद्दे ऐकून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असे; पण सध्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आपणच शहाणे आहोत, असा आविर्भाव आणतात. यांना कितीही सांगितले तरी ते काहीच करीत नाहीत आणि काही केले तर त्यातून अधिक क्लिष्टता निर्माण केली जाते, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी केली.