शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

‘वारणे’विषयी माझी भूमिका समन्वयाची: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:38 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी ...

इचलकरंजी : वारणा नळ योजनेसाठी विरोध करणारे शिवसेनेचे आहेत. या योजनेविषयी माझी भूमिका समन्वयाची असूनही पिण्याच्या पाण्यासाठी मला अनाठायी दोष का दिला जात आहे? तसेच इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी ‘टफ्स्’चे ३५० कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. यंत्रमाग केंद्रातील भाजपच्या सहा खासदारांनी काय केले, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी उपस्थित केला.सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये वारणा नळ योजनेला विरोध केला म्हणून भाजपकडून खासदार शेट्टींना ‘टार्गेट’ केले जात आहे, तर शेट्टींनी वस्त्रोद्योगासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी मंगळवारी इचलकरंजी शहर व परिसरातील काही प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी भाजपच्या या फसव्या प्रचाराबाबत ते बोलत होते.ते म्हणाले, वारणा नळ योजना कॉँग्रेस सरकारच्या काळात मंजूर झाली. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे वारणा नदीकाठावर जॅकवेलची जागाही निश्चित झाली होती; पण पंचगंगा-कृष्णाबरोबर वारणा नदी प्रदूषित होणार म्हणून आपण कोल्हापूरप्रमाणे काळम्मावाडी धरणाचे पाणी आणू, असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळम्मावाडीचा पुरस्कार केला. त्याचा एक कोटी ८० लाख रुपयांचा डीपीआर नगरपालिकेने करून घेतला; पण पुढे त्याचा पाठपुरावा केला नाही.दोन-अडीच वर्षांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झालेल्या बैठकीत ७४५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी योजना शासनाने राबविली, तरी या योजनेचे वीज बिल व व्यवस्थापन खर्च नगरपालिकेला सोसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आमदार हाळवणकर व नगरपालिकेने दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा योजना करण्याचे निश्चित केले. मात्र, २०१५-१६ मध्ये पाऊस कमी झाला. वारणाकाठावर शेती सिंचनासाठी दोन-अडीच महिने बंदी आली. दुष्काळी झळा जाणवू लागल्याने दानोळीसह नदीकाठावरील अन्य गावांनीही वारणा नळ योजनेला विरोध केला. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा योजनेचे आॅनलाईन उद्घाटनही केले होते. अशा घडामोडींमध्ये आमदार हाळवणकर यांना खासदार शेट्टींची आठवण झाली नाही; पण दानोळी येथून विरोध चालू होताच त्याचे खापर मात्र माझ्यावर फोडले गेले.पण, वारणा योजनेस विरोध करणारे महादेवराव धनवडे आणि आमदार उल्हास पाटील हे शिवसेनेचे होते. भाजपचे सहयोगी सदस्य असूनसुद्धा त्यांचा विरोध कमी करण्यात आमदार हाळवणकरांनी काय केले? त्यांना आलेल्या अपयशासाठी मलाच दोषी ठरविले जात आहे. असे असले तरी आपण वारणा नदीकाठावरील शेतकरी व इचलकरंजीची जनता यांच्यात समन्वय साधून वारणा नळ योजना पूर्ण करू, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.वस्त्रोद्योगाबाबत शेट्टी म्हणाले, भिवंडी, मालेगाव, सोलापूर, बृहाणपूर, सुरत, भिलवाडा अशा सहा ठिकाणचे खासदार भाजपचेच आहेत. त्या खासदारांनी वस्त्रोद्योगासाठी काही केले नाही. उलट ‘टफ्स्’अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची ३५० कोटींची रक्कम इचलकरंजी परिसरातील उद्योजकांना मिळवून दिली. वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी असलेले ३० टक्के अनुदान भाजप सरकारने दहा टक्क्यांवर आणले. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे उद्योजकांचे गाºहाणे मांडावयास गेले तरी त्यांना वस्त्रोद्योगातील काही समजत नाही आणि समजावून घेऊन काही करायची त्यांची इच्छा नाही.सुलभ रोजगार देणाºया या उद्योगाकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या कर्जावरील व्याजदर अनुदानाचे आश्वासन पूर्ण केले नाही. यंत्रमाग क्षेत्रासाठी एक रुपया वीज अनुदान दिले, तर दुसºया घटकाचे विजेचे दर वाढवून त्यातून आलेली रक्कम अनुदान म्हणून पहिल्या घटकाला दिली. असे विचित्र धोरण सरकारचे आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. यासह आणखीन काही प्रश्नांवर खासदार शेट्टी यांनी भूमिका मांडली.आपणच शहाणे असल्याचा भाजप मंत्र्यांचा आविर्भावपूर्वीच्या कॉँग्रेस सरकारच्या काळात मंत्र्यांकडून लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात होत्या. काही मुद्दे ऐकून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असे; पण सध्याच्या भाजप सरकारमधील मंत्री आपणच शहाणे आहोत, असा आविर्भाव आणतात. यांना कितीही सांगितले तरी ते काहीच करीत नाहीत आणि काही केले तर त्यातून अधिक क्लिष्टता निर्माण केली जाते, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी केली.