शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

माझी निवडणूक तरुणांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:17 IST

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे ...

सेनापती कापशी : युवक हा प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतो. युवक जर पेटून उठला तर तो काय करू शकतो, हे मी अनेक निवडणुकीत अगदी जवळून पाहिले आहे. निवडणुकीच्या निकालांचे परिणाम तो बदलू शकतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरूण सज्ज झाले असून, कागल विधानसभा मतदारसंघातील तरुणांनीच माझी निवडणूक हातात घेतली आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.सेनापती कापशी (ता. कागल) येथे आयोजित ‘साद तरुणाईची....संवाद युवकांशी’ या सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते.नोटाबंदी, जीएसटी सारख्याच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले ही वस्तुस्थिती आहे. देशातील कोणताही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. खोटी-नाटी स्वप्ने दाखवून जनतेला फसविण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून सुरू आहे. शिवसेनेने मोर्चे काढत बसण्यापेक्षा राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडायचे धाडस दाखवले पाहिजे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर आता जनतेने आक्रमक झाले पाहिजे, असेही आमदार मुश्रीफ यावेळी म्हणाले.माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यावेळी म्हणाले, आमदार मुश्रीफ यांच्यामुळे नागणवाडी प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण करून येत्या पावसाळ्यात पाणी साठविण्याचे कामही तेच पूर्ण करतील, यावर जनतेचा विश्वास आहे. चिकोत्रा प्रकल्पात सर्वांत जास्त पाणी हे म्हातारीचे पठारावरून येत आहे. हे कामही आमदार मुश्रीफ यांनीच पूर्ण केले आहे. आपापसातील मतभेद विसरून मुश्रीफ यांना ताकद देऊन सर्वांनी एकत्र येऊन येणारी विधानसभेची निवडणूक लढूया.सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, तमनाकवाडचे सरपंच दत्तात्रय चव्हाण, तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव पाटील, विजय सातवेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रवीण नाईकवाडे यांनी, तर प्रास्ताविक सूर्यकांत भोसले यांनी केले.यावेळी कार्यक्रमास भय्या माने, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, जे. डी. मुसळे, नेताजी मोरे, अंकुश पाटील, मधुकर नाईक, बळवंत तिप्पे, सागर पाटील, बाबूराव अस्वले, बाळासाहेब खतकल्ले, आदीसह सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.