शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

‘वारणे’च्या निधीसाठी माझेही योगदान : राजू शेट्टी-काही मंडळींकडून माझी बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:05 IST

इचलकरंजी : शहरासाठी आवश्यक असलेल्या वारणा नळ योजनेसाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी आणण्यामध्ये आपले योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो-उदो करीत माझी बदनामी करीत आहेत.

इचलकरंजी : शहरासाठी आवश्यक असलेल्या वारणा नळ योजनेसाठी केंद्राच्या अमृत योजनेतून निधी आणण्यामध्ये आपले योगदान आहे. मात्र, काही मंडळी स्वत:चा उदो-उदो करीत माझी बदनामी करीत आहेत. या योजनेला माझा विरोध नाही. दानोळीकरांच्या मनातील शंका दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत असताना खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील २७ शाळांना संगणक प्रदान आणि विविध अशा ९६ ठिकाणी कूपनलिका खुदाई प्रारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार शेट्टी बोलत होते.गेल्या चार वर्षांपासून इचलकरंजीसाठी वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र, वारणाकाठच्या ग्रामस्थांचा या योजनेला विरोध आहे. त्या विरोधामागच्या अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे; पण वारणा नदीतील पाणी वाटपाबाबत असलेली वस्तुस्थिती पाटबंधारे खात्याने जनतेसमोर स्पष्ट केली पाहिजे. ज्यातून गैरसमज दूर होतील, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अ‍ॅड. सुरेश पाटील यांनी स्वागत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष विजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉँग्रेसचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुनील पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, राजू बोंद्रे, माजी जि. प. सदस्य जयकुमार कोले, गोवर्धन दबडे, अलका खोचरे, शिवाजी माने, आदींनी आपले विचार मांडले.कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षभगवान काटे, जि. प. महिला व बालकल्याण सभापती शुभांगीशिंदे, सावकार मादनाईक, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, आप्पा बेडगे, राजाराम देसाई, नितीन कोकणे, आदींसह नागरिक उपस्थित होते.शेतकºयांनासुद्धा आरक्षण द्यावेकार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी यांनी शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील आर्थिक निकषावर आरक्षण याचा धागा पकडला व ते पुढे म्हणाले, बहुसंख्य शेतकरी सर्वसामान्य आहेत. त्यामुळे शेतकºयांनासुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण देणे, ही आता काळाची गरज आहे.

यंत्रमाग उद्योग वाºयावरकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, तर राज्य सरकारनेसुद्धा वस्त्रोद्योग धोरण जाहीर करताना यंत्रमाग उद्योगाला वाºयावर सोडले आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी यंत्रमाग उद्योगाला वीजदराची सवलत व कर्जावरील व्याजदरात सूट देण्याची दिलेली ग्वाहीसुद्धा आता पोकळ ठरली आहे, अशीही टीका खासदार शेट्टी यांनी यावेळी केली.