शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

कोल-२ आंबेआहोळच्या प्रकरणात मुश्रीफ यांनी कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आंबेआहोळ मध्यम प्रकल्पासाठीची संपादित जमीन श्री स्वामी जगद‌्गुरू शंकराचार्य पीठाची असून या जमिनीच्या बदल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आंबेआहोळ मध्यम प्रकल्पासाठीची संपादित जमीन श्री स्वामी जगद‌्गुरू शंकराचार्य पीठाची असून या जमिनीच्या बदल्यात योग्य नुकसान भरपाई पीठाला मिळालेली नाही. हे प्रकरण आजतागायत उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तरी यात मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी असलेल्या व बेकायदेशीर वागलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पीठाचे सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी शनिवारी पत्रकाद्वारे केली.

जमीन संपादनाच्या कारवाईदरम्यान भूसंपादन अधिकाऱ्यांनी २००६ रोजी नुकसान भरपाईची रक्कम तीन कोटी ७७ लाख आठ हजार ८२९ इतकी निश्चित केली होती. या जमिनी पीठाच्या मालकीच्या असून नुकसान भरपाईबाबत ट्रस्टने आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर हे प्रकरण दिवाणी न्यायालयात येणे आवश्यक होते. मात्र विशेष भूसंपादन अधिकारी यांनी ही रक्कम अधिकार नसलेल्या व्यक्तींना घाईने वाटून टाकली व त्यातील केवळ ३१ लाख ३६ हजार ६२५ रुपये न्यायालयात जमा केले. त्यानंतर ४२ लाख नऊ हजार ९४४ रुपये न्यायालयात जमा केल्याचे खोटे नमूद करीत न्यायालयाची दिशाभूल केली. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल रद्द केला व संपादनाच्या बदल्यात द्यायची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याबाबत शासनाने कारवाई केलेली नाही.

मुश्रीफ यांचे वक्तव्य चुकीचे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा दावा निकाली निघाला आहे, असे चुकीचे वक्तव्य केल्याने समाजाची दिशाभूल होऊ शकते. मंत्री मुश्रीफ यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी जगद‌्गुरूंचा दावा निकाली निघाला आहे, असे वक्तव्य केले आहे. तरी त्यांनी बाबींची चौकशी करून व आवश्यकता वाटल्यास जगद‌्गुरूंशी संपर्क साधून पीठाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीठाने केली आहे.

--

इंदुमती गणेश