शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुश्रीफ उभारणार ‘समझोत्याची गुढी’?

By admin | Updated: April 6, 2016 00:12 IST

आजरा कारखाना निवडणूक : सत्तारूढ सदस्यांना एकत्र आणणार

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -आजरा साखर कारखाना निडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचाली प्रचंड गतिमान झाल्या असून, जयवंतराव शिंपी यांना सामावून घेऊन सत्तारूढ आघाडीची मोट बांधण्यासाठी आमदार हसन मुरीफ यांनी पुढाकार घेतला असून या सत्तारूढ सदस्यांची ‘समझोता’ गुढी उभारण्यात आमदार मुश्रीफ यांना यश मिळेल, असे राजकीय जाणकारांमधून समजते.आजरा साखर कारखाना संचालकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याने निवडणुकीत हा संघर्ष उफाळून आल्यास कारखाना कारभाराचा पंचनामा होऊन एकमेकांवर चिखलफेक होण्याची शक्यता आहे. यामुळे याचे दुरगामी परिणाम कारखान्याच्या एकंदर वाटचालीवर होणार हे देखील स्पष्ट आहे.सद्य:स्थितीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस विरुद्ध अशोक चराटी आणि मित्र पक्ष असे चित्र प्राथमिक अवस्थेत दिसत आहे. समोर निवडणूक असली तरी प्रमुख नेतेमंडळी थोडीशी धास्तावलेली दिसत आहेत. अशोकअण्णा वगळता इतरांमध्ये फारशी आक्रमकता दिसत नाही. त्यामुळे नेमका हाच धागा पकडत आमदार मुश्रीफ यांनी अशोकअण्णांचे ‘बंड’ थोपविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीतील वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, उदय पवार, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, अल्बर्ट डिसोझा ही मंडळी आमदार मुश्रीफ व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. जयवंतराव राष्ट्रवादीसोबत आहेत. राहिला प्रश्न तो अशोकअण्णा चराटी यांचा.अशोकअण्णा हे जरी मुश्रीफ यांच्या विरोधात वेळोवेळी थेट बोलत असले, तरी आमदार मुश्रीफ यांच्या शब्दाला मान देणारेही आहेत. मुश्रीफ यांनी जोर लावला तर अशोकअण्णा त्यांच्या शब्दाला निश्चितच मान देतील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर अशोकअण्णा आणि मुश्रीफ यांच्यात बैठकही झाल्याचे समजते.अशोकअण्णांना विरोधी पॅनेल करण्यापासून रोखणे आणि जयवंतरावांना सन्मानपूर्वक संचालक मंडळात समाविष्ठ करून घेणे या दोन गोष्टी आमदार मुश्रीफ यांना साध्य झाल्यास निवडणुकीतील ‘हवाच’ निघून जाणार आहे आणि धक्का तंत्राचा वापर करणाऱ्या मुश्रीफ यांच्या दृष्टीने ही गोष्ट फारशी अवघड आहे असे सध्यातरी वाटत नाही. यातूनही उर्वरित मंडळींनी पॅनेल करून सत्तारूढ मंडळींच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्यास यामुळे फारसे काही घडेल, असे सध्या तरी वाटत नाही.नेते समाधानी होणार का ?अशोकअण्णा व जयवंतराव यांना संचालक मंडळात कितपत स्थान मिळणार. पुढील पाच वर्षांत चेअरमनपदी कुणा-कुणाला स्थान दिले जाणार ? जि.प. व पं. स. निवडणुकांमधील काही मुद्दे आताच स्पष्ट करावे लागणार आहेत.तर... भाजपा-स्वाभिमानी आघाडीतून बाहेरसत्तारूढ मंडळींमधून आमदार मुश्रीफ व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ताणलेले संबंध पाहता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे आणि प्रसंगी ‘स्वाभिमानी’लाही एखादी जागा घ्या अन्यथा आघाडीतून बाहेर होण्याजोगी परिस्थिती तयार केली जावू शकते.