शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

By admin | Updated: October 24, 2015 00:25 IST

बेलेवाडीच्या नंदू साळोखेची व्यथा : जगणं असह्य बनलं, जिद्दीच्या जोरावर लेखक बनला; पण..!

रवींद्र येसादे-- उत्तूर -कथा, कवितांचे लेखन करणं इतकं सोपं नाही. धडधाकट पण ये-जा करीत असताना डोक्यावरील ओझ्यानं हाय खाल्ली. बेलेवाडी (ता. आजरा) गावच्या उमद्या तरुणाच्या नशिबी अपंगत्व आलं. अपंगत्व येऊ नये, अशी म्हण आहे. मात्र, आपल्याला निसर्गाने हिरावून घेतले त्याच निसर्गाने निरीक्षण करून कथा, कविता लिहिणाऱ्या नंदू सखाराम साळोखे याला पाठबळाची गरज आहे.‘लुगडं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने नंदूच्या जीवनाचा सारिपाट उघडला. १ जानेवारी १९९८ चा दिवस त्याच्यासाठी काळरात्र म्हणून आला. शेताकडून डोक्यावरून ओझे घेऊन येणाऱ्या नंदूचा पाय घसरला तो कायमचा अपंगत्व घेऊनच.पाठीचा कणा ताठ राहायचा असेल, तर मज्जारज्जू तितकाच चांगला पाहिजे. मात्र, मज्जारज्जू कमकुवत बनल्याने नंदूच कमकुवत बनला. आभाळ फाटल्यासारखं मोठं संकट नंदूच्या कुटुंबावर कोसळलं. गिरणी कामगार म्हणून काम करणारे वडील हतबल झाले. नंदू आपल्या संवेदना हरवून बसला होता. शरीर लुळे-पांगळे बनले. जगणं मुश्कील होऊन बनले. आई-वडील, भाऊ, भावजय, मित्र परिवार यांनी मोठा धीर दिला; पण मज्जारज्जू कमकुवत असल्याने नीट उभाही राहू शकत नाही.मुंबईतही त्याच्यावर उपचार झाले. मात्र, उभा करण्याची ताकद डॉक्टर देऊ शकले नव्हते. १९९८ पासून या अपंगत्वावर मात करून आपले जीवन जगतोय. त्याच्याकडे निरीक्षण अफाट आहे. कविता करण्याची, लेखनाची आवड आहे. ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांच्या सान्निध्यातून त्याच्या लिखाणाला बळ मिळालं आणि तो लिहू लागला. कमरेपासून शरीर साथ देत नाही. पण, लिखाण सोडले नाही.निसर्गातील चौफेर घटनांची त्याला माहिती आहे. तो आपल्या लिखानात उतरतो. काव्य करण्याची कलाही अवगत आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने नंदूचा मित्र परिवारही मोठा आहे. नंदूचा वेळ जावा यासाठी त्याला मित्रपरिवार वाचण्याचा खजिना पुरवितात. शारीरिक, नैसर्गिक क्रिया करताना नंदूला कसरत करावी लागते. आपल्या कथेच्या प्रकाशनावेळी नंदू आपला सारिपाट मांडत असताना व्यासपीठ गहिवरून गेले होते. भाऊ सागर धायमोकलून रडत होता. तरीपण जगणे सोडले नाही. निसर्गाने मला मोडलं या निसर्गावरच मात करीत जगणं सुरू असल्याचे सांगितले.लिखाणात खंड नाहीनंदूला ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील, डॉ. संभाजी जगताप, प्रकाश केसरकर, सागर मिसाळ, संजय पोवार, भाऊ सागर साळोखे, आदी मंडळींच्या हातभार लाखमोलाचा आहे. यासर्व व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. त्याच्या लिखाणाची शृंखला कधी ही खंडित करू देत नाहीत, हे विशेष.उपचारासाठी लाखोंचा खर्चनंदू ज्यावेळी पडला त्यावेळी अनेक डॉक्टरांनी उपचार केले. घरची परिस्थिती हालाखिची बनली. मज्जारज्जू प्रत्यारोपण (स्टेमस्थेल थेरिपी) करून नंदूला नवीन जीवन देता येईल. मात्र, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. यातून रूग्ण ६० ते ७० टक्के बरा होतो. यासाठी सेवाभावी संस्थांनी नंदूसाठी मदत करण्याची गरज आहे.