शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

By admin | Updated: October 24, 2015 00:25 IST

बेलेवाडीच्या नंदू साळोखेची व्यथा : जगणं असह्य बनलं, जिद्दीच्या जोरावर लेखक बनला; पण..!

रवींद्र येसादे-- उत्तूर -कथा, कवितांचे लेखन करणं इतकं सोपं नाही. धडधाकट पण ये-जा करीत असताना डोक्यावरील ओझ्यानं हाय खाल्ली. बेलेवाडी (ता. आजरा) गावच्या उमद्या तरुणाच्या नशिबी अपंगत्व आलं. अपंगत्व येऊ नये, अशी म्हण आहे. मात्र, आपल्याला निसर्गाने हिरावून घेतले त्याच निसर्गाने निरीक्षण करून कथा, कविता लिहिणाऱ्या नंदू सखाराम साळोखे याला पाठबळाची गरज आहे.‘लुगडं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने नंदूच्या जीवनाचा सारिपाट उघडला. १ जानेवारी १९९८ चा दिवस त्याच्यासाठी काळरात्र म्हणून आला. शेताकडून डोक्यावरून ओझे घेऊन येणाऱ्या नंदूचा पाय घसरला तो कायमचा अपंगत्व घेऊनच.पाठीचा कणा ताठ राहायचा असेल, तर मज्जारज्जू तितकाच चांगला पाहिजे. मात्र, मज्जारज्जू कमकुवत बनल्याने नंदूच कमकुवत बनला. आभाळ फाटल्यासारखं मोठं संकट नंदूच्या कुटुंबावर कोसळलं. गिरणी कामगार म्हणून काम करणारे वडील हतबल झाले. नंदू आपल्या संवेदना हरवून बसला होता. शरीर लुळे-पांगळे बनले. जगणं मुश्कील होऊन बनले. आई-वडील, भाऊ, भावजय, मित्र परिवार यांनी मोठा धीर दिला; पण मज्जारज्जू कमकुवत असल्याने नीट उभाही राहू शकत नाही.मुंबईतही त्याच्यावर उपचार झाले. मात्र, उभा करण्याची ताकद डॉक्टर देऊ शकले नव्हते. १९९८ पासून या अपंगत्वावर मात करून आपले जीवन जगतोय. त्याच्याकडे निरीक्षण अफाट आहे. कविता करण्याची, लेखनाची आवड आहे. ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांच्या सान्निध्यातून त्याच्या लिखाणाला बळ मिळालं आणि तो लिहू लागला. कमरेपासून शरीर साथ देत नाही. पण, लिखाण सोडले नाही.निसर्गातील चौफेर घटनांची त्याला माहिती आहे. तो आपल्या लिखानात उतरतो. काव्य करण्याची कलाही अवगत आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने नंदूचा मित्र परिवारही मोठा आहे. नंदूचा वेळ जावा यासाठी त्याला मित्रपरिवार वाचण्याचा खजिना पुरवितात. शारीरिक, नैसर्गिक क्रिया करताना नंदूला कसरत करावी लागते. आपल्या कथेच्या प्रकाशनावेळी नंदू आपला सारिपाट मांडत असताना व्यासपीठ गहिवरून गेले होते. भाऊ सागर धायमोकलून रडत होता. तरीपण जगणे सोडले नाही. निसर्गाने मला मोडलं या निसर्गावरच मात करीत जगणं सुरू असल्याचे सांगितले.लिखाणात खंड नाहीनंदूला ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील, डॉ. संभाजी जगताप, प्रकाश केसरकर, सागर मिसाळ, संजय पोवार, भाऊ सागर साळोखे, आदी मंडळींच्या हातभार लाखमोलाचा आहे. यासर्व व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. त्याच्या लिखाणाची शृंखला कधी ही खंडित करू देत नाहीत, हे विशेष.उपचारासाठी लाखोंचा खर्चनंदू ज्यावेळी पडला त्यावेळी अनेक डॉक्टरांनी उपचार केले. घरची परिस्थिती हालाखिची बनली. मज्जारज्जू प्रत्यारोपण (स्टेमस्थेल थेरिपी) करून नंदूला नवीन जीवन देता येईल. मात्र, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. यातून रूग्ण ६० ते ७० टक्के बरा होतो. यासाठी सेवाभावी संस्थांनी नंदूसाठी मदत करण्याची गरज आहे.