शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

By admin | Updated: October 24, 2015 00:25 IST

बेलेवाडीच्या नंदू साळोखेची व्यथा : जगणं असह्य बनलं, जिद्दीच्या जोरावर लेखक बनला; पण..!

रवींद्र येसादे-- उत्तूर -कथा, कवितांचे लेखन करणं इतकं सोपं नाही. धडधाकट पण ये-जा करीत असताना डोक्यावरील ओझ्यानं हाय खाल्ली. बेलेवाडी (ता. आजरा) गावच्या उमद्या तरुणाच्या नशिबी अपंगत्व आलं. अपंगत्व येऊ नये, अशी म्हण आहे. मात्र, आपल्याला निसर्गाने हिरावून घेतले त्याच निसर्गाने निरीक्षण करून कथा, कविता लिहिणाऱ्या नंदू सखाराम साळोखे याला पाठबळाची गरज आहे.‘लुगडं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने नंदूच्या जीवनाचा सारिपाट उघडला. १ जानेवारी १९९८ चा दिवस त्याच्यासाठी काळरात्र म्हणून आला. शेताकडून डोक्यावरून ओझे घेऊन येणाऱ्या नंदूचा पाय घसरला तो कायमचा अपंगत्व घेऊनच.पाठीचा कणा ताठ राहायचा असेल, तर मज्जारज्जू तितकाच चांगला पाहिजे. मात्र, मज्जारज्जू कमकुवत बनल्याने नंदूच कमकुवत बनला. आभाळ फाटल्यासारखं मोठं संकट नंदूच्या कुटुंबावर कोसळलं. गिरणी कामगार म्हणून काम करणारे वडील हतबल झाले. नंदू आपल्या संवेदना हरवून बसला होता. शरीर लुळे-पांगळे बनले. जगणं मुश्कील होऊन बनले. आई-वडील, भाऊ, भावजय, मित्र परिवार यांनी मोठा धीर दिला; पण मज्जारज्जू कमकुवत असल्याने नीट उभाही राहू शकत नाही.मुंबईतही त्याच्यावर उपचार झाले. मात्र, उभा करण्याची ताकद डॉक्टर देऊ शकले नव्हते. १९९८ पासून या अपंगत्वावर मात करून आपले जीवन जगतोय. त्याच्याकडे निरीक्षण अफाट आहे. कविता करण्याची, लेखनाची आवड आहे. ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांच्या सान्निध्यातून त्याच्या लिखाणाला बळ मिळालं आणि तो लिहू लागला. कमरेपासून शरीर साथ देत नाही. पण, लिखाण सोडले नाही.निसर्गातील चौफेर घटनांची त्याला माहिती आहे. तो आपल्या लिखानात उतरतो. काव्य करण्याची कलाही अवगत आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने नंदूचा मित्र परिवारही मोठा आहे. नंदूचा वेळ जावा यासाठी त्याला मित्रपरिवार वाचण्याचा खजिना पुरवितात. शारीरिक, नैसर्गिक क्रिया करताना नंदूला कसरत करावी लागते. आपल्या कथेच्या प्रकाशनावेळी नंदू आपला सारिपाट मांडत असताना व्यासपीठ गहिवरून गेले होते. भाऊ सागर धायमोकलून रडत होता. तरीपण जगणे सोडले नाही. निसर्गाने मला मोडलं या निसर्गावरच मात करीत जगणं सुरू असल्याचे सांगितले.लिखाणात खंड नाहीनंदूला ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील, डॉ. संभाजी जगताप, प्रकाश केसरकर, सागर मिसाळ, संजय पोवार, भाऊ सागर साळोखे, आदी मंडळींच्या हातभार लाखमोलाचा आहे. यासर्व व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. त्याच्या लिखाणाची शृंखला कधी ही खंडित करू देत नाहीत, हे विशेष.उपचारासाठी लाखोंचा खर्चनंदू ज्यावेळी पडला त्यावेळी अनेक डॉक्टरांनी उपचार केले. घरची परिस्थिती हालाखिची बनली. मज्जारज्जू प्रत्यारोपण (स्टेमस्थेल थेरिपी) करून नंदूला नवीन जीवन देता येईल. मात्र, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. यातून रूग्ण ६० ते ७० टक्के बरा होतो. यासाठी सेवाभावी संस्थांनी नंदूसाठी मदत करण्याची गरज आहे.