शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:51 IST

यशकथा : मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो.

- घनश्याम कुंभार (यड्राव, कोल्हापूर) 

जांभळी  (ता. शिरोळ) येथील मोटके-पाटील डेअरी फार्मने जनावरांसाठी पौष्टिक ‘मुरघास’प्रकल्प उभा केला आहे. जनावरांसाठी बारमाही पौष्टिक चारा यामुळे मिळणार आहे. मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांनी आतापर्यंत दूध व्यवसायात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. काहीतरी नवीन करून हा व्यवसाय विकसित करण्याकडे हे कुटुंब सतत धडपडत असते.

‘मुरघास’ किंवा ‘सायलेज प्रकल्प’ उभा करण्याचा संकल्प केल्यानंतर जमिनीपासून दोन फूट खोल, २0 फूट रूंद व ६0 फूट लांबीचा खड्डा काढला. खड्ड्यातील माती सभोवती रचून घेतली. खड्ड्यात ५०० मायक्रॉन जाडीचा ८० बाय ४० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून घेतला. कडबाकुट्टीच्या साहाय्याने कापलेला हिरवा मका त्या खड्ड्यात पसरून घेतला. मक्याच्या कुट्टीचे चार ते पाच थर केले, शेवटच्या थरानंतर २५ बाय ८० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून कुट्टी हवाबंद केली जाते. हवाबंद मका कुट्टी २१ दिवसांनंतर जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते. ओल्या मक्यासारखाच सकस व पौष्टिकता टिकून राहते. या खाद्याला गोडवा असल्याने जनावरेही आवडीने खातात. दुभत्या जनावरांना हे खाद्य फारच उपयुक्त ठरत आहे. एका सायलेजमध्ये १५० टन खाद्य तयार होते, त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येतो. 

अलीकडे दूध व्यवसाय महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे; पण दुष्काळ, पाणीटंचाईने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हा व्यवसाय जोखमीचा बनला आहे. दुभत्या जनावरांना बारमाही सकस चाऱ्याची गरज असते; पण जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसते, मग हिरवा सकस चारा आणायचा कोठून? हा प्रश्न शेतक-यांसमोर असतो, त्यासाठी पावसाळ्यात व पाणी उपलब्ध आहे त्या कालावधीत मक्यासह इतर वैरणीचे पीक घ्यायचे आणि या पद्धतीने ‘मुरघास’ तयार करून ठेवले, तर बारमाही सकस व पौष्टिक खाद्य जनावरांना उपलब्ध होऊ शकते. हा आहार जनावरांचे दूध वाढवतेच, पण अंगातील ताकदही कायम राखते. 

अण्णासाहेब बाळगोंडा मोटके-पाटील व त्यांची मुले अभय व अक्षय यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. मोटके-पाटील यांनी यापूर्वी बायोगॅस प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, डेअरी फार्मिंग व विदेशी विर्याद्वारे गार्इंच्या गर्भधारणा करून होणारे वासरू संगोपन प्रकल्प यशस्वी केले आहेत. आता ‘मुरघास’चा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन २०१८ चा इंडियन डेअरी असोसिएशनकडून ‘बेस्ट वूमन डेअरी फार्मर इन इंडिया’ या पुरस्काराने त्यांच्या कुटुंबाला गौरविण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी