शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:51 IST

यशकथा : मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो.

- घनश्याम कुंभार (यड्राव, कोल्हापूर) 

जांभळी  (ता. शिरोळ) येथील मोटके-पाटील डेअरी फार्मने जनावरांसाठी पौष्टिक ‘मुरघास’प्रकल्प उभा केला आहे. जनावरांसाठी बारमाही पौष्टिक चारा यामुळे मिळणार आहे. मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांनी आतापर्यंत दूध व्यवसायात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. काहीतरी नवीन करून हा व्यवसाय विकसित करण्याकडे हे कुटुंब सतत धडपडत असते.

‘मुरघास’ किंवा ‘सायलेज प्रकल्प’ उभा करण्याचा संकल्प केल्यानंतर जमिनीपासून दोन फूट खोल, २0 फूट रूंद व ६0 फूट लांबीचा खड्डा काढला. खड्ड्यातील माती सभोवती रचून घेतली. खड्ड्यात ५०० मायक्रॉन जाडीचा ८० बाय ४० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून घेतला. कडबाकुट्टीच्या साहाय्याने कापलेला हिरवा मका त्या खड्ड्यात पसरून घेतला. मक्याच्या कुट्टीचे चार ते पाच थर केले, शेवटच्या थरानंतर २५ बाय ८० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून कुट्टी हवाबंद केली जाते. हवाबंद मका कुट्टी २१ दिवसांनंतर जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते. ओल्या मक्यासारखाच सकस व पौष्टिकता टिकून राहते. या खाद्याला गोडवा असल्याने जनावरेही आवडीने खातात. दुभत्या जनावरांना हे खाद्य फारच उपयुक्त ठरत आहे. एका सायलेजमध्ये १५० टन खाद्य तयार होते, त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येतो. 

अलीकडे दूध व्यवसाय महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे; पण दुष्काळ, पाणीटंचाईने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हा व्यवसाय जोखमीचा बनला आहे. दुभत्या जनावरांना बारमाही सकस चाऱ्याची गरज असते; पण जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसते, मग हिरवा सकस चारा आणायचा कोठून? हा प्रश्न शेतक-यांसमोर असतो, त्यासाठी पावसाळ्यात व पाणी उपलब्ध आहे त्या कालावधीत मक्यासह इतर वैरणीचे पीक घ्यायचे आणि या पद्धतीने ‘मुरघास’ तयार करून ठेवले, तर बारमाही सकस व पौष्टिक खाद्य जनावरांना उपलब्ध होऊ शकते. हा आहार जनावरांचे दूध वाढवतेच, पण अंगातील ताकदही कायम राखते. 

अण्णासाहेब बाळगोंडा मोटके-पाटील व त्यांची मुले अभय व अक्षय यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. मोटके-पाटील यांनी यापूर्वी बायोगॅस प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, डेअरी फार्मिंग व विदेशी विर्याद्वारे गार्इंच्या गर्भधारणा करून होणारे वासरू संगोपन प्रकल्प यशस्वी केले आहेत. आता ‘मुरघास’चा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन २०१८ चा इंडियन डेअरी असोसिएशनकडून ‘बेस्ट वूमन डेअरी फार्मर इन इंडिया’ या पुरस्काराने त्यांच्या कुटुंबाला गौरविण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी