शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:51 IST

यशकथा : मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो.

- घनश्याम कुंभार (यड्राव, कोल्हापूर) 

जांभळी  (ता. शिरोळ) येथील मोटके-पाटील डेअरी फार्मने जनावरांसाठी पौष्टिक ‘मुरघास’प्रकल्प उभा केला आहे. जनावरांसाठी बारमाही पौष्टिक चारा यामुळे मिळणार आहे. मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांनी आतापर्यंत दूध व्यवसायात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. काहीतरी नवीन करून हा व्यवसाय विकसित करण्याकडे हे कुटुंब सतत धडपडत असते.

‘मुरघास’ किंवा ‘सायलेज प्रकल्प’ उभा करण्याचा संकल्प केल्यानंतर जमिनीपासून दोन फूट खोल, २0 फूट रूंद व ६0 फूट लांबीचा खड्डा काढला. खड्ड्यातील माती सभोवती रचून घेतली. खड्ड्यात ५०० मायक्रॉन जाडीचा ८० बाय ४० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून घेतला. कडबाकुट्टीच्या साहाय्याने कापलेला हिरवा मका त्या खड्ड्यात पसरून घेतला. मक्याच्या कुट्टीचे चार ते पाच थर केले, शेवटच्या थरानंतर २५ बाय ८० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून कुट्टी हवाबंद केली जाते. हवाबंद मका कुट्टी २१ दिवसांनंतर जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते. ओल्या मक्यासारखाच सकस व पौष्टिकता टिकून राहते. या खाद्याला गोडवा असल्याने जनावरेही आवडीने खातात. दुभत्या जनावरांना हे खाद्य फारच उपयुक्त ठरत आहे. एका सायलेजमध्ये १५० टन खाद्य तयार होते, त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येतो. 

अलीकडे दूध व्यवसाय महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे; पण दुष्काळ, पाणीटंचाईने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हा व्यवसाय जोखमीचा बनला आहे. दुभत्या जनावरांना बारमाही सकस चाऱ्याची गरज असते; पण जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसते, मग हिरवा सकस चारा आणायचा कोठून? हा प्रश्न शेतक-यांसमोर असतो, त्यासाठी पावसाळ्यात व पाणी उपलब्ध आहे त्या कालावधीत मक्यासह इतर वैरणीचे पीक घ्यायचे आणि या पद्धतीने ‘मुरघास’ तयार करून ठेवले, तर बारमाही सकस व पौष्टिक खाद्य जनावरांना उपलब्ध होऊ शकते. हा आहार जनावरांचे दूध वाढवतेच, पण अंगातील ताकदही कायम राखते. 

अण्णासाहेब बाळगोंडा मोटके-पाटील व त्यांची मुले अभय व अक्षय यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. मोटके-पाटील यांनी यापूर्वी बायोगॅस प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, डेअरी फार्मिंग व विदेशी विर्याद्वारे गार्इंच्या गर्भधारणा करून होणारे वासरू संगोपन प्रकल्प यशस्वी केले आहेत. आता ‘मुरघास’चा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन २०१८ चा इंडियन डेअरी असोसिएशनकडून ‘बेस्ट वूमन डेअरी फार्मर इन इंडिया’ या पुरस्काराने त्यांच्या कुटुंबाला गौरविण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी