शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

धामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:20 IST

kolhapur, Police, murder गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खूनआरोपी पोलिसात हजर : निकाल विरोधात लागल्याचा मनात राग

उत्तूर : गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी परसू सावंत व संजय महादेव सावंत यांच्यात पिपळा सकल मळा नावाच्या शेतातील गट नं. ६१० (अ) मध्ये वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. त्याबाबत न्यायालयात खटला सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी (२७) सकाळी शिवाजी परसू सावंत हे सकाळी पिंपळा सकल मळा शेतात जनावरे घेवून गेले होते. यावेळी शेतीच्या बांधावरील झाडे तोडल्याचा जाब विचारला असता शिवाजी व संजय यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

यामध्ये संजयने शिवाजी यांचे छातीवर टोकदार, धारदार हत्याराने भोसकून त्यास गंभीर जखमी केले. यामध्ये शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. खून झाल्याचे समजताच शेताकडे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.मी व माझा सख्खा चुलत भाऊ शिवाजी यांच्यात मारामारी झाल्याचे सांगून आरोपी संजय हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. मात्र, संजयच्या डोक्याला व हातास मार लागल्याने पोलिसांनी त्याला उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिवाजी यांचा भाऊ पांडुरंग परसू सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोयता, टोकदार शस्त्राची नळीघटनास्थळी कोयता, टोकदार शस्त्र ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली नळी, मिरची पूड दिसून आली. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

 सव्वा एकर शेतीचा वाददोन सख्या चुलत भावांमध्ये १ एकर १४ गुंठे जमीनीसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालय आजरा, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे असलेल्या दाव्याचा निकाल संजय यांच्या बाजूने लागला. त्याविरोधात शिवाजी यांनीही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिवाजी यांच्या बाजूने लागला. हा राग मनात धरून संजय याने खून केला. वादाचा शेवट खूनजमीनसंदर्भात तंटामुक्त, पोलिस ठाणे याठिकाणी अनेकवेळा बैठका झाल्या. पण दोघांची ताठर भूमिका असल्याने वाद मिटलेला नव्हता.लाकडे कापणारे पळून गेलेशिवाजी यांनी वादग्रस्त शेतजमीनीतील लाकडे व्यापाऱ्यांना विकली होती. गेली दोन दिवस लाकूड कापणी सुरू होती. पावणेदहाच्या सुमारास शेतात खून झाल्याचे समजताच संबंधित लाकूड कापणी करणारी मंडळी भितीने पळून गेली. 

संपत्तीच्या वादातून दुसरा खून२० वर्षापूर्वी संपत्तीच्या वादातून चिमणे (ता. आजरा) येथे सख्या भावात जमिनीच्या वादातून खून झाला होता. तालुक्यातील हा दुसरा सख्या चुलत भावात झालेला खून आहे.

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस