शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

धामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:20 IST

kolhapur, Police, murder गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खूनआरोपी पोलिसात हजर : निकाल विरोधात लागल्याचा मनात राग

उत्तूर : गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी परसू सावंत व संजय महादेव सावंत यांच्यात पिपळा सकल मळा नावाच्या शेतातील गट नं. ६१० (अ) मध्ये वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. त्याबाबत न्यायालयात खटला सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी (२७) सकाळी शिवाजी परसू सावंत हे सकाळी पिंपळा सकल मळा शेतात जनावरे घेवून गेले होते. यावेळी शेतीच्या बांधावरील झाडे तोडल्याचा जाब विचारला असता शिवाजी व संजय यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

यामध्ये संजयने शिवाजी यांचे छातीवर टोकदार, धारदार हत्याराने भोसकून त्यास गंभीर जखमी केले. यामध्ये शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. खून झाल्याचे समजताच शेताकडे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.मी व माझा सख्खा चुलत भाऊ शिवाजी यांच्यात मारामारी झाल्याचे सांगून आरोपी संजय हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. मात्र, संजयच्या डोक्याला व हातास मार लागल्याने पोलिसांनी त्याला उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिवाजी यांचा भाऊ पांडुरंग परसू सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोयता, टोकदार शस्त्राची नळीघटनास्थळी कोयता, टोकदार शस्त्र ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली नळी, मिरची पूड दिसून आली. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

 सव्वा एकर शेतीचा वाददोन सख्या चुलत भावांमध्ये १ एकर १४ गुंठे जमीनीसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालय आजरा, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे असलेल्या दाव्याचा निकाल संजय यांच्या बाजूने लागला. त्याविरोधात शिवाजी यांनीही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिवाजी यांच्या बाजूने लागला. हा राग मनात धरून संजय याने खून केला. वादाचा शेवट खूनजमीनसंदर्भात तंटामुक्त, पोलिस ठाणे याठिकाणी अनेकवेळा बैठका झाल्या. पण दोघांची ताठर भूमिका असल्याने वाद मिटलेला नव्हता.लाकडे कापणारे पळून गेलेशिवाजी यांनी वादग्रस्त शेतजमीनीतील लाकडे व्यापाऱ्यांना विकली होती. गेली दोन दिवस लाकूड कापणी सुरू होती. पावणेदहाच्या सुमारास शेतात खून झाल्याचे समजताच संबंधित लाकूड कापणी करणारी मंडळी भितीने पळून गेली. 

संपत्तीच्या वादातून दुसरा खून२० वर्षापूर्वी संपत्तीच्या वादातून चिमणे (ता. आजरा) येथे सख्या भावात जमिनीच्या वादातून खून झाला होता. तालुक्यातील हा दुसरा सख्या चुलत भावात झालेला खून आहे.

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस