शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:20 IST

kolhapur, Police, murder गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खूनआरोपी पोलिसात हजर : निकाल विरोधात लागल्याचा मनात राग

उत्तूर : गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, शिवाजी परसू सावंत व संजय महादेव सावंत यांच्यात पिपळा सकल मळा नावाच्या शेतातील गट नं. ६१० (अ) मध्ये वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. त्याबाबत न्यायालयात खटला सुरू होता.दरम्यान, शुक्रवारी (२७) सकाळी शिवाजी परसू सावंत हे सकाळी पिंपळा सकल मळा शेतात जनावरे घेवून गेले होते. यावेळी शेतीच्या बांधावरील झाडे तोडल्याचा जाब विचारला असता शिवाजी व संजय यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

यामध्ये संजयने शिवाजी यांचे छातीवर टोकदार, धारदार हत्याराने भोसकून त्यास गंभीर जखमी केले. यामध्ये शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. खून झाल्याचे समजताच शेताकडे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.मी व माझा सख्खा चुलत भाऊ शिवाजी यांच्यात मारामारी झाल्याचे सांगून आरोपी संजय हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. मात्र, संजयच्या डोक्याला व हातास मार लागल्याने पोलिसांनी त्याला उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिवाजी यांचा भाऊ पांडुरंग परसू सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोयता, टोकदार शस्त्राची नळीघटनास्थळी कोयता, टोकदार शस्त्र ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली नळी, मिरची पूड दिसून आली. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

 सव्वा एकर शेतीचा वाददोन सख्या चुलत भावांमध्ये १ एकर १४ गुंठे जमीनीसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालय आजरा, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे असलेल्या दाव्याचा निकाल संजय यांच्या बाजूने लागला. त्याविरोधात शिवाजी यांनीही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिवाजी यांच्या बाजूने लागला. हा राग मनात धरून संजय याने खून केला. वादाचा शेवट खूनजमीनसंदर्भात तंटामुक्त, पोलिस ठाणे याठिकाणी अनेकवेळा बैठका झाल्या. पण दोघांची ताठर भूमिका असल्याने वाद मिटलेला नव्हता.लाकडे कापणारे पळून गेलेशिवाजी यांनी वादग्रस्त शेतजमीनीतील लाकडे व्यापाऱ्यांना विकली होती. गेली दोन दिवस लाकूड कापणी सुरू होती. पावणेदहाच्या सुमारास शेतात खून झाल्याचे समजताच संबंधित लाकूड कापणी करणारी मंडळी भितीने पळून गेली. 

संपत्तीच्या वादातून दुसरा खून२० वर्षापूर्वी संपत्तीच्या वादातून चिमणे (ता. आजरा) येथे सख्या भावात जमिनीच्या वादातून खून झाला होता. तालुक्यातील हा दुसरा सख्या चुलत भावात झालेला खून आहे.

 

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस