शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाहतुकीच्या कोंडीला पालिका प्रशासनच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:45 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहतुकीची जी कोंडी निर्माण झाली आहे, त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आक्षेप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या. यापुढे अतिक्रमण वाढले, पार्किंगच्या जागा बंदिस्त झाल्या, तर त्या त्या भागातील अभियंता यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देवाहतुकीच्या कोंडीला पालिका प्रशासनच जबाबदारमहापालिका सभेत नगरसेवकांचा आक्षेप

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शहरात वाहतुकीची जी कोंडी निर्माण झाली आहे, त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार आहे, असा आक्षेप मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या. यापुढे अतिक्रमण वाढले, पार्किंगच्या जागा बंदिस्त झाल्या, तर त्या त्या भागातील अभियंता यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.शहरातील रस्ते पार्किंग आणि अतिक्रमणात हरविले आहेत; त्यामुळे पहिल्यांदा बंदिस्त पार्किंग खुले करा, अतिक्रमणांवर कारवाई करा, अशी मागणी महेश जाधव यांनी केली. विकास आराखड्यातील पार्किंगच्या जागा विकसित कराव्यात, अशी सूचना राजसिंह शेळके यांनी केली. वाहतुकीची कोंडी रोखण्याकरिता शहरातील रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अशी सूचना उमा बनछोडे यांनी, तर फेरीवाला झोनची अंमलबजावणी करण्याची सूचना उमा इंगळे, विजय खाडे यांनी केली.

शहरात अवजड वाहनांना बंदी केली असली, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार कमलाकर भोपळे यांनी केली. प्रशासन करणार असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत नगरसेवकांनी हस्तक्षेप टाळावा, असा सल्ला रत्नेश शिरोळकर यांनी दिला.

मोठ्या गृहप्रकल्पातील पार्किं गला सोडलेल्या जागांची तपासणी करण्याची सूचना भूपाल शेटे यांनी केली. आराखडे तयार करण्याकरिता कन्सल्टंटवर ६० ते ७० लाख रुपये खर्च करणे सोईचे आहे का? याचा विचार प्रशासनाने करावा, असे अजित ठाणेकर यांनी सांगितले. ठाणेकर यांनी त्यांच्या प्रभागातील अनेक लॉजेसना पार्किंग नसल्याकडे लक्ष वेधले.यावेळी झालेल्या चर्चेत किरण नकाते, रूपाराणी निकम, मेहजबीन जमादार, शेखर कुसाळे, विजय सूर्यवंशी, निलोफर आजरेकर यांनी भाग घेतला. हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्या हत्तेबद्दल निषेधाचा ठराव करण्यात आला. आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे. यावेळी रेड्डी यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.५४ लाख वसूल करावेत : शेटेतीन वर्षांपूर्वी शहरातील पट्टे आखणे, रबरी स्पीडब्रेकर लावणे यांसारख्या कामांवर ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले. ज्यांनी हे काम केले, त्या विमलेश्वर संस्था तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. रबरी स्पीडब्रेकरचे काम निकृष्ट झाले. काम झाल्यानंतर स्पीडब्रेकर लगेच निखळून पडले आहेत. ही उधळपट्टी कशाला केली? असा सवालही शेटे यांनी केला.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर