शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नगररचना, घरफाळा वसुली जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 01:07 IST

कोल्हापूर महानगरपालिका : इस्टेट, पाणीपुरवठा मागे, पंधरा दिवसांत वसुलीसाठी विशेष प्रयत्न हवेत

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या परवाना, नगररचना तसेच घरफाळा विभागाने यावर्षी वसुलीत आघाडी घेतली आहे. नगररचना विभागाने तर उद्दिष्टापेक्षा जादा वसुली करून पालिकेच्या उत्पन्नात भर टाकली आहे. इस्टेट विभाग, पाणीपुरवठा विभागाची वसुली मात्र समाधानकारक नसल्याने पुढच्या पंधरा दिवसांत या विभागांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात महानगरपालिका प्रशासन विभागनिहाय महसुली जमेचे उद्दिष्ट ठरवून देत असते. त्याप्रमाणे मार्चअखेरपर्यंत ही वसुली पूर्ण करायची असते. संबंधित विभागही तसे प्रयत्न करीत असतात. मार्च २०१६ मध्ये प्रशासनाने सर्व विभागांचे एकूण महसुली जमेचे उद्दिष्ट ३३५ कोटी २२ लाख २८ हजार इतके ठरवून दिले होते. त्यापैकी आतापर्यंत ऐंशी टक्के म्हणजेच २६८ कोटी ५७ लाख ७६ हजार ०३९ इतकी वसुली पूर्ण झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत राहिलेली वीस टक्के वसुली करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. इस्टेटची वसुली निम्म्यावरच वसुलीत सगळ्यात मागे राहण्याचा मान यंदा इस्टेट विभागाच्या नावे राहील असे दिसते. विभागास दिलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ ४७ टक्के वसुली झाली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या गाळ्यांचे करार संपले आहेत, त्यामुळे हजारो गाळेधारकांकडून पैसेच भरून घेण्यात आलेले नाहीत. भाडेवाढीचे नवीन धोरण ठरविण्याची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याने या विभागाच्या वसुलीत घट आली आहे. पाणीपुरवठा विभागाचीही वसुली असमाधानकारक आहे. जेमतेम ६८ टक्के वसुली करता आली असून, पुढील पंधरा दिवसांत वसुलीसाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.शासकीय अनुदानाची प्रतीक्षामनपा प्रशासनाने संपत आलेल्या आर्थिक वर्षाकरिता राज्य सरकारकडून विविध करणासाठी म्हणून सहा कोटी चार लाख ९४ हजार रुपयांचे अनुदान मिळेल असे अपेक्षित धरले होते, परंतु प्रत्यक्षात एक कोटी ६८ लाख १४ हजार २३८ रुपयांचे अनुदान मनपाला प्राप्त झाले आहे. अनुदान मिळण्याचे प्रमाण २७ टक्के आहे. अनुदान न मिळाल्यामुळे त्याचा विविध विकासकामांवर परिणाम झालेला आहे. नगररचना विभागाने यावर्षी उद्दिष्टापेक्षा जादा म्हणजे १४५ टक्के वसुली करून आघाडी घेतली आहे. शहरात गेल्या वर्षभरात वाढलेले रेडीरेकनरचे दर, मोठ्या प्रमाणात दिलेले बांधकाम परवाने यामुळे ही वसुली वाढली असल्याचे सांगण्यात येते. त्याखालोखाल परवाना विभागाने ९८ टक्के वसुली केली आहे. घरफाळा विभागानेही ७७ टक्क्यांपर्यंत वसुली पूर्ण केली आहे. सवलत योजना जाहीर केल्यामुळे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल, असा या विभागाला विश्वास आहे. १४५ टक्के नगररचना विभागाची वसुली