शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिके चा २९ कोटींचा निधी खर्चाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून नियोजनातील कामे सोडली जात नाहीत आणि दुसरीकडे निधी आहे; परंतु कामे रखडली आहेत, असा विचित्र अनुभव सध्या महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या बाबतीत आला आहे.

ठळक मुद्दे♦काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत.♦ व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार

शासनाला पाठविला अहवाल : कामे रखडल्याचा परिणाम; आरोग्य खात्याकडील सर्वांत जास्त १९ कोटी शिल्लकलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून नियोजनातील कामे सोडली जात नाहीत आणि दुसरीकडे निधी आहे; परंतु कामे रखडली आहेत, असा विचित्र अनुभव सध्या महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या बाबतीत आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडे राज्य व केंद्र सरकारकडून निधी आला, पण आर्थिक वर्ष संपून गेले तरी त्यापैकी २९ कोटींचा निधी खर्ची पडलेला नाही. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेस प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा निधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून प्राप्त होतो. तो त्या-त्या आर्थिक वर्षात निविदा प्रक्रिया राबवून पुढील दोन वर्षांत खर्ची पडला पाहिजे अशी अपेक्षा असते; परंतु महानगरपालिकेच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांत तसे घडलेले नाही. राज्य शासनाने जेव्हा अखर्चित निधीचा हिशेब मागितला तेव्हा प्रशासनाने आकडेवारी गोळा केली.विविध विभागांकडे किती निधी आला, त्याची सध्याची स्थिती काय आहे आणि अखर्चित निधी किती याची माहिती संबंधित विभागांकडून मागविण्यात आली त्यावेळी आरोग्य खात्याकडील सर्वांत जास्त म्हणजे १९ कोटींचा निधी खर्च झाला नसल्याची बाब लक्षात आली. आरोग्य विभागास चौदाव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त झाला होता. त्यातून अडीच कोटींचे रस्ते लोटणारे यंत्र (स्वीपिंग मशीन) दोन कोटींची सार्वजनिक स्वच्छतागृहे, तीन कोटींचे वैयक्तिक शौचालयांना अनुदान तसेच घनकचरा व्यवस्थापन डीपीआर करण्याकरीता सहा कोटींचा निधी अद्याप खर्च पडलेला नाही. त्याचबरोबर नवबौद्धांच्या घरकुल योजनेचा तीन कोटी तर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील आठ कोटींचा निधीही शिल्लक राहिलेला आहे.निधी मिळूनसुद्धा तो खर्च न होण्याच्या कारणांबाबत माहिती घेता सांगण्यात आले की, काही कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू व्हायला विलंब झाला. काही कामांत वर्कआॅर्डर द्यायला विलंब झाला तर काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत. उदा. दोन कोटीची आरसी कंटेनर वाहने घ्यायची आहेत, तर अडीच कोटींचे रस्ते लोटणारे यंत्र घ्यायचे आहे. त्याची वर्क आॅर्डर झाली असली तरी कंपनीकडून त्याची पूर्तता झालेली नाही. बायोगॅस प्लँटचे कामही अजून सुरुच झालेले नाहीमहापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा कन्सल्टंन्सी यांना दिले आहे. त्यासाठी सह कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. केवळ कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही तर या सगळ्या कामात वाहने किती व कशाप्रकारची लागतील, कर्मचाºयांचे शेड्युल कसे असावे, कचरा गोळा करण्याची पद्धत सध्याचीच असावी की अन्य कोणती स्वीकारावी यासंबंधीचा अहवााल द्यायला आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा अहवाल रेंगाळला आहे. त्यामुळे त्याच्या खर्चही पडलेला नाही.प्रशासनाची कारणेनिधी मिळूनसुद्धा तो खर्च न होण्याच्या कारणांबाबत माहिती घेता सांगण्यात आले की, काही कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू व्हायला विलंब झाला. काही कामांत वर्कआॅर्डर द्यायला विलंब झाला, तर काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत.