शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

महापालिके चा २९ कोटींचा निधी खर्चाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून नियोजनातील कामे सोडली जात नाहीत आणि दुसरीकडे निधी आहे; परंतु कामे रखडली आहेत, असा विचित्र अनुभव सध्या महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या बाबतीत आला आहे.

ठळक मुद्दे♦काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत.♦ व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार

शासनाला पाठविला अहवाल : कामे रखडल्याचा परिणाम; आरोग्य खात्याकडील सर्वांत जास्त १९ कोटी शिल्लकलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे निधी नाही म्हणून नियोजनातील कामे सोडली जात नाहीत आणि दुसरीकडे निधी आहे; परंतु कामे रखडली आहेत, असा विचित्र अनुभव सध्या महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या बाबतीत आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडे राज्य व केंद्र सरकारकडून निधी आला, पण आर्थिक वर्ष संपून गेले तरी त्यापैकी २९ कोटींचा निधी खर्ची पडलेला नाही. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.कोल्हापूर महानगरपालिकेस प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा निधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून प्राप्त होतो. तो त्या-त्या आर्थिक वर्षात निविदा प्रक्रिया राबवून पुढील दोन वर्षांत खर्ची पडला पाहिजे अशी अपेक्षा असते; परंतु महानगरपालिकेच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांत तसे घडलेले नाही. राज्य शासनाने जेव्हा अखर्चित निधीचा हिशेब मागितला तेव्हा प्रशासनाने आकडेवारी गोळा केली.विविध विभागांकडे किती निधी आला, त्याची सध्याची स्थिती काय आहे आणि अखर्चित निधी किती याची माहिती संबंधित विभागांकडून मागविण्यात आली त्यावेळी आरोग्य खात्याकडील सर्वांत जास्त म्हणजे १९ कोटींचा निधी खर्च झाला नसल्याची बाब लक्षात आली. आरोग्य विभागास चौदाव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त झाला होता. त्यातून अडीच कोटींचे रस्ते लोटणारे यंत्र (स्वीपिंग मशीन) दोन कोटींची सार्वजनिक स्वच्छतागृहे, तीन कोटींचे वैयक्तिक शौचालयांना अनुदान तसेच घनकचरा व्यवस्थापन डीपीआर करण्याकरीता सहा कोटींचा निधी अद्याप खर्च पडलेला नाही. त्याचबरोबर नवबौद्धांच्या घरकुल योजनेचा तीन कोटी तर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील आठ कोटींचा निधीही शिल्लक राहिलेला आहे.निधी मिळूनसुद्धा तो खर्च न होण्याच्या कारणांबाबत माहिती घेता सांगण्यात आले की, काही कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू व्हायला विलंब झाला. काही कामांत वर्कआॅर्डर द्यायला विलंब झाला तर काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत. उदा. दोन कोटीची आरसी कंटेनर वाहने घ्यायची आहेत, तर अडीच कोटींचे रस्ते लोटणारे यंत्र घ्यायचे आहे. त्याची वर्क आॅर्डर झाली असली तरी कंपनीकडून त्याची पूर्तता झालेली नाही. बायोगॅस प्लँटचे कामही अजून सुरुच झालेले नाहीमहापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा कन्सल्टंन्सी यांना दिले आहे. त्यासाठी सह कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. केवळ कचºयाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही तर या सगळ्या कामात वाहने किती व कशाप्रकारची लागतील, कर्मचाºयांचे शेड्युल कसे असावे, कचरा गोळा करण्याची पद्धत सध्याचीच असावी की अन्य कोणती स्वीकारावी यासंबंधीचा अहवााल द्यायला आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा अहवाल रेंगाळला आहे. त्यामुळे त्याच्या खर्चही पडलेला नाही.प्रशासनाची कारणेनिधी मिळूनसुद्धा तो खर्च न होण्याच्या कारणांबाबत माहिती घेता सांगण्यात आले की, काही कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू व्हायला विलंब झाला. काही कामांत वर्कआॅर्डर द्यायला विलंब झाला, तर काही कामांच्या वर्कआॅर्डर देऊनही कामे सुरू झाली नाहीत.