शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘एलबीटी’च्या गुंत्यात अडकली महापालिका

By admin | Updated: June 24, 2014 01:20 IST

जकातीपेक्षा उत्पन्न कमी : अडीच महिन्यांत १० कोटींची तूट

कोल्हापूर : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी महापालिकेकडे की केंद्र सरकारच्या विक्रीकर विभागाकडे द्यावयाचा याचा निर्णय आजअखेर झालेला नाही. राज्य शासनाने याबाबतचा आदेश महापालिका प्रशासनाला किंवा विक्रीकर खात्याला मिळालेला नाही. दरम्यान, १ एप्रिल ते २३ जून २०१४ अखेर साडेसोळा कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत एलबीटीचे वसूल झाले आहेत.१ एप्रिल २०११ पासून महापालिकेने जकात रद्द करून एलबीटी सुरू केला. शहरातील व्यापाऱ्यांचा एलबीटी करप्रणालीस तीव्र विरोध आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, एलबीटीची वसुली महापालिकेककडून विक्रीकर विभागाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण, याबाबत शासन आदेश झालेला नाही. एकीकडे, एलबीटी ही जाचक करप्रणाली रद्द करून मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) एक टक्का वाढवावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. सध्या महापालिका एलबीटीची वसुली करत आहे.दुसरीकडे, गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. गत आठवड्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींमुळे एलबीटी कोणाकडे द्यावयाचा आदेश झाला नाही. पण, मुख्यमंत्री चव्हाण राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हा आदेश या आठवड्यात होण्याची शक्यता व्यापारीवर्गातून वर्तविली जात आहे.दरम्यान, राज्य शासनाकडून एलबीटीला पर्याय देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. एलबीटी जाणारच आहे तर कशाला भरा, या व्यापाऱ्यांच्या मानसिकतेमुळे महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. गेल्या अडीच महिन्यांत फक्त १६ कोटी एलबीटी जमा झाली. दहा कोटींची तूट भरून कशी काढायची, हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. एलबीटी तुटीचा विकासकामांवर परिणाम होत आहे.महापालिकेचे जकात हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत होते. महापालिकेला जकातीमधून १२५ कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत होते. जकात रद्द झाल्याने फटाके वाजविणाऱ्या व्यापाऱ्यांनी नव्या कर प्रणालीस विरोध केला. पहिल्या वर्षी २०११-१२ ला ६८ कोटी, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८३ तर मागील वर्षी २०१३-१४ मध्ये ९२ कोटी एलबीटीतून महापालिकेला मिळाले. एलबीटीमधून महापालिकेला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असतानाच शासनाने एलबीटी रद्दचा घाट घातला. परिणामी नियमित एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनीही याकडे पाठ फिरविली.