शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

महावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:20 IST

महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देमहावितरणने प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी : कार्यकारी अभियंत्यांना निवेदनसर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र  राज्य विद्युत वितरण कंपनीने आगामी पाच वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार पुढील पाच वर्षांसाठी या कंपनीने ६० हजार कोटी रुपयांची वाढ मागितलेली आहे.

गेल्या तीन वर्षांतील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी व पुढील पाच वर्षांतील योजनांसाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव ६०,३१३ कोटी १९ लाख रुपयांचा असला तरी प्रत्येकवर्षी दरवाढ मागितली आहे. म्हणजे २०२०-२१ साठी ५.८ टक्केदरवाढ, २०२१-२२ साठी ३.२५ टक्के, २०२२-२३ साठी २.९३ टक्के, २०२३-२४ करिता २.६१ टक्केआणि २०२४-२५ साठी २.५४ टक्के, अशी वाढ मागितलेली आहे.

यासोबतच स्थिर आकारामध्येही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना पूर्वी ९ रुपये ठोक रक्कम स्थिर आकार म्हणून घेतला जात होता. तो नवीन प्रस्तावानुसार वीज वापरानुसार होणार असून, शून्य ते १०० युनिटला १०० रुपये, १०१ ते ३०० युनिटला ११० रुपये, ३०१ ते ५०० युनिटला ११० रुपये व ५०० युनिटच्यापुढे १२० रुपये आकारण्यात येणार आहेत. घरगुती वापरासाठी वापरलेल्या शून्य ते १०० युनिट वीज ग्राहकांना ३.०५ पैसे प्रतियुनिट दर होता. तो प्रस्तावामध्ये ३.३० इतका मागितला आहे.दिल्लीसारख्या लहान राज्यात गरीब ग्राहकांसाठी वीजदराचा पहिला स्लॅब शून्य ते २०० युनिट असून, त्याचा दर ३ रुपये प्रतियुनिट आहे. तर महाराष्ट्रत याच युनिटचे दर ३ रुपये ५ पैसे आहे. म्हणजेच ते दर दिल्लीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे राज्यातही असेच दर आकारावेत. २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीत ८७४० कोटी रुपये तूट कशी आली, हे जाहीर करावे.शिष्टमंडळात निमंत्रक आर. के. पोवार, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अजित सासने, दिलीप देसाई, अशोक भंडारे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर