शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीचा प्रस्ताव गेला मुंबईला

By admin | Updated: June 24, 2014 01:17 IST

महापालिकेची तयारी पूर्ण : आता चेंडू शासनाच्या कोर्टात; लवकरच निघणार अधिसूचना

संतोष पाटील, कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आज, सोमवारी हद्दवाढीसंदर्भातील झालेल्या विशेष महासभेतील निर्णयांची माहिती व मंजूर ठराव तत्काळ राज्य शासनाला पाठविण्यात आला. ठरावाची प्रत हातोहात पोहोच करण्यासाठी नगररचना विभागातील अधिकारी रात्रीच मुंबईला रवाना झाले. आता लवकरच राज्य शासन महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार नगरविकास विभागामार्फत अधिसूचना काढून ३० बाधित गावांतील व्यक्तींकडून हरकती व सूचना मागविणार आहे. कोल्हापूर शहरात प्रस्तावित सर्व १७ गावांचा समावेश करण्यास नगरविकास संचालकांनी हिरवा कंदील दाखविला आहे. शहराची हद्दवाढ गरजेची असून, राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असा शेराही संचालकांनी अभिप्रायामध्ये दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागितलेल्या अभिप्रायातील सर्व मुद्दे महसूल गावांचा समावेश, महसूल देणी, संबंधित गावांत पायाभूत सुविधा पुरविणे, आदींना महानगरपालिकेच्या महासभेने मान्यता दिली. सभेने मान्यता दिलेल्या ठराव क्रमांक १४३ ची प्रत उद्या, मंगळवारी नगरविकास मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करताना पुणे हद्दवाढीचा अभ्यास करून त्या धर्तीवरच प्रस्ताव तयार केला आहे. शासनाला यापूर्वीच २०११च्या जनगणनेप्रमाणे संबंधित गावांतील सर्व माहिती पुरविण्यात आली आहे. अशी असेल पुढील टप्प्यांतील प्रक्रियामहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (मुंबई, १९४९ चा ५९) चे कलम-३ पोटकलम (३) अन्वये प्रदान शक्तीचा वापर करून आणि उक्त कलम-३ चे पोटक लम (२) अंतर्गत निर्गमित शासन अधिसूचना नगरविकास, सार्वजनिक, आरोग्य आणि गृहनिर्माण विभाग क्र. एससीआर १२७१/४५३४५६-सी-१, १५ डिसेंबर १९७२ मध्ये नमूद कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये फेरबदल निश्चित करत आहे, अशा स्वरूपाची अधिसूचना राज्य शासनातर्फे लवकरच प्रसिद्ध केली जाईल. हद्दवाढीच्या निर्णयात बाधित होणाऱ्या सर्व गावे व व्यक्तींना याची माहिती व्हावी, यासाठी नगरविकास मंत्रालयातर्फे लवकरच अधिसूचना जाहीर करण्यात येईल. या अधिसूचनेद्वारे बाधित व्यक्तींच्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. दिलेल्या तारखेपर्यंत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (२) विचार करून शासनास अभिप्राय देतील. हद्दवाढीचा पहिला टप्पा समजली जाणारी ही अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. प्रामाणिक मूल्यांक न कराकोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या प्रत्येक रस्त्याची पाहणी केली जावी. न केलेल्या कामासह केलेल्या कामाचा दर्जाही तपासला जावा. युटीलिटी शिफ्ंिटग, वृक्ष लागवड, कराराचा भंग, आदी मुद्द्यांवर रस्ते मूल्यांकन समितीबरोबर चर्चा करून प्रामाणिक मूल्यांकनाची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, सोमवारी पत्रकारांना दिली.येथील शासकीय विश्रामगृहावर बिदरी यांनी रस्ते मूल्यांकन समितीच्या सदस्यांशी सुमारे तासभर चर्चा केली. बैठक खासगी स्वरूपाची असल्याने अधिकाऱ्यांव्यतिरिक्त माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केला होता. बिदरी म्हणाल्या, कराराप्रमाणे तब्बल २५ कोटींचे काम राहिल्याचे कंपनीने यापूर्वीच कबूल केले आहे. पावसाळी पाण्याचे नियोजन झालेले नाही. काँक्रिटचे रस्ते केल्याने पाण्याच्या पाईपलाईन रस्त्याखाली गेल्या आहेत. याचा देखभालीचा खर्च मोठा आहे. फुटपाथ अपूर्ण आहेत. रस्त्यांची उंची वाढल्याने शहराची प्लिंथ लेव्हल बिघडली आहे. सात हजार वृक्ष लागवड केलेली नाही, आदी सर्व त्रुटींबाबत समितीशी चर्चा केली. शहरातील प्रत्येक रस्त्याची पाहणी करून निष्पक्ष व निर्भीड, कोणाच्या दबावाखाली न येता समितीने अहवाल द्यावा, अशी मागणी यावेळी बिदरी यांनी केली आहे.‘आयआरबी’ने करारात नमूद नसतानाही काँक्रिटचे रस्ते करून देखभालीचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे पाण्याच्या पाईप रस्त्याखाली गेल्या. याचा संपूर्ण नकाशासह तपशील समितीसमोर सादर करण्यात आला. प्रत्यक्ष काम व करार, यातील तफावत पाहून सर्वसमावेशक अहवाल दिला जाईल, अशी आशा आयुक्त बिदरी यांनी व्यक्त केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता मनीष पवार बैठकीसाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)