शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रूकडी येथे महावितरणची वसुली पाडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST

रूकडी येथे वाढती थकीत वीज बिल वसुलीसाठी येथील वीज महामंडळाचे कर्मचारी वारंवार सूचना देऊन बिल न भरणा-या ग्राहकांचे वीज ...

रूकडी येथे वाढती थकीत वीज बिल वसुलीसाठी येथील वीज महामंडळाचे कर्मचारी वारंवार सूचना देऊन बिल न भरणा-या ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केले.

गेली दहा दिवस वीज वितरणाचे कर्मचारी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. ज्या ग्राहकांना वारंवार सूचना देवून ही वीज बिल भरले नाहीत, अशा ८० ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद केल्याची बातमी भागात पसरताच वीजजोडणी बंद केलेले ग्राहक आरपीआयचे सतीश माळगे यांना पाचारण करून वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढला. याठिकाणी महावितरणचे अभियंता सांगलीकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत वीज कनेक्शन का तोडले, याचा जाब विचारला. कोरोनाने मिळकत नसताना वीज बिल कोठून भरायचे असा अनेक प्रश्नांनी अधिकारी निरुत्तर झाले.

८० वीज ग्राहकांचे परत वीज जोडणी न केल्यास कार्यालयातून बाहेर पडणार नाही, असा इशारा सतीश मळगे, प्रदीप ढाले, संबोधी कांबळे, अमित शिंदे, सुहास हुपरीकर, सुमित कांबळे, विशाल गायकवाड, अभिजित कांबळे, स्वप्निल कांबळे, वैभव गायकवाड यांनी दिले. हातकणंगलेचे अभियंता महिलापुरे यांच्याशी संपर्क साधून वीजजोडणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. वाढता अधिक गोंधळ पाहता तोडलेले वीज कनेक्शन परत जोडणी करण्याचा आदेश अधिकारी यांनी दिले. वीज कर्मचारी यांनी वीज जोडणी केल्यानंतर जमलेले लोक माघारी परतले. दरम्यान, वीज कनेक्शन परत तोडल्यास रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संपर्क प्रमुख सतीश माळगे, संबोधी कांबळे यांनी दिला आहे.