शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

महावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा : तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:57 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा भ्रष्टाचाराचा नवा फंडा तोडलेले कनेक्शन जोडायचे, तर ५०० रुपये द्या

कोल्हापूर : आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेकडे थकलेली वीजबिले भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आंदोलने सुरू आहेत. तरीदेखील महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.वीज बिल भरणार नाही, कृती समितीने केलेल्या आवाहनामुळे बिले भरण्यास नागरिकांनी हात अखडता घेतला आहे. बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीमच उघडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजारांवर कनेक्शन्स तोडली आहेत.

या सर्वांना रिकनेक्शन देणे ही महावितरणची जबाबदारी असताना, ३०० ते ४०० रुपयांची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर हा सिस्टीममधूनच मेसेज येतो. त्यामुळे पैसे घ्यावे लागतात हे उत्तर दिले जात आहे.बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीची आंदोलनाची हाकमहावितरणकडून सुरू असलेल्या या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवण्यासाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती पुढे आली आहे. किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, सतीश पोवार, राहुल चौधरी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, प्रशांत बरगे, मुसा शेख, महादेव जाधव, अनिल कोळेकर, विजय जाधव यांनी कनेक्शन जोडायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले, तर संघटितपणे विरोध करा, असे आवाहन केले आहे.

एक तर वाढीव बिले आमच्या माथ्यावर मारली आहेत. ती भरली नाहीत, तर कनेक्शन तोडण्याचा दांडगावा केला जात आहे. हा सारासार अन्याय असून, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना दिसतील तेथे घेरावो घालू, त्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे, तेथे जाऊन काळे झेंडे दाखवू.-किसन कल्याणकर,संस्थापक, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती

विजेचे कनेक्शन तोडले असल्याने महावितरणच्या नियमांनुसार तेथे कर्मचाऱ्याचा वापर होत असल्याने त्याचे चार्जेस आकारले जातात. घरगुती कनेक्शन तोडले असल्यास ३०० रुपये लेबर चार्जेस म्हणून आकारणी केली जाते. हा नियमच आहे, यात काही काळेबेरे अथवा भ्रष्टाचार नाही.-किशोर खोबरे,जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर